शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पालघर, वाडा, वसई व तलासरीत मतदान शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 05:59 IST

पालघर जिल्ह्यातील चार तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी पैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून एक ग्रामपंचायत अंशत: बिनविरोध झाली आहे.

- हितेंन नाईकपालघर : पालघर जिल्ह्यातील चार तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी पैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून एक ग्रामपंचायत अंशत: बिनविरोध झाली आहे. तर अक्करपट्टी ग्रामस्थानी निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून उचाट (वाडा) भागातून एकही उमेदवारी अर्ज न आल्याने ५० ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. सकाळी ७.३० पासून मतदानाला थंड प्रतिसाद दिसत असला तरी दुपार नंतर मतदान केंद्रामध्ये मतदारांनी मोठी गर्दी केली होती. एकूण ७८ ते ८० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील सातपाटी, नवी दापचरी, कर्दळ, माकणे, साखरे, आगरवाडी, करळगाव, पाम, टेम्भी, गुंदले, कोकनेर, बहाडोली, पोळे, धनसार, विळगी, विराथन खुर्द, काटाळे, पोफरण, उसरणी, नांदगाव तर्फे मनोर, कोरे, खर्डी, कोसबाड, गिरणोली, धुकटन, डोंगरे, चहाडे, नानिवली, पथराळी, खामलोली, नावझे, लोवरे, अक्करपट्टी, अश्या एकूण ३३ ग्रामपंचायती च्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर नानिवली, काटाळे आणि गिरनोली ह्या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर कोसबाड ग्रामपंचायत अंशत: बिनविरोध झाली.तर कर्दळ, कोसबाड, पोफरण साखरे, नानिवली, काटाळे ह्या ग्रामपंचायतीचे सरपंच बिनवीरोध निवडून आले. त्यामुळे आज एकूण २९ ग्रामपंचायतीच्या मतदानाला सकाळी सुरु वात झाली सकाळ पासून ११ वाजे पर्यंत मतदानाला थंड प्रतिसाद होता.नंतर दुपार नंतर तो हळूहळू वाढू लागला.तालुक्यात एकूण २० हजार २०१ स्त्रिया तर २१ हजार ५४ पुरु ष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुपारी ३.३० वाजे पर्यंत तालुक्यात ६५.६५ टक्के मतदान झाले होते.वाडा तालुक्यात आलमान,ऐन, शेत, भावेघर, चामळे, चिंचघर, गोराड, गोरापूर, हमरापूर, खुपरी, निचोळे, नेहरोली, परळी, सरसओहळ, शेलटे, उचाट, अशा एकूण १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या.त्यापैकी चामळे ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर उचाट वसाहती मधून एकही उमेदवारी अर्ज न आल्याने तिथे निवडणूक झाली नाही. येथे मागील १० वर्षा पासून प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. त्यामुळे एकूण १३ ग्रामपंचायती मध्ये आज मतदान होत असून ६ हजार ८१ स्त्रिया तर ६ हजार २५६ पुरु ष असे एकूण १२ हजार ३३७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावीत आहेत.दुपार ३.३० पर्यतएकूण ८०.८५ टक्के मतदान झाले होतेतलासरी तालुक्यातील कोदाड ह्या एकमेव ग्रामपंचायती ची निवडणूक आज होत असून ५७१ स्त्रिया तर ५६४ पुरु ष असे एकूण ११३५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावीत आहेत. दुपार ३.३० पर्यत एकूण ९०.९४ टक्के मतदान झाले होते. मंगळवारी सर्व तालुक्यांमध्ये सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.पालघर तालुक्याची मतमोजणी आर्यन हायस्कुल, पालघर येथे तर वाडा, वसई व तलासरी तालुक्यांची मतमोजणी त्या त्या तहसील कार्यालयात होणार आहे.वसईमध्ये दुपारपर्यंत ७८.२७ टक्के मतदानवसई तालुक्यातील पाणजु, पारोळ, तिल्हेर, करणजोन, नागले, मालजी पाडा, कळंब अश्या ७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका साठी मतदान झाले.५ हजार २३२ स्त्रिया तर ५ हजार ३७३ पुरु ष असे एकूण १० हजार ६०५ मतदार मतदानाला उतरलले असून. दुपार ३.३० पर्यतएकूण ७८.२७ टक्के मतदान झाले होते.

टॅग्स :Electionनिवडणूक