शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

मीरा भाईंदर - वसई विरारमध्ये तिरंगा घेऊन ७५ किमी धावले पोलीस

By धीरज परब | Updated: July 31, 2022 21:20 IST

स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष असल्याने पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने मीरा भाईंदर आणि वसई विरार परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. प्र

मीरारोड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात पोलीस राष्ट्रध्वज घेऊन ७५ किलोमीटर धावले. पोलिसांची तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात पार पडली .  

स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष असल्याने पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने मीरा भाईंदर आणि वसई विरार परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक घरात तिरंगा कार्यक्रमा अंतर्गत आज रविवारी  ७५ पोलीस जवान हे प्रत्येकी १ किलोमीटर राष्ट्रध्वज घेऊन धावले आणि ७५ किलोमीटरचे  तिरंगा रॅलीचे अंतर पूर्ण केले .  

 'तिरंगा रॅली रन' उत्तन पोलीस ठाणे व वसई पोलीस ठाणे या दोन ठिकाणावरून सकाळी ६ वाजता एकाच वेळी सुरू करण्यात आली होती . ह्या दोन्ही रॅलीचा समारोप वसई पूर्वेच्या नवजीवन फाटा येथील अप्पा मैदानात करण्यात आला.  उत्तनच्या काका बाप्टिस्टा चौक पोलीस चौकी येथून सुरु झालेली तिरंगा रॅली राई , परशुराम चौक , स्वातंत्र्यवीर सावरकर चौक गोल्डन नेस्ट, शांती नगर , सृष्टी चौक सिग्नल , डेल्टा गार्डन चौक, काशीमीरा नाका- घोडबंदर खिंड, वरसावे पूल उलांडून वसई महामार्ग, सातिवली खिंड, तुंगारेश्वर पूल मार्गाने अप्पा मैदानात पोहचली . तर वसई पार नाका येथून सुरु झालेली रॅली अंबाडी नाका, वसई वाहतूक शाखा कार्यालय, बोळींज मस्जिद, जुने विवा कॉलेज, ओस्तवाल शाळा, तुळींज पोलीस ठाणे, रेंज नाका ह्या मार्गाने मैदानात पोहोचली. 

या तिरंगा दौड मध्ये पोलीस आयुक्त सदानंद दाते, पोलीस उप आयुक्त विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, पंकज शिरसाट सह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या शिवाय प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील शांतता समिती व मोहल्ला समिती सदस्य, पोलीस मित्र व नागरिकांनी तिरंगा रॅली दरम्यान धावणा-या पोलिसांचे स्वागत करत त्यांच्या उत्साह वाढविला. पोलिसांकडून या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतानाच नागरिकांना अखंडता, एकात्मता आणि देशप्रेमाचा संदेश दिला. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिस