शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

पालघर, वाडा, वसई व तलासरीत मतदान शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 05:59 IST

पालघर जिल्ह्यातील चार तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी पैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून एक ग्रामपंचायत अंशत: बिनविरोध झाली आहे.

- हितेंन नाईकपालघर : पालघर जिल्ह्यातील चार तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी पैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून एक ग्रामपंचायत अंशत: बिनविरोध झाली आहे. तर अक्करपट्टी ग्रामस्थानी निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून उचाट (वाडा) भागातून एकही उमेदवारी अर्ज न आल्याने ५० ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. सकाळी ७.३० पासून मतदानाला थंड प्रतिसाद दिसत असला तरी दुपार नंतर मतदान केंद्रामध्ये मतदारांनी मोठी गर्दी केली होती. एकूण ७८ ते ८० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील सातपाटी, नवी दापचरी, कर्दळ, माकणे, साखरे, आगरवाडी, करळगाव, पाम, टेम्भी, गुंदले, कोकनेर, बहाडोली, पोळे, धनसार, विळगी, विराथन खुर्द, काटाळे, पोफरण, उसरणी, नांदगाव तर्फे मनोर, कोरे, खर्डी, कोसबाड, गिरणोली, धुकटन, डोंगरे, चहाडे, नानिवली, पथराळी, खामलोली, नावझे, लोवरे, अक्करपट्टी, अश्या एकूण ३३ ग्रामपंचायती च्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर नानिवली, काटाळे आणि गिरनोली ह्या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर कोसबाड ग्रामपंचायत अंशत: बिनविरोध झाली.तर कर्दळ, कोसबाड, पोफरण साखरे, नानिवली, काटाळे ह्या ग्रामपंचायतीचे सरपंच बिनवीरोध निवडून आले. त्यामुळे आज एकूण २९ ग्रामपंचायतीच्या मतदानाला सकाळी सुरु वात झाली सकाळ पासून ११ वाजे पर्यंत मतदानाला थंड प्रतिसाद होता.नंतर दुपार नंतर तो हळूहळू वाढू लागला.तालुक्यात एकूण २० हजार २०१ स्त्रिया तर २१ हजार ५४ पुरु ष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुपारी ३.३० वाजे पर्यंत तालुक्यात ६५.६५ टक्के मतदान झाले होते.वाडा तालुक्यात आलमान,ऐन, शेत, भावेघर, चामळे, चिंचघर, गोराड, गोरापूर, हमरापूर, खुपरी, निचोळे, नेहरोली, परळी, सरसओहळ, शेलटे, उचाट, अशा एकूण १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या.त्यापैकी चामळे ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर उचाट वसाहती मधून एकही उमेदवारी अर्ज न आल्याने तिथे निवडणूक झाली नाही. येथे मागील १० वर्षा पासून प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. त्यामुळे एकूण १३ ग्रामपंचायती मध्ये आज मतदान होत असून ६ हजार ८१ स्त्रिया तर ६ हजार २५६ पुरु ष असे एकूण १२ हजार ३३७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावीत आहेत.दुपार ३.३० पर्यतएकूण ८०.८५ टक्के मतदान झाले होतेतलासरी तालुक्यातील कोदाड ह्या एकमेव ग्रामपंचायती ची निवडणूक आज होत असून ५७१ स्त्रिया तर ५६४ पुरु ष असे एकूण ११३५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावीत आहेत. दुपार ३.३० पर्यत एकूण ९०.९४ टक्के मतदान झाले होते. मंगळवारी सर्व तालुक्यांमध्ये सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.पालघर तालुक्याची मतमोजणी आर्यन हायस्कुल, पालघर येथे तर वाडा, वसई व तलासरी तालुक्यांची मतमोजणी त्या त्या तहसील कार्यालयात होणार आहे.वसईमध्ये दुपारपर्यंत ७८.२७ टक्के मतदानवसई तालुक्यातील पाणजु, पारोळ, तिल्हेर, करणजोन, नागले, मालजी पाडा, कळंब अश्या ७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका साठी मतदान झाले.५ हजार २३२ स्त्रिया तर ५ हजार ३७३ पुरु ष असे एकूण १० हजार ६०५ मतदार मतदानाला उतरलले असून. दुपार ३.३० पर्यतएकूण ७८.२७ टक्के मतदान झाले होते.

टॅग्स :Electionनिवडणूक