शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

वसईत अ‍ॅम्ब्युलन्सच्या जागी पार्कींग, आवाज उठविणाºयाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:47 IST

नेहमी गर्दीने वहात असलेल्या वसई रोड रेल्वे स्टेशनबाहेर अ‍ॅम्ब्युलन्ससाठी राखीव असलेल्या जागेवर बेकायदेशीरपणे मोटार सायकली उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे अ‍ॅम्ब्युलन्सला जागाच शिल्लक नसते.

शशी करपेवसई : नेहमी गर्दीने वहात असलेल्या वसई रोड रेल्वे स्टेशनबाहेर अ‍ॅम्ब्युलन्ससाठी राखीव असलेल्या जागेवर बेकायदेशीरपणे मोटार सायकली उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे अ‍ॅम्ब्युलन्सला जागाच शिल्लक नसते.वसई रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला अ‍ॅम्ब्युलन्ससाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र, याठिकाणी मोटार सायकली उभ्या करून ठेवल्या जात असल्याने अ‍ॅम्ब्युलन्स उभी करण्यासाठी जागा राहिलेली नाही. त्यातच रिक्शा स्टँडमुळे उर्वरित जागा व्यापली गेली आहे. परिणामी अ‍ॅम्ब्युलन्स ठेवणे मुश्कील होऊन बसले आहे.वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात पार्कींगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातून रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे स्टेशन मास्तरांनी रेल्वे परिसरात बेकायदा पार्कींगला मोकळे रान करून दिले आहे. या चारही रेल्वे स्टेशन परिसरात तरुणांच्या टोळक्यांनी बेकायदा पार्कींग सुरु केली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनबाहेर पडण्यासाठी असलेला मार्ग व पादचारी पूलाच्या तोंडावरच मोटार सायकली उभ्या केलेल्या असतात. या मोटार सायकलस्वारांकडून दररोज वसूल करण्यासाठी गुंडप्रवृत्तींच्या मुलांना ठेवण्यात आले आहे. एखाद्या प्रवाशाने पार्कींगवर आवाज उठवला की ही टोळी त्याला मारहाण करीत असते. रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे स्टेशन मास्तरांना दररोज आर्थिक मोबदला मिळत असल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता बेकायदा पार्कींगने स्टेशन परिसर व्यापून गेले आहेत. रेल्वे स्टेशनवर एल्फिस्टन रेल्वे स्टेशनसारखी एखादी घटना घडल्यास स्टेशनबाहेर पडतांना प्रवाशांच्या गैरसोयीकडे प्रशासन दुर्लक्ष करते आहे. शशी करपेवसई : नेहमी गर्दीने वहात असलेल्या वसई रोड रेल्वे स्टेशनबाहेर अ‍ॅम्ब्युलन्ससाठी राखीव असलेल्या जागेवर बेकायदेशीरपणे मोटार सायकली उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे अ‍ॅम्ब्युलन्सला जागाच शिल्लक नसते.वसई रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला अ‍ॅम्ब्युलन्ससाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र, याठिकाणी मोटार सायकली उभ्या करून ठेवल्या जात असल्याने अ‍ॅम्ब्युलन्स उभी करण्यासाठी जागा राहिलेली नाही. त्यातच रिक्शा स्टँडमुळे उर्वरित जागा व्यापली गेली आहे. परिणामी अ‍ॅम्ब्युलन्स ठेवणे मुश्कील होऊन बसले आहे.वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात पार्कींगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातून रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे स्टेशन मास्तरांनी रेल्वे परिसरात बेकायदा पार्कींगला मोकळे रान करून दिले आहे. या चारही रेल्वे स्टेशन परिसरात तरुणांच्या टोळक्यांनी बेकायदा पार्कींग सुरु केली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनबाहेर पडण्यासाठी असलेला मार्ग व पादचारी पूलाच्या तोंडावरच मोटार सायकली उभ्या केलेल्या असतात. या मोटार सायकलस्वारांकडून दररोज वसूल करण्यासाठी गुंडप्रवृत्तींच्या मुलांना ठेवण्यात आले आहे. एखाद्या प्रवाशाने पार्कींगवर आवाज उठवला की ही टोळी त्याला मारहाण करीत असते. रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे स्टेशन मास्तरांना दररोज आर्थिक मोबदला मिळत असल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता बेकायदा पार्कींगने स्टेशन परिसर व्यापून गेले आहेत. रेल्वे स्टेशनवर एल्फिस्टन रेल्वे स्टेशनसारखी एखादी घटना घडल्यास स्टेशनबाहेर पडतांना प्रवाशांच्या गैरसोयीकडे प्रशासन दुर्लक्ष करते आहे.

टॅग्स :Parkingपार्किंगVasai Virarवसई विरार