शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पंचवीस पूल धोकादायक, डहाणू- नाशिक राज्य मार्गावरील पूल झाले जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 03:10 IST

डहाणू : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या डहाणू- नाशिक राज्यमार्गासह प्रमुख जिल्हा मार्गावरील एकूण ७० लहान मोठ्या पूलांपैकी २५ पूल व तेवढेच साकव अरुंद व जीर्ण झाल्याने ते वाहतुकीस धोकादायक झाले आहेत.

शौकत शेख डहाणू : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या डहाणू- नाशिक राज्यमार्गासह प्रमुख जिल्हा मार्गावरील एकूण ७० लहान मोठ्या पूलांपैकी २५ पूल व तेवढेच साकव अरुंद व जीर्ण झाल्याने ते वाहतुकीस धोकादायक झाले आहेत. त्यांची तत्काळ दुरूस्ती करण्याचे गरजेचे असतांना संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कोकणातील महाड येथील सावित्री पूलाच्या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने राज्यभरातील ब्रिटीशकालीन, मोडकलीस व धोकादायक स्थितीत असलेल्या पूलाची तत्काळ माहिती देण्याचे आदेश सा.बां. विभागाला दिले. त्यानंतर संबंधित विभागाने शासनाला माहिती सादर केली. डहाणूत ब्रिटीशकालीन पूल साकव नसले तरी डहाणू - नाशिक राज्यमार्गाबरोबरच झाई, बोर्डी, चिंचणी, वानगाव, आशागड, आंबेसरी, मोडगाव, उधवा-३, बोराडे, उमरोळी, तलवाडा , कासा, सायवन -४, घोलवड, कोसबाड, कंकाडी - ५, सरावली सावटा, डेहणे पळे-६, ऐना दाभोण-७, वसा, करजगाव-८, वानगाव, गासनगाव, चंडिगाव अशा एकूण २५२ कि.मी.च्या रस्त्यावर एकूण ७० पूल, साकव आहेत. त्यापैकी बहुसंख्य पूलाची अवस्था दयनीय झाल्याने त्याची वेळीच दुरूस्ती न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. डहाणू, चारोटी राज्यमार्गावरीरल पाच मोठे पूल धोकादायक आहेत. २०१५ ला या राज्यमार्गाचे २० कोटी खर्चून रुंदीकरण केले. मात्र पूल जैसे थे असल्याने समोरासमोर वाहने आली की अपघात होतात. वधना पूल तसेच डहाणू रेल्वेचा ओव्हरब्रीज कमकुवत झाल्याने सावित्री पूलाप्रमाणे मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली आहे.>हे तर मृत्यूचे सापळेडहाणू-नाशिक राज्यमार्गावरील सरावली, गंजाड येथील पूलाचे कठडे मोडकळीस आले आहे. पावसाळ्यात गंजाड, वरोरा, चिंचणी, कलोवली, वानगाव इत्यादी पूलावरून पाणी वाहत असते. मुसळधार पाऊस झाला की पूल, साकव पाण्याखाली जात असल्याने गावांचा संपर्क तुटतो. पूलावरून जाण्याच्या प्रयत्नात ग्रामस्थ वाहून मृत्यूमुखी पडतात. तरीही सा.बां. पूल, साकवांची दुरूस्ती करीत नाही. नवीन पूल बांधत नाही. त्यामुळे ते मृत्यूचे सापळे ठरले आहे.