शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

मीरा भाईंदर - वसई विरारमध्ये तिरंगा घेऊन ७५ किमी धावले पोलीस

By धीरज परब | Updated: July 31, 2022 21:20 IST

स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष असल्याने पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने मीरा भाईंदर आणि वसई विरार परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. प्र

मीरारोड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात पोलीस राष्ट्रध्वज घेऊन ७५ किलोमीटर धावले. पोलिसांची तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात पार पडली .  

स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष असल्याने पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने मीरा भाईंदर आणि वसई विरार परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक घरात तिरंगा कार्यक्रमा अंतर्गत आज रविवारी  ७५ पोलीस जवान हे प्रत्येकी १ किलोमीटर राष्ट्रध्वज घेऊन धावले आणि ७५ किलोमीटरचे  तिरंगा रॅलीचे अंतर पूर्ण केले .  

 'तिरंगा रॅली रन' उत्तन पोलीस ठाणे व वसई पोलीस ठाणे या दोन ठिकाणावरून सकाळी ६ वाजता एकाच वेळी सुरू करण्यात आली होती . ह्या दोन्ही रॅलीचा समारोप वसई पूर्वेच्या नवजीवन फाटा येथील अप्पा मैदानात करण्यात आला.  उत्तनच्या काका बाप्टिस्टा चौक पोलीस चौकी येथून सुरु झालेली तिरंगा रॅली राई , परशुराम चौक , स्वातंत्र्यवीर सावरकर चौक गोल्डन नेस्ट, शांती नगर , सृष्टी चौक सिग्नल , डेल्टा गार्डन चौक, काशीमीरा नाका- घोडबंदर खिंड, वरसावे पूल उलांडून वसई महामार्ग, सातिवली खिंड, तुंगारेश्वर पूल मार्गाने अप्पा मैदानात पोहचली . तर वसई पार नाका येथून सुरु झालेली रॅली अंबाडी नाका, वसई वाहतूक शाखा कार्यालय, बोळींज मस्जिद, जुने विवा कॉलेज, ओस्तवाल शाळा, तुळींज पोलीस ठाणे, रेंज नाका ह्या मार्गाने मैदानात पोहोचली. 

या तिरंगा दौड मध्ये पोलीस आयुक्त सदानंद दाते, पोलीस उप आयुक्त विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, पंकज शिरसाट सह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या शिवाय प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील शांतता समिती व मोहल्ला समिती सदस्य, पोलीस मित्र व नागरिकांनी तिरंगा रॅली दरम्यान धावणा-या पोलिसांचे स्वागत करत त्यांच्या उत्साह वाढविला. पोलिसांकडून या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतानाच नागरिकांना अखंडता, एकात्मता आणि देशप्रेमाचा संदेश दिला. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिस