शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

बोईसरच्या मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना पोलिसांनी हटविले

By admin | Updated: February 3, 2016 02:03 IST

बोईसर-तारापूर व बोईसर-पालघर या मुख्य व प्रचंड रहदारीच्या रस्त्यावर ठाण मांडून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फेरिवाल्यांना हटविण्याची मोहिम बोईसर पोलिसांनी आज हाती घेतली

पंकज राऊत,  बोईसरबोईसर-तारापूर व बोईसर-पालघर या मुख्य व प्रचंड रहदारीच्या रस्त्यावर ठाण मांडून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फेरिवाल्यांना हटविण्याची मोहिम बोईसर पोलिसांनी आज हाती घेतली. त्यामुळे सुमारे पन्नास फेरीवाल्यांनी बोईसर पोलीस स्थानकात धाव घेऊन कारवाई थांबविण्याची विनंती केली मात्र सदर कारवाई सुरुच ठेवणार असल्याचे बोईसर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक के.एस्.हेगाजे यांनी सांगितले.बोईसर रेल्वे स्थानका जवळील मुख्य रस्त्यावरील डॉ. वर्तकांच्या घराच्या बाजूला पूर्वी पासून स्थानिक गोर-गरीब महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करुन गुजराण करीत आहेत मात्र अलीकडच्या काळात त्यात कटलरी, कपडे, चप्पल,बॅगा, फळे खाद्यपदार्थ इत्यादी विविध प्रकारच्या फेरीवाल्यांची जंत्री वाढतच जाऊन ते थेट विजयनगर सिडकोपर्यंत पोहोचले. त्या मध्ये काहींनी तर मोठीच जागा व्यापून मोठी दुकानेच थाटलीत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन त्याचा त्रास बोईसर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना होत आहे. काही दिवसापूर्वी एका अत्यवस्थ रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमुळेच अडकली होती.राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने व अतिसंवेदनशील असलेल्या तारापूर अणुऊर्जा केंद्र व भाभा अणुसंशोधन केंद्र या दोन्ही अतिशय महत्वाच्या प्रकल्पांना जोडणारा हा मुख्य रस्ता असून फेरीवाल्यांबरोबरच, खरेदीदार, रस्त्यावर पार्कींग करण्यांत येणाऱ्या मोटारसायकली व कार तसेच रिक्षांमुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक खोळंबते आहे. या संदर्भातील नागरीकांच्या वाढलेल्या तक्रारींमुळे बोईसर पोलिसांनी फेरीवाला हटाव मोहिम हाती घेतली होती. हटविण्यांत आलेल्या फेरीवाल्यांना घेऊन जि. प. सदस्य रजना संखे पोलीस स्थानकांत जाऊन फेरीवाल्या संदर्भात निश्चित निर्णय होईपर्यंत कारवाई न करण्याची विनंती पोलिसांना केली त्यावेळी माजी पंचायत समिती सदस्य भावेश मोरे ही उपस्थित होते.फेरीवाल्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन त्याचा सर्व साधारण नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे फेरीवाले हटवा ही मोहीम सुरुच राहणार असून ग्रामपंचायतीने मुख्य रस्त्या व्यतीरिक्त फेरीवाल्यांना पर्यायी जागा द्यावी.- के. एस. हेगाजे, पोलीस निरीक्षक लवकरच ग्रामपंचायत, पोलीस, सर्वपक्षीय नेते, लोक प्रतिनिधी सामाजिक संघटना व नागरीक यांची संयुक्तपणे बैठक घेऊन फेरीवाल्या संदर्भात सर्वानुमते निर्णय घेण्यांत येईल.- निलम संखे, उपसरपंच