शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

वसईतील पेल्हार, उसगाव, पापडखिंड धरणे तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:27 IST

उशिरा येऊन जोरदार बरसला : जिल्ह्यातील ४ पैकी ३ धरणे ओव्हरफ्लो; पाणीप्रश्न निकाली निघणार

वसई : १५ जूननंतर दीड महिन्यांच्या कालावधीत पालघर जिल्ह्यात कोसळलेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील ४ पैकी ३ धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तसेच नदी, नाले, विहिरी, तळी तुडूंब भरली आहेत. २८ जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पालघर तसेच वसई - विरारमध्ये एक हजार मिमी.पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे शेतकरी वर्ग बऱ्यापैकी सुखावला आहे. पालघर जिल्ह्यात धामणी - सूर्या या मुख्य धरणासहीत अन्य तीन मध्यम आणि लहान स्वरूपाची धरणेही जिल्हावासीयांची तहान भागवत आहेत. वसई तालुक्यातच पेल्हार, उसगाव आणि पापडखिंड अशी तीन धरणे कार्यरत आहेत. पैकी विरार पूर्वेतील पापडखिंड धरण वसई विरार शहर महापालिकेने गतवर्षी बंद केले आहे.

जिल्ह्यातील ४ धरणांपैकी वसई तालुक्यात असणारी ३ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. धामणी - सूर्या हे मुख्य धरण वगळता ३ धरणे शंभर टक्के भरली असून, धामणी ८८ टक्क्यांपर्यंत भरले आहे. सर्वच धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचे वसई विरार महापालिकेचे शहर अभियंता माधव जवादे यांनी लोकमतला सांगितले.विक्रमगड तालुक्यात जोरदार पाऊस; वाहून गेल्याने एकाचा मृत्यूविक्रमगड : तालुक्यात सतत पडणाºया पावसामुळे खांड बंधारा, सजन बंधारा, ताबाडी नदी, देहजा नदी या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. हा पाऊस असाच राहिला तर धोक्याची पातळीही ओलांडण्याची भीती आहे. या परिसरातील अनेक लहान मोठ्या पुलावरून रोज पाणी वाहून वाहतूक बंद पडण्याच्या घटना घडत आहे. या पुरामुळे तालुक्यातील वेढे, चरी, डावरे पाडा येथील पांडू भिवा डावरे हे आपले काम आटपून घरी जात असताना घाणेडा येथील पुलावरून पाय घसरून पाण्यात वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायांकळी घडली. बुधवारी एका शेतात हा मृतदेह मिळाला. याबाबत तहसीलदारांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला असून अधिक तपास सुरू आहे.चिंता होती; ती गेली !गेल्यावर्षी जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. महिनाभर पाऊस गायब झाला. मात्र जुलैमध्ये पावसाने हाहा:कार उडवून दिला. वसई विरार महापालिकेच्या योग्य नियोजनामुळे यावर्षी जराही पाणीकपात करावी लागली नाही. यंदाही मान्सून अपेक्षेपेक्षा २० दिवस उशीरा दाखल झाल्याने गतवर्षीचीच परिस्थिती उद्भवण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, २० जूनपासून सुरू झालेल्या पावसामुळे अवघ्या तीन आठवड्यांतच महिन्याची सरासरी भरून काढल्याने जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली आहेत. 

टॅग्स :RainपाऊसVasai Virarवसई विरार