शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पालघर,वाडा, डहाणूला वायूचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:11 PM

मोठी हानी : वृक्ष, विजेचे खांब कोसळले, घरांवरील पत्रे उडाले, अनेक शहरे अंधारात

पालघर : वायू चक्रीवादळ आज गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार होते मात्र या वादळाने आपली दिशा बदलली व ते पश्चिम दिशेला वळले असले तरी येत्या दोन दिवसात या वादळाने जिल्ह्यातील ११० किमीचा किनारपट्टीवरील भागाची मोठी वाताहत केली. अनेक घरांची पत्रे उडून विद्युत पोल कोसळून पडल्याने अनेक गावांना अंधारात रहावे लागले.

वायूच्या फटकाºयाने समुद्राची पातळी वाढली असून किनारपट्टीवरील अनेक गावांतील घरांना समुद्राच्या लाटांनी धडका द्यायला सुरुवात केली आहे. समुद्रात ६ मीटरच्या उंच लाटा उसळू लागल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारामध्ये एकच घबराट पसरली असून आपली घरे वाचविण्यासाठी वाळूची पोती आडोसा म्हणून घरांना लावण्यात मच्छीमारांची एकच धावपळ उडाली आहे. सातपाटी, वडराई, मुरबे, सफाळे, शिरगाव, माकूणसार आदी गावातील घरांची पत्रे उडून गेली ६० ते ७० कि.मी. प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत असल्याने काही ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. सफाळे उपविभागांतर्गत माकूनसार खाडी परिसरात एक एचटी पोल व एक डीपी स्ट्रक्चर बुधवारी रात्री पडल्याने आजूबाजूची अनेक गावातील ३ हजार ८०० ग्राहक अंधारात सापडले होते. विद्युत वितरण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी समुद्राच्या भरती आणि ओहोटीच्या पाण्याचे नियोजन करीत हे काम गुरुवारी पूर्ण करीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले.

या चक्र ीवादळाचा फटका पश्चिम रेल्वेला बसून गुजरातकडे जाणाºया ७० लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे वादळ प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून दूर असले तरी किनारपट्टी लगत असलेल्या भागातील गावात याचा धोका पाहता, खबरदारी म्हणून पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीलगत असलेल्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दरम्यान समुद्र खवळलेला राहणार असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले असले तरी सध्या पावसाळी मासेमारी बंदी असल्याने सर्व बोटी किनाºयावर पडून आहेत. दुपारनंतर नुकसानीचा अंदाज घेतला जात होता.वसई पूर्व भागात पहिल्या पावसातच विजेचा खेळखंडोबाच्पारोळ : वसई ग्रामीण भागात पहिल्या तुरळक पावसातच बुधवार व गुरुवार या दोन दिवस वीज गायब झाल्याने नागरिक हैराण असून वीज मंडळाचा गलथन कारभार समोर आला असून मान्सून पूर्व तयारी का झाली नाही असा असा प्रश्न या भागातील नागरीक विचारत आहेत.च् पारोळ, शिरवली, आडणे, भाताणें, खानिवडे, कोपर, सायवन, वडघर, करजोन, देपिवली, उसगाव, चांदीप, मांडवी, शिरासाड, इ.गावातील वीजपुरवठा खंडित झाला. बुधवार, गुरु वार दोन दिवस वीज गायब झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.च् या भागातील कारखानदार, दुकानदार, रिसॉर्ट व इतर छोट्या मोठ्या व्यावसायीकांना मोठा फटका बसला मोठा आईस्क्रीमचा साठा व्यावसायिकांनी दुकानात ठेवला असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच विजेवर चालणारे पाण्याचे पंप बंद झाल्याने पाणीटंचाईला ही सामोरे जावे लागले.वादळीवाºयांनी झोडपलेबोर्डी : वायू चक्र ीवादळाचा परिणाम १२ व १३ जून या दोन दिवसात डहाणूत दिसला. वादळीवाºयाचा जोर वाढल्याने थोड्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. मात्र कुठेही जीवितहानी झाली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. बुधवारी दुपारी पाऊस आणि जोराच्या वाºयाला प्रारंभ झाला. मात्र सायंकाळनंतर पावसाने उसंत घेतली, तरी वादळी वाºयाचा वेग गुरु वारी सायंकाळपर्यंत वाढतच गेला. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCyclone Vayuवायू चक्रीवादळ