शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आॅफिसात अधिकारी एकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 05:19 IST

अतिसंवेदनशील : तारापूर औद्योगिक वसाहतीत कारखाने ११३८

पंकज राऊत

बोईसर : अतिसवेंदनशील असलेल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप प्रादेशिक कार्यालय, तारापूर १ मध्ये ११३८ कारखान्यांकरिता फक्त एकच पूर्णवेळ कायम स्वरुपी अधिकारी आहे तर एक तात्पुरते तर दुसरे अर्धंवेळ क्षेत्र अधिकारी कार्यरत असल्याने पर्यवरण रक्षणाबाबत मंडळच गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंडळाच्या कार्यालयीन आदेशान्वये या कार्यालयात यापूर्वी पाच क्षेत्र अधिकाऱ्याची नेमणूक होती. परंतु सध्या या कार्यालयात फक्त दोन क्षेत्र अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी एक क्षेत्र अधिकारी अर्जुन जाधव यांना उप प्रादेशिक अधिकारी तारापूर २ या पदाचा अतिरिक्त कार्यभार दिलेला असल्याने त्यांना तारापूर १ कडे फारसे लक्ष देणे शक्य होत नाही. सुमारे ११३८ कार्यरत कारखान्यांत होणाºया प्रदूषणावर नियंत्रण व अंकुश म.प्र. नि.मंडळाच्या उप प्रादेशिक कार्यालय, तारापूर १ च्या माध्यमातून ठेवण्यात येत असल्याने रिक्तपदामुळे कार्यालयाच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला असून सध्या नंदकिशोर पाटील हे एकच पूर्णवेळ क्षेत्र अधिकारी असल्याने मनुष्यबळ अपुरे आहे.या कार्यालयातील कामाची प्रचंड व्याप्ती पाहता आणखी चार पूर्णवेळ क्षेत्र अधिकाºयांची तातडीने नेमणूक होणे हे अत्यंत गरजेचे असतांना तात्पुरता इलाज म्हणून मागील महिन्यापासून इतरत्र दोन उपप्रादेशिक कार्यालयातील चार क्षेत्र अधिकाºयांना आठवड्यातून प्रत्येकी २ तर एका अधिकाºयाला एक दिवस अतिरिक्त आळीपाळीने तात्पुरता कार्यभार देऊन काम चालविण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी या अधिकाºयांपैकी कुणीही नेमलेल्या दिवशी तारापूरमध्ये कार्यरत नसल्याचे समजते.केंद्रीय वने व पर्यावरण विभागाने डिसेंबर २००९ साली तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषणाची सरासरी पातळी ही महाराष्ट्र राज्यात ५ व्या क्रमांकावर असल्याची बाब अहवालामध्ये नमूद केली होती.ही पदे मुद्दाम रिक्त ठेवली जातात?अलीकडे राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार येथील उद्योगांच्या अनेकवेळा झालेल्या विशेष तपासणीत नियम, अटी व शर्ती कशा पद्धतीने पायदळी तुडविले जात असल्याचे भीषण वास्तव समोर आले होते.या संदर्भात म.प्र. नि. मंडळा चे प्रादेशिक अधिकारी लाड यांच्याशी मोबाईल वरून टेक्स मेसेज व व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळेच मंडळाच्यावतीने केल्या जाणाºया कारवाईबाबतही कारखानदारात गांभीर्य उरलेले नाही.च्प्रदूषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष व्हावे या करीता तर ही पदे भरली जात नसावीत ना. अशीही शंका जागृत नागरिक व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार