शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील पेल्हार, उसगाव, पापडखिंड धरणे तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:27 IST

उशिरा येऊन जोरदार बरसला : जिल्ह्यातील ४ पैकी ३ धरणे ओव्हरफ्लो; पाणीप्रश्न निकाली निघणार

वसई : १५ जूननंतर दीड महिन्यांच्या कालावधीत पालघर जिल्ह्यात कोसळलेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील ४ पैकी ३ धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तसेच नदी, नाले, विहिरी, तळी तुडूंब भरली आहेत. २८ जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पालघर तसेच वसई - विरारमध्ये एक हजार मिमी.पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे शेतकरी वर्ग बऱ्यापैकी सुखावला आहे. पालघर जिल्ह्यात धामणी - सूर्या या मुख्य धरणासहीत अन्य तीन मध्यम आणि लहान स्वरूपाची धरणेही जिल्हावासीयांची तहान भागवत आहेत. वसई तालुक्यातच पेल्हार, उसगाव आणि पापडखिंड अशी तीन धरणे कार्यरत आहेत. पैकी विरार पूर्वेतील पापडखिंड धरण वसई विरार शहर महापालिकेने गतवर्षी बंद केले आहे.

जिल्ह्यातील ४ धरणांपैकी वसई तालुक्यात असणारी ३ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. धामणी - सूर्या हे मुख्य धरण वगळता ३ धरणे शंभर टक्के भरली असून, धामणी ८८ टक्क्यांपर्यंत भरले आहे. सर्वच धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचे वसई विरार महापालिकेचे शहर अभियंता माधव जवादे यांनी लोकमतला सांगितले.विक्रमगड तालुक्यात जोरदार पाऊस; वाहून गेल्याने एकाचा मृत्यूविक्रमगड : तालुक्यात सतत पडणाºया पावसामुळे खांड बंधारा, सजन बंधारा, ताबाडी नदी, देहजा नदी या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. हा पाऊस असाच राहिला तर धोक्याची पातळीही ओलांडण्याची भीती आहे. या परिसरातील अनेक लहान मोठ्या पुलावरून रोज पाणी वाहून वाहतूक बंद पडण्याच्या घटना घडत आहे. या पुरामुळे तालुक्यातील वेढे, चरी, डावरे पाडा येथील पांडू भिवा डावरे हे आपले काम आटपून घरी जात असताना घाणेडा येथील पुलावरून पाय घसरून पाण्यात वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायांकळी घडली. बुधवारी एका शेतात हा मृतदेह मिळाला. याबाबत तहसीलदारांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला असून अधिक तपास सुरू आहे.चिंता होती; ती गेली !गेल्यावर्षी जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. महिनाभर पाऊस गायब झाला. मात्र जुलैमध्ये पावसाने हाहा:कार उडवून दिला. वसई विरार महापालिकेच्या योग्य नियोजनामुळे यावर्षी जराही पाणीकपात करावी लागली नाही. यंदाही मान्सून अपेक्षेपेक्षा २० दिवस उशीरा दाखल झाल्याने गतवर्षीचीच परिस्थिती उद्भवण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, २० जूनपासून सुरू झालेल्या पावसामुळे अवघ्या तीन आठवड्यांतच महिन्याची सरासरी भरून काढल्याने जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली आहेत. 

टॅग्स :RainपाऊसVasai Virarवसई विरार