शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

विरार - मनवेलपाड्यात दूषित पाणी, ऐन पावसाळ्यात रोगराईची नागरिकांना भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 23:54 IST

विरार पूर्व मनवेलपाडा रोड येथील न्यू जीवदानी दर्शन चाळ, गणेशनगर आणि परिसरात काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे.

विरार : विरार पूर्व मनवेलपाडा रोड येथील न्यू जीवदानी दर्शन चाळ, गणेशनगर आणि परिसरात काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत येथील रहिवाशांनी तक्रार करूनही अद्याप महापालिकेने दखल घेतलेली नाही. ऐन पावसाळ्यात नागरिकांना दूषित पाणीच प्यावे लागत आहे. यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या परिसरातील एका चाळीतून निघणारी जलवाहिनी उघड्यावरच सोडण्यात आली असल्याचीही या परिसरातील नागरिकांची तक्रार आहे. शिवाय संपूर्ण परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.दरम्यान, याच परिसरात काही महिन्यांपूर्वी एका मटन विक्र ेत्याच्या दुकानातून धुतले गेलेले बकऱ्यांचे रक्त जलवाहिनीत मिसळून संपूर्ण परिसराला रक्तमिश्रित पाण्याचा पुरवठा झाला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. त्यावेळीही महापालिकेने केवळ या मटन विक्र ेत्याला पाच हजार दंड करून मोकळे सोडले होते.मात्र, अद्यापही दूषित पाणी पुरवठा होत असून रहिवाशांना गंभीर आजार होण्याची भीती भेडसावते आहे. तर रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला असताना पालिका प्रशासनातर्फे हलगर्जीपणा होत असल्याने रहिवासी हैराण आहेत.दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे त्यात माती मिसळल्याने पाणी गढूळ झाले होते. पण लगेचच त्यावर उपाय योजना करून तीन तासात स्वच्छ पाणी पुरवठा दिला होता.- महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग (नाव देण्यास मनाई)

टॅग्स :Waterपाणी