शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

पालघरला मनसेचे उपोषण सुरू

By admin | Updated: December 16, 2015 00:23 IST

शासकीय आश्रमशाळा, वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार, शुद्ध पाणी, वीज मिळावे या मागणीला पाच महिन्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याच्या

पालघर : शासकीय आश्रमशाळा, वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार, शुद्ध पाणी, वीज मिळावे या मागणीला पाच महिन्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याच्या निषेधार्थ आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोनशे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना नित्कृष्ट दर्जाचे अन्न, तुटलेली, घाणेरड्या अवस्थेतील शौचालये, अभ्यासक्रमासाठी अपुरा पुस्तक पुरवठा, गढुळपाणी इ. नानाविध समस्येशी नेहमीच सामना करावा लागत आहे. यात सुधारणा करण्यात यावी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत या संदर्भात जिल्हाधिकारी पालघर, अप्पर आयुक्त ठाणे, प्रकल्प अधिकारी जव्हार, प्रकल्प अधिकारी डहाणू यांना निवेदने देऊनही पाच महिन्यात कुठलीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे आदिवासी गरीब विद्यार्थ्यांच्या हक्कासंदर्भात प्रशासन चालढकल करीत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष अरूण कदम यांनी करून त्यांच्या दोनशे कार्यकर्त्यांनी आजपासून पालघर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली. यावेळी दर्जेदार शिक्षण, संगणक, सुसज्ज इमारत, शौचालय, क्रीडांगण, शैक्षणिक साहित्य मिळावे, प्राथमिकव माध्यमिक शिक्षकांच्या मानधनात वाढ करावी, शासकीय आश्रमशाळा, जव्हार व डहाणू प्रकल्पातील स्त्री अधिक्षकांची रिक्तपदे तात्काळ भरण्यात यावीत, मेंढवण खुटल शासकीय आश्रमशाळांच्या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, कावळे आश्रमशाळा मधील विद्युत पुरवठा सुरळीत करून शौचालय वापरासाठी खुली करावीत, जिल्ह्यातील सरपंचाचे मानधन ५ हजार करावेत, जव्हार मधील ग्रामपंचायत मध्ये पेसा कायद्यांतर्गत निधीच्या वापरावरील बंदी हटवावी. प्राथमिक व ग्रामीण रूग्णालयात सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वाढवण, जिंदाल बंदर रद्द करावे इ. ३९ मागण्यांच्या पूर्ततेसाठी दोनशे मनसे कार्यकर्त्यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली. (वार्ताहर)