शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

वरठा पाड्यात बारमाही तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: April 13, 2016 01:49 IST

यावर्षी तालुक्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाचे जोरदार चटके बसू लागल्याने नदी, नाले, विहिरींनी तळ गाठायला सुरूवात केली. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावपाड्यातील आदिवासींना

वाडा : यावर्षी तालुक्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाचे जोरदार चटके बसू लागल्याने नदी, नाले, विहिरींनी तळ गाठायला सुरूवात केली. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावपाड्यातील आदिवासींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून तालुक्यातील वरठा पाडा (नाणे) येथील महिलांना बारमाही पाण्यासाठी नदीपात्रातील खड्ड्यातील पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे येथील सुरेश वरठा यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील आदिवासींनी प्रशासनाला दिला आहे.शासकीय अनास्थेमुळे या भागातील नागरीकांना, पाणी, वीज, रस्ते या सारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या गावाला लागून बारमाही वाहणारी वैतरणा आहे. मात्र शासकीय अनास्थेमुळे व लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे येथील गावातील आदिवासींच्या घशाला ५० वर्षापासून कोरड पडली आहे. त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तर दुसरीकडे निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून या भागातील पाणी प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.या गावातील आदिवासी ग्रामस्थ रमेश वरठा, नामदेव तांडेल, शंकर वरठा, रामदास वरठा, अमृत तांडेल, वासुदेव वरठा, बाळकृष्ण वरठा, परशुराम वरठा यांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार अर्ज विनंत्या केल्या त्यासाठी हेलपाटे मारून देखील या आदिवासींना साधा हातपंप देखील मिळाला नसल्याने ते निराश झाले असून प्रशासनावरचा त्यांचा विश्वास उडाला आहे.