शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय समीकरणामुळे निवडणुकीत उमेदवारांना चिंता मतविभागणीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:11 IST

डहाणु लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात येत्या २८ मे ला पोट निवडणुक होत आहे़ त्यामुळे या मतदार संघात सध्यस्थित बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा पालघर गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले आहे.

तलवाडा - डहाणु लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात येत्या २८ मे ला पोट निवडणुक होत आहे़ त्यामुळे या मतदार संघात सध्यस्थित बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा पालघर गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतीम दिवस होता त्यामुळे आजपासुनच निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे़अनुसुचित जमातीकरीता राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आप-आपल्या ताकदीनिशी रिंगणात उतरले आहेत़. त्यामुळे डहाणु लोकसभेतून नव्याने निर्माण झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात शहरी व ग्रामीण अशी मत विभागणी होण्याची चिन्हे दिसत आहेत़ यामध्ये प्रामुख्याने भाजपा-शिवसेना आमने सामने, बहुजन विकास आघाडी, कॉग्रेस-राष्टÑवादी, माकप अशी पंचरंगी लढत बघावयास मिळणार आहे. मात्र, खरी लढत भाजपा व बहुजन विकास आघाडी यांचेमध्ये अपेक्षित आहे़परंतु उमेदवारांनी मतदारांवर कितीही प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला तरी मतांची विभागणी व स्थानिक राजकारण यावरच उमेदवारांचा टिकाव लागणार आहे़ त्यामुळे हा गड कोण काबीज करण्यात यशस्वी ठरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे़ परंतु, तत्पुर्वी सर्वच राजकीय पक्ष आपले श्रेष्ठत्व सिध्द करु लागले आहे़ हे आज शेवटच्या दिवशी भरण्यांत आलेल्या उमेदवारी अर्जां वरुन दिसुन आले़सेनेकडून श्रीनिवास वनगा, भाजपाकडून राजेंद्र गावित, कॉँॅगे्रसकडुन दामु शिंंगडा, बविआकडून बळीराम जाधव, तर माकपाकडून किरण गहला यांनी गुरुवारपासुनच आपला प्रचार सुरु केल्यान लोकसभा पोट निवणुकीत प्रत्येक मताला किंमत आली आहे़डहाणु लोकसभा मतदारसंघाचा काही भाग असा मिळून हा लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्याने उमेदवार नव्या चेहऱ्याचा दिसणार अशी मतदारांना अपेक्षा होती परंतु जुनेच चेहरे समोर येत असल्याने मतदारांना हवे असलेले घडलेले नाही़ त्यामुळे पुर्वी लोक प्रतिनिधी म्हणुन मतदारांनी ज्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे़ त्यांच्या स्थानिक विकास कामाच्या जोरावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहाणार आहे़ मात्र या पंचरंगी लढतीत मत विभागणीची चिंता येथील उमेदवारांना भेडसावत आहे़ दरम्यान, सर्वच पक्षांनी प्रचारावर भर दिला आहे.शहरी भागामध्ये बविआची ताकदपालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीने जयत तयारी केलेली आहे़ कार्यकर्त्यांच्या बैठका गुरुवारपासुनच सुरुच झाल्या आहेत़ यासुंपुर्ण लोकसभा मतदार संघात साडेसतरा लाख मतदार असुन बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य असलेल्या वसई, नालासोपारा व बोईसर या तिन विधानसभा मतदार क्षेत्रात दहा लाखाहुन अधिक मतदार आहेत़ ही बाब निवडणुकीत जमेची बाजु ठरल्यास त्यांना फायदा होऊ शकेल.कॉग्रेससाठी संघर्ष तरी लोकांना ताकदीचा पर्यायया संपुर्ण मतदार संघात कॉगे्रसची हवी तशी बांधणी नसल्याने कॉगे्रससाठी ही निवडणुक कठीण परीक्षा ठरणार आहे. मात्र, राष्टÑवादी कॉग्रेस ही निवडणुक स्वबळांवर जिंकू शकत नसल्याने त्यांनी पाठींंबा दर्षविला आहे. मात्र कॉगे्रसकडे कार्यकर्ता व मतदार बांधणीला हातामध्ये जास्त वेळ नसल्याने निवडणुकीच्या रिंगणात त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे़ दरम्यान, मोदी आणि भाजपाला ताकदीचा पर्याय ठरत असल्याने देश पातळीवरील राजकारणात कॉँग्रेस चर्चेमध्ये आहे.भाजपा आपली संपूर्ण ताकद एकवटणारवाढवन बंदर, सुपर हायवे, बुलेट ट्रेन या मुद्यांना सामोरे जाणाºया भाजपाकडे सध्या कोणतीही लाट नसली तरी जिल्ह्याच्या ग्रामिण भागामध्ये संघ परिवार व अंगीभूत संघटनांची बांधणी पक्की आहे. दिवंगत खासदार चिंतामण वनगाच्या पुत्राने सेना प्रवेश केल्याने सहानुभूतीची लाट नसली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पोट निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने आगामी काळात प्रचाराच्या निमित्ताने मोठ मोठे नेते, मंत्री रणधुमाळीत दिसणार आहेत.माकपाकडे टक्कर देण्याची ताकदमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ताकद सध्या या लोकसभा मतदार संघात वाढु लागली आहे़ या भागातील महत्वाच्या समस्यांवर व प्रश्नांवर होत असलेल्या आंदोलनांसाठी (आरचासंहितेपुर्वी) मोठी गर्दी जमत होती. त्यामुळे या आदिवासी मतदार संघात आपला उमेदवार उभा करुन माकपा इतरांना टक्कर देण्याची ताकद ठेऊन आहे.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Electionनिवडणूक