शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

पालघर जिल्ह्याचे औद्योगिक भवितव्य उज्ज्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:30 IST

आकारमान आणि लोकसंख्या सह सर्वच बाबतीत अवाढव्य असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिति केल्या नंतर तीन वर्षे झपाट्याने गेली असून अपेक्षे प्रमाणे

आकारमान आणि लोकसंख्या सह सर्वच बाबतीत अवाढव्य असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिति केल्या नंतर तीन वर्षे झपाट्याने गेली असून अपेक्षे प्रमाणे किंवा अपेक्षे इतका जिल्ह्याचा विकासाचा गाडा जात नसला तरी सकारात्मक दृष्टीने घेण्यांत येणारे निर्णय व पोषक वातावरणामुळे सर्व बाबी बरोबर च उद्योगाच्या विकासालाही चालना मिळत असून मुबई आणि गुजरात च्या मध्यभागी असलेल्या पालघर जिल्ह्याचे उद्योग क्षेत्रातिल भविष्य उज्वल आहे परंतु त्या करीता अधिक पायभूत सुविधा जलद गतीने उपलब्ध करून संबंधित कार्यालये सुरु करण्याची नितांत गरज आहेआठ तालुके मिळून देशाच्या व राज्याच्या नकाशावर उदयास आलेल्या पालघर जिल्ह्यामधे महाराष्ट्रातील अग्रगण्य समजली जाणारी तारापुर एम आय डी सी, देशातील महत्वाचा व सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील अशा तारापूर अणूऊर्जा केंद्रातील चार अणुभट्या, भाभा अणू संशोधन केंद्र ( बी ए आर सी) डहाणूचा रिलायन्स एनर्जीचा प्रकल्प व फुगे उद्योगाबरोबरच पालघर, वसई, वाडा, या सर्व तालुक्यांमध्ये लहान, मध्यम व मोठ्या स्वरूपाचे सुमारे साडेतीन हजार उद्योग आहेत. मासेमारी, शेती, बागायती, वीटनिर्मित, बांधकाम साहित्य पुरवठादार इत्यादी व्यवसायांमध्ये आज लाखो कामगार काम करीत आहेतजिल्हा निर्मिती नंतर तसेच येणाºया काळा मध्ये मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरण, नवीन रस्त्यांच्या बांधणीचे नियोजन, कापड (टेक्सटाइल्स) उद्योगाला आवश्यक असणाºया कौशल्याचे कामगारांना देण्यात आलेले प्रशिक्षण त्यामुळे भाविष्यात निर्माण होणारे मिळणारे कुशल मनुष्यबळ जिल्ह्यामधे दुसरी एमआयडीसी उभारण्याबाबतची चाचपणी, नव्याने येवू पाहणारा केळवा येथील विमान उद्योग या सर्व आशादायी घटनांमुळे पालघर जिल्ह्याचे औद्योगिक महत्व वाढणार आहे हे निश्चित आहे.नव्याने जिल्ह्याचा पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक व रासायनिककारखान्यांच्या तपासणीकरीता स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय समितीमुळे प्रदूषण व औद्योगिक अपघातावर नियंत्रण येइल, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचनालयाचे कार्यालय स्थलांतरित करण्या साठी घेतलेला पुढाकार, कामगार विभागाचा घेण्यांत येणारा सकारात्मक आढावा, तारापूर एम आय डी सी चा नियोजनबद्ध विकासाचा घेतलेला ध्यास या बाबी उद्योगवाढीसाठी महत्वपूर्ण आहेत.दुर्गम भागातील रोजगारांसाठी कुटुंबासह स्थलांतरीत होणारी आदिवासी कुटुंबे व त्यामुळे उदभवणाºया समस्या दूर करण्याकरीता त्यांंना त्यांच्या गावातच फळ, भाज्या, मोगरा, कुक्कुटपालन ई. व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देवून त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक कालबध्द कार्यक्र म जिल्हास्तरावरून आखला जातो आहे तो आशादायी असा आहे. फक्त त्याला योग्य नियोजनाच्या अंमलबजावणीची गरज आहे.-पंकज राऊत, बोईसर