शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

पालघर जिल्ह्याचे औद्योगिक भवितव्य उज्ज्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:30 IST

आकारमान आणि लोकसंख्या सह सर्वच बाबतीत अवाढव्य असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिति केल्या नंतर तीन वर्षे झपाट्याने गेली असून अपेक्षे प्रमाणे

आकारमान आणि लोकसंख्या सह सर्वच बाबतीत अवाढव्य असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिति केल्या नंतर तीन वर्षे झपाट्याने गेली असून अपेक्षे प्रमाणे किंवा अपेक्षे इतका जिल्ह्याचा विकासाचा गाडा जात नसला तरी सकारात्मक दृष्टीने घेण्यांत येणारे निर्णय व पोषक वातावरणामुळे सर्व बाबी बरोबर च उद्योगाच्या विकासालाही चालना मिळत असून मुबई आणि गुजरात च्या मध्यभागी असलेल्या पालघर जिल्ह्याचे उद्योग क्षेत्रातिल भविष्य उज्वल आहे परंतु त्या करीता अधिक पायभूत सुविधा जलद गतीने उपलब्ध करून संबंधित कार्यालये सुरु करण्याची नितांत गरज आहेआठ तालुके मिळून देशाच्या व राज्याच्या नकाशावर उदयास आलेल्या पालघर जिल्ह्यामधे महाराष्ट्रातील अग्रगण्य समजली जाणारी तारापुर एम आय डी सी, देशातील महत्वाचा व सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील अशा तारापूर अणूऊर्जा केंद्रातील चार अणुभट्या, भाभा अणू संशोधन केंद्र ( बी ए आर सी) डहाणूचा रिलायन्स एनर्जीचा प्रकल्प व फुगे उद्योगाबरोबरच पालघर, वसई, वाडा, या सर्व तालुक्यांमध्ये लहान, मध्यम व मोठ्या स्वरूपाचे सुमारे साडेतीन हजार उद्योग आहेत. मासेमारी, शेती, बागायती, वीटनिर्मित, बांधकाम साहित्य पुरवठादार इत्यादी व्यवसायांमध्ये आज लाखो कामगार काम करीत आहेतजिल्हा निर्मिती नंतर तसेच येणाºया काळा मध्ये मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरण, नवीन रस्त्यांच्या बांधणीचे नियोजन, कापड (टेक्सटाइल्स) उद्योगाला आवश्यक असणाºया कौशल्याचे कामगारांना देण्यात आलेले प्रशिक्षण त्यामुळे भाविष्यात निर्माण होणारे मिळणारे कुशल मनुष्यबळ जिल्ह्यामधे दुसरी एमआयडीसी उभारण्याबाबतची चाचपणी, नव्याने येवू पाहणारा केळवा येथील विमान उद्योग या सर्व आशादायी घटनांमुळे पालघर जिल्ह्याचे औद्योगिक महत्व वाढणार आहे हे निश्चित आहे.नव्याने जिल्ह्याचा पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक व रासायनिककारखान्यांच्या तपासणीकरीता स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय समितीमुळे प्रदूषण व औद्योगिक अपघातावर नियंत्रण येइल, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचनालयाचे कार्यालय स्थलांतरित करण्या साठी घेतलेला पुढाकार, कामगार विभागाचा घेण्यांत येणारा सकारात्मक आढावा, तारापूर एम आय डी सी चा नियोजनबद्ध विकासाचा घेतलेला ध्यास या बाबी उद्योगवाढीसाठी महत्वपूर्ण आहेत.दुर्गम भागातील रोजगारांसाठी कुटुंबासह स्थलांतरीत होणारी आदिवासी कुटुंबे व त्यामुळे उदभवणाºया समस्या दूर करण्याकरीता त्यांंना त्यांच्या गावातच फळ, भाज्या, मोगरा, कुक्कुटपालन ई. व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देवून त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक कालबध्द कार्यक्र म जिल्हास्तरावरून आखला जातो आहे तो आशादायी असा आहे. फक्त त्याला योग्य नियोजनाच्या अंमलबजावणीची गरज आहे.-पंकज राऊत, बोईसर