शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

वनगांची लोकप्रियता सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:02 IST

भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांची या मतदारसंघात लोकप्रियता किती अफाट होती हे या पोटनिवडणुकीने सिद्ध केले आहे.

नंदकुमार टेणी पालघर : भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांची या मतदारसंघात लोकप्रियता किती अफाट होती हे या पोटनिवडणुकीने सिद्ध केले आहे. २०१४ च्या निवडणुकीत कोणत्याही झगमगाटी प्रचाराविना लढविलेली ही निवडणूक वनगा यांनी ५३३२०१ इतक्या प्रचंड मताने व २३९५२० इतक्या मताधिक्याने जिंकली होती. हे ध्यानी घेता या पोट निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पडलेली २७२७८२ ही मते आणि त्यांना मिळालेले २९५७२ हे मताधिक्य एकदम खुजे वाटते. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचा उमेदवार नव्हता, तो आता होता. त्यामुळे भाजपाच्या गावितांना मिळालेली २७२७८२ व शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना पडलेली २४३२१० या दोन्ही मतांची बेरीज केली तरी ती ५१५९९२ इतकी होते. म्हणजे या मतांपेक्षाही वनगांनी २०१४ मध्ये मिळविलेली ५३३२०१ ही मते प्रचंड ठरतात. केवळ कामाच्या आणि लोकप्रीयतेच्या जोरावर ते विजयी झाले होते. हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे.अशा परिस्थितीत अवघ्या सहाच महिन्यांनी विधानसभेच्या निवडणूका झाल्यात. त्यावेळी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात किमान निम्म्यातरी मतदारसंघात भाजप विजयी होईल, अशी भाजपची अटकळ होती. परंतु तसे झाले नाही. जनतेने नालासोपारा, वसई, बोईसर इथे बविआचे क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर, विलास तरे यांना विजयी केले तर पालघरमध्ये कृष्णा घोडा, डहाणूत पास्कल धनारे आणि विक्रमगडमध्ये विष्णू सवरा यांना विजयी केले. म्हणजे सहा पैकी चार मतदारसंघात जनतेने भाजपेतर पक्षांना विजयी केले होते.कृष्णा घोडा यांच्या विजयानंतर अल्पावधीतच त्यांचे निधन झाले त्यानंतर त्यांचे पुत्र अमित घोडा यांना सेनेने उमेदवारी दिली. जनतेने त्यांनाही विजयी केले. याचाच अर्थ लोकसभेत मोठा विजय मिळाला म्हणजे त्या लोकसभा मतदारसंघात असलेल्या विधानसभा मतदारसंघात विजय मिळेल असे गृहीत धरण्याची आवश्यकता नाही. असेही या निवडणुकीने स्पष्ट केले होते.