शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

प्रगतीशील जिल्हा म्हणून लवकरच पालघरची ओळख, पालकमंत्र्यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 00:10 IST

सागरी, नागरी व डोंगरी अशा वैविध्यपूर्ण भौगोलिक रचनेच्या जिल्ह्यात सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शाश्वत आणि नियोजनबद्ध पद्धतीने विकास सुरू आहे.

पालघर - सागरी, नागरी व डोंगरी अशा वैविध्यपूर्ण भौगोलिक रचनेच्या जिल्ह्यात सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शाश्वत आणि नियोजनबद्ध पद्धतीने विकास सुरू आहे. यामुळे आपला जिल्हा लवकरच प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल. शासन आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तसेच जनसहभाग यामुळेच हे साध्य होणार आहे. सर्वांनी मिळून एकत्रितपणे जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देऊ या, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गुरूवारी ध्वजारोहण करण्यात आले.केंद्र सरकारने काश्मीरबाबत ३७० आणि ३५ ए हे कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी पालघरच्या जनतेच्या वतीने त्यांचे मन:पूर्वक धन्यवाद व्यक्त केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरीक उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात सरासरी २४५१.१५ (१४१.९ टक्के) मिमी पावसाची नोंद झाल्याने सर्व धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. ३ व ४ आॅगस्ट या कालावधीतील अतिवृष्टीमूळे पुरात अडकलेल्या वसई, वाडा व पालघर तालुक्यातील ८०५ लोकांची सुटका करण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यासाठी एनडीआरएफ, भारतीय तट रक्षक दल, जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा व स्थनिकांनी मोलाची मदत केल्याने त्यांचे आभार व्यक्त केले.पुरपरिस्थिती मुळे मयत झालेल्या व्यक्तींना ४८ लाखाची मदत देण्यात आली असून मृत जनावरांच्या मालकांना नुकसानीपोटी १ लाख ९८ हजार रुपये, तर पावसाळ्यात पडझड झालेल्या ६०० घरांना ३३ लाख ५६ हजार रु पये मदत देण्यात आल्याचेही ते म्हणाले. अतिवृष्टीमुळे बाधीत ३ हजार २८० कुटूबांना प्रत्येकी १० किलो तांदूळ, गहु व ५ लिटर केरोसीनची मदत देण्यात आली आहे. तसेच पिकांचे नुकसानीच्या पंचनाम्याचे काम प्राधान्याने पूर्ण करु न घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष टास्क फोर्सच्या माध्यामातून केलेल्या कामामुळे यंदा कुपोषित बालकांची संख्या घटली असल्याचेही पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी सांगितले.विविध पुरस्कारांचे वितरणविविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या कामिगरीबद्दल विशेष सेवा पदक मंजूर करण्यात आलेले आहे. यामध्ये विलास सखाराम सुपे, पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा, सुधीर तात्या कटारे, पोलीस उपनिरीक्षक, कासा. पो. स्टे., अजित सदाशिव काणसे, पोलीस उपनिरीक्षक तलासरी पो. स्टे., जयेश आनंदा खदरकर, पोलीस उपनिरीक्षक विरार पो. स्टे., महेश भिमराव गावडे, पोलीस उपनिरीक्षक तलासरी पो. स्टे, प्रमोद बळीराम बनकर, पोलीस उपनिरीक्षक विरार पो.स्टे., मल्हार धनराज थोरात, पोलीस उपनिरीक्षक तुळींज पो.स्टे., नितिन नारायण कोळी, आदी.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनpalgharपालघरVasai Virarवसई विरार