शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

यंदा होणार 25 कोटींचे पीककर्ज वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 00:04 IST

उत्पन्नवाढीसाठी प्रोत्साहन : प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शासकीय योजना पोहोचविणार

पालघर : गेल्या वर्षीच्या २३ कोटी रुपयांच्या पीककर्जात दोन कोटींची वाढ करीत रोगप्रतिकारशक्तीयुक्त पालेभाज्या तसेच औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ तत्काळ व एका छत्राखाली मिळण्यासाठी गावपातळीवर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली कृषी ग्रामविकास समितीची स्थापना करण्यात येणार आहे. जिल्हा अन्नधान्यापासून स्वयंपूर्ण करण्यासाठी तसेच शेतकरी बांधवांना शेती उत्पादन वाढविण्यासाठी 

२०२१-२२ हे वर्ष ‘उत्पादकता वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले.पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी भुसे बोलत होते. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील जवळपास एक लाख शेतकऱ्यांना बांधावर तूर लागवडीसाठी व भाजीपाला बियाणे तसेच वनपट्टेधारकांना फळबाग लागवड, शेताची बांधदुरुस्ती, भात लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत अनुदान देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांपर्यंत वीज पोहोचली नाही, त्यांना विद्युतजोडणी योजनेंतर्गत वीज उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. शेतीपूरक व्यवसाय करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पिकणारी फळे, चिकू यावरील प्रक्रिया प्रकल्प वैयक्तिक शेतकरी किंवा शेतकरी गटांना देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. 

पालघर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची मागील वर्षाची नुकसानभरपाई प्रलंबित असेल, अशा शेतकऱ्यांची नुकसानभरपाई तत्काळ देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिले. 

शेतकऱ्यांचे उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत‘विकेल ते पिकेल’ या अभियानांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत सर्व भाजीपाला एकत्र करून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. तसेच कृषी विभागामार्फत महामार्गावर शेतकऱ्यांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. किसान रेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल थेट दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये पोहोचविण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून कमीतकमी वेळामध्ये शेतकऱ्यांचा शेतीमाल दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये पोहोचेल, असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. 

 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर