शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

वसईतील पेल्हार, उसगाव, पापडखिंड धरणे तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:27 IST

उशिरा येऊन जोरदार बरसला : जिल्ह्यातील ४ पैकी ३ धरणे ओव्हरफ्लो; पाणीप्रश्न निकाली निघणार

वसई : १५ जूननंतर दीड महिन्यांच्या कालावधीत पालघर जिल्ह्यात कोसळलेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील ४ पैकी ३ धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तसेच नदी, नाले, विहिरी, तळी तुडूंब भरली आहेत. २८ जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पालघर तसेच वसई - विरारमध्ये एक हजार मिमी.पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे शेतकरी वर्ग बऱ्यापैकी सुखावला आहे. पालघर जिल्ह्यात धामणी - सूर्या या मुख्य धरणासहीत अन्य तीन मध्यम आणि लहान स्वरूपाची धरणेही जिल्हावासीयांची तहान भागवत आहेत. वसई तालुक्यातच पेल्हार, उसगाव आणि पापडखिंड अशी तीन धरणे कार्यरत आहेत. पैकी विरार पूर्वेतील पापडखिंड धरण वसई विरार शहर महापालिकेने गतवर्षी बंद केले आहे.

जिल्ह्यातील ४ धरणांपैकी वसई तालुक्यात असणारी ३ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. धामणी - सूर्या हे मुख्य धरण वगळता ३ धरणे शंभर टक्के भरली असून, धामणी ८८ टक्क्यांपर्यंत भरले आहे. सर्वच धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचे वसई विरार महापालिकेचे शहर अभियंता माधव जवादे यांनी लोकमतला सांगितले.विक्रमगड तालुक्यात जोरदार पाऊस; वाहून गेल्याने एकाचा मृत्यूविक्रमगड : तालुक्यात सतत पडणाºया पावसामुळे खांड बंधारा, सजन बंधारा, ताबाडी नदी, देहजा नदी या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. हा पाऊस असाच राहिला तर धोक्याची पातळीही ओलांडण्याची भीती आहे. या परिसरातील अनेक लहान मोठ्या पुलावरून रोज पाणी वाहून वाहतूक बंद पडण्याच्या घटना घडत आहे. या पुरामुळे तालुक्यातील वेढे, चरी, डावरे पाडा येथील पांडू भिवा डावरे हे आपले काम आटपून घरी जात असताना घाणेडा येथील पुलावरून पाय घसरून पाण्यात वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायांकळी घडली. बुधवारी एका शेतात हा मृतदेह मिळाला. याबाबत तहसीलदारांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला असून अधिक तपास सुरू आहे.चिंता होती; ती गेली !गेल्यावर्षी जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. महिनाभर पाऊस गायब झाला. मात्र जुलैमध्ये पावसाने हाहा:कार उडवून दिला. वसई विरार महापालिकेच्या योग्य नियोजनामुळे यावर्षी जराही पाणीकपात करावी लागली नाही. यंदाही मान्सून अपेक्षेपेक्षा २० दिवस उशीरा दाखल झाल्याने गतवर्षीचीच परिस्थिती उद्भवण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, २० जूनपासून सुरू झालेल्या पावसामुळे अवघ्या तीन आठवड्यांतच महिन्याची सरासरी भरून काढल्याने जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली आहेत. 

टॅग्स :RainपाऊसVasai Virarवसई विरार