शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रदूषणबाधितांवर होणार उपचार; राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 23:16 IST

राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश : कॅन्सर, किडनीसारख्या रोगांची लागण : मांगेला समाजाच्या लढ्याला यश

हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातील बोईसर एम.आय.डी.सी.च्या कारखान्यांतून होत असलेल्या प्रदूषणामुळे परिसरातील हजारो स्थानिक नागरिकांना कॅन्सर, किडनीसारख्या असाध्य रोगांची लागण झाल्याने हरित लवादाने त्यांच्यावर उपचारासाठी आरोग्य यंत्रणा उभी करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यातील किनारपट्टीवरील १६ गावांत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

बोईसर एमआयडीसीमधील काही कारखान्यांमधून छुप्या मार्गाने सोडल्या जाणाऱ्या रसायनामुळे परिसरातील समुद्र, खाड्यांमध्ये मोठे प्रदूषण वाढून शेती, बागायती नापीक बनल्या होत्या. २५ एमएलडी क्षमतेच्या सीईटीपी प्लांटमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रदूषित पाणी सोडले जात असल्याने प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले होते. एके ठिकाणी प्रदूषण वाढत असताना दुसरीकडे एमआयडीसीने सीईटीपीमधून थेट नवापूरच्या समुद्रात ८.१ किलोमीटर लांब पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेतले होते. त्यामुळे परिसरातील गावांत प्रदूषणाची मात्रा वाढून स्थानिकांचे जीवन धोक्यात येणार असल्याने अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवादात जनहित याचिका दाखल केली होती.

हरित लवादात याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी एमआयडीसीमधील वाढत्या प्रदूषणाबाबत भक्कम पुरावे सादर केल्यानंतर हरित लवादाने बाधित गावांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी समुद्र, खाड्या, शेत यांचे सर्वेक्षण करून तारापूर, दांडी, नवापूर प्राथमिक केंद्रातील आजारी रुग्णांची पडताळणी केल्यानंतर सुमारे १४ हजार रुग्ण हे कॅन्सर, किडनीग्रस्त, त्वचारोग, अस्थमा आदी गंभीर आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती समोर आली होती.

हरित लवादाने याची गंभीर दखल घेत व्याधीग्रस्तांना योग्य उपचार प्रदान करून भूगर्भातील पाण्याचे साठेही प्रदूषित झाल्याने शुद्ध पाण्याच्या पुरवठ्याची व्यवस्था उभी करण्याचे आदेश दिले होते. हरित लवादाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला तीन वर्षांचा कालावधी लागला असला तरी विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी याकामी विशेष लक्ष पुरवले होते. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारenvironmentपर्यावरण