शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार बसस्थानकात प्रदूषित पेयजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 04:19 IST

पाण्याच्या टाकीचा स्लॅब तुटल्याने पडते घाण : बरेच दिवस पाणी बदलत नसल्याने येते दुर्गंधी

हुसेन मेमन

जव्हार: जव्हार-मोखाडा या तालुक्यांतील प्रवाशांच्या सोयीसाठी जव्हार हे एकमेव बस स्थानक आहे. मात्र, या स्थानकात प्रवाशांना पाण्यासाठी पाणी मिळत नसल्याने, पाण्यासाठी प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होत आहेत. बस स्थानकात असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये वेळोवेळी पाणी टाकले जात नाही. त्यातच टाकीच्या मागील बाजूस असणारा स्लॅब पडाल आहे. त्यामुळे टाकीत कचरा पडून पाणी प्रदुषित होत आहे.

दोन्ही तालुक्यातील प्रवाशांसह शेकडो विद्यार्थी येथुनच प्रवास करतात. उन्हाळ्याच्या तलखीमुळे तहाण लागल्यावर ते हेच पाणी पितात. टाकीतील पाणी नियमित बदलले जात नसल्याने त्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याच्याही तक्रारी आहेत. हा थेट आरोग्याशी खेळ सुरु असल्याने या प्रकरणी महाराष्टÑ राज्य एस.टी. महामंडळाचे मुंबई सेंट्रल कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले त्यांना विद्यार्थी या बाबतची वास्तविकता सांगणार आहेत.जव्हार व मोखाडा या आदिवासी तालुक्यांत एसटी सेवे शिवाय अन्य कुठलेही प्रवाशाचे साधन नाही. त्यामुळे या बस स्थानकात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. तसेच, याच स्थानकातून जव्हार- नाशिक शिर्र्डी- ठाणे- मुबंई पालघर कल्याण या ठिकाणी बसची ये-जा सुरु असल्याने गर्दीचे बस स्थानक आहे. मात्र, या बसस्थानकात प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. तसेच जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके असून येथील बहुतांस प्रवाशी हे २० रु पयांची पाणी बॉटल घेऊन पिऊ शकत नाही. तसेच, स्थानकाच्या आजुबाजुचे हॉटेलवाले त्यांना पाणी देण्यासाठी मज्जाव करीत असल्याचे प्रवाशांना सांगितले. त्यामुळे जव्हारच्या बस स्थानकात ऐन उन्हाळयाच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांचे हाल सुरु आहेत.प्रवाशांकडून पिण्याच्या पाण्यासंदर्भात संताप व्यक्त झाला की, कधीकाळी टँकरने पाणी टाकले जाते. तेही काही तासांत संपून जाते. त्यातच पाणी कमी असल्याने उन्हामुळे टाकीतील पाणी उकळून पाण्याचा दुर्गंध येतो. बस स्थानकातील पाणी टंचाईबाबत आगार व्यावस्थापकांकडे चौकशी केली असता, आगार व्यावस्थाक रागारागाने बोलून प्रवाशांना उडवून लावतात. म्हणून प्रवाशांनी आपली कैफियत कुणाकडे मांडायची हा प्रश्न आहे. या बस स्थानकात बरेच प्रवाशी अशिक्षित असल्याने त्यांनी पाण्यासाठी मोर्चे काढायचे का असा सवाल विचारला जात आहे.जव्हारच्या बस स्थानकात प्रवाशांना पिण्यासाठी पाणी नाही. आम्हाला बऱ्याचदा चार ते पाच तास बसची वाट पहावी लागते, परंतु भर उन्हात पिण्यासाठी पाणी नाही. एसटी महामंडळाला सांगूनही त्या बाबत कोणतेही पाऊल उचलेले जात नाही.-शिवा भसरा, प्रवाशी.काही दिवसातच पाण्याच्या टाकीची दुरु स्ती करायची आहे. तोपर्यंत पिण्याच्या पाण्याचा टँकर हाच पर्याय आहे.- सरिता पाटील, आगार व्यावस्थापक. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारBus DriverबसचालकWaterपाणी