शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील लोकांना गुजरातमध्ये प्रवेश बंद; नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 06:40 IST

गुजरातला जाणारे सर्व रस्ते पत्रे लावून केले बंद

- सुरेश काटे तलासरी : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नागरिकांना गुजरातमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गुजरातमधील उंबरगाव, संजाणकडे जाणारे सर्व रस्ते मातीचे ढिगारे तसेच लोखंडी पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत.

तलासरी तालुक्यात कोरोनाचा आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. तरीही महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना गुजरातमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मातीचे ढिगारे आणि पत्रे लावून सर्वच रस्ते बंद केल्याने हजारो स्थानिकांना आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी २० कि.मी. अंतरावर जावे लागते आहे. याबाबत नागरिकांनी रस्ता खुला करण्यासाठी विनंती अर्ज केले तरी त्याचा उपयोग झालेला नाही. त्यामुळे पालघर प्रशासनाने गुजरात प्रशासनाशी समन्वय साधून रस्ता सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असणाºया पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी, संभा सीमावर्ती भागात राहणाºया नागरिकांमधील ९० टक्के लोक हे उंबरगाव येथेच काम करतात. वेवजी या गावातील इंडिया कॉलनी येथील लोकांना ५०० मी. अंतरावरील उंबरगाव जवळ पडते. मात्र, येथे जाणारा रस्ता मातीचा ढीग टाकून बंद केला आहे. या कॉलनीत २०० कुटुंबे राहात असून त्यांना मेडिकल, दुकान तसेच रुग्णालय या सुविधांसाठी ५० कि.मी. अंतरावरील डहाणू शहरात जावे लागत आहे. लोकांना गॅस कनेक्शनही गुजरातमधून देण्यात आले आहे. तरीही हा रस्ता बंद करण्यात आला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस