शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
3
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
4
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
5
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
6
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
7
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
8
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
9
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
10
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
11
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
12
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
13
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार
14
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
15
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
16
ताजमहलमधून सरकार एक दिवसांत किती कमाई करतं? तिकीट आणि इतर माहिती जाणून घ्या...
17
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचे पाच पांडव: कुणी होता लष्करी अधिकारी, तर कुणी सोडली लाखोंची नोकरी
18
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
19
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
20
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आदित्यनाथ योगींची सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 02:10 IST

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहिर सभा विरार येथे घेण्यात आली होती.

वसई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहिर सभा विरार येथे घेण्यात आली होती. भाजपाकडून उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आलेले योगी यावेळी पुन्हा महायुतीचे गावित यांना मत द्या म्हणून मतदारांपुढे मतांचा जोगवा मागणार आहेत. योगींची जाहिर सभा येत्या २२ एप्रिलला नालासोपारा सेंट्रल पार्क येथे घेण्यात येणार आहे.लोकसभा निवडणूकीच्या पाशर््वभूमीवर सेना-भाजपा युती झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा वसईत प्रचारासाठी येत आहेत. त्यांच्या जाहिर सभेत कोणतीही उणीव असता कामा नये म्हणून पदाधिकारी व कार्यकर्ते जोरात कामाला लागले आहेत. या अगोदर योगी १९ एप्रिलला येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता त्यात बदल केला गेला असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी दिली. पालघर लोकसभा निवडणूक प्रचारासाठी अवघ्या दहा दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपा-शिवसेनेचे अनेक मोठे नेते वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात प्रचारासाठी येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या जाहिर सभेकडे सध्या वसई-विरारच्या मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.गेल्या लोकसभा पोटनिवडणूकीच्या वेळी शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांची सभा वसईतील वसंत नगरी मैदानावर ज्या दिवशी होती त्याच दिवशी विरार मनवेलपाडा येथे योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजीत करण्यात आली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याच्या दोन दिवस अगोदर नालासोपाऱ्यात गालानगरमध्ये भोजपूरी अभिनेता मनोज तिवारी याला सोबत घेऊन उत्तर भारतीय मतदारांना भाजपाला मतदान करण्यासाठी आवाहन केले होते. या तिन्ही नेत्यांच्या सभा वसई, नालासोपारा व विरार येथे झाल्यानंतरही त्यावेळचा तिस-या स्थानाचा दावेदार पक्ष बहुजन विकास आघाडी पक्षाला फारसा मताधिक्यात फरक पडला नव्हता. मात्र आता स्थिती वेगळी आहे.गेल्या पोटनिवडणुकीत योगींचे तिखट भाषण तर उद्धवांचे प्रत्युत्तरपालघर लोकसभा पोटनिवडणूकिच्या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनाविरोधी तिखट भाषण केले होते.शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप त्यांनी करून,शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा पक्ष राहिला नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. आजची शिवसेनाही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसल्याचा टोलाही त्यांनी लावला होता. अफजल खानबरोबर शिवसेनेची तुलना करायला ते विसरले नव्हते.त्याचवेळी वसईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील सभा सुरू होती. योगी आदित्यनाथ यांनी पायात चप्पल घालून छत्रपती शिवरायांना वंदन केल्याबद्दल त्यांनी जाहिर नाराजी व्यक्त केली होती.महाराष्ट्रात येऊन योगींना विकासाचा उपदेशाचा डोस देण्याची गरज नसून,गोरखपूर येथील रूग्णालयात मृत्यू पावलेल्या बालकांबद्दल ते काही करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली होती.फक्त निवडणूक काळात ते भारतात राहात असल्याचा टोला त्यांनी लावला होता.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर