शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आदित्यनाथ योगींची सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 02:10 IST

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहिर सभा विरार येथे घेण्यात आली होती.

वसई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहिर सभा विरार येथे घेण्यात आली होती. भाजपाकडून उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आलेले योगी यावेळी पुन्हा महायुतीचे गावित यांना मत द्या म्हणून मतदारांपुढे मतांचा जोगवा मागणार आहेत. योगींची जाहिर सभा येत्या २२ एप्रिलला नालासोपारा सेंट्रल पार्क येथे घेण्यात येणार आहे.लोकसभा निवडणूकीच्या पाशर््वभूमीवर सेना-भाजपा युती झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा वसईत प्रचारासाठी येत आहेत. त्यांच्या जाहिर सभेत कोणतीही उणीव असता कामा नये म्हणून पदाधिकारी व कार्यकर्ते जोरात कामाला लागले आहेत. या अगोदर योगी १९ एप्रिलला येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता त्यात बदल केला गेला असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी दिली. पालघर लोकसभा निवडणूक प्रचारासाठी अवघ्या दहा दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपा-शिवसेनेचे अनेक मोठे नेते वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात प्रचारासाठी येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या जाहिर सभेकडे सध्या वसई-विरारच्या मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.गेल्या लोकसभा पोटनिवडणूकीच्या वेळी शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांची सभा वसईतील वसंत नगरी मैदानावर ज्या दिवशी होती त्याच दिवशी विरार मनवेलपाडा येथे योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजीत करण्यात आली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याच्या दोन दिवस अगोदर नालासोपाऱ्यात गालानगरमध्ये भोजपूरी अभिनेता मनोज तिवारी याला सोबत घेऊन उत्तर भारतीय मतदारांना भाजपाला मतदान करण्यासाठी आवाहन केले होते. या तिन्ही नेत्यांच्या सभा वसई, नालासोपारा व विरार येथे झाल्यानंतरही त्यावेळचा तिस-या स्थानाचा दावेदार पक्ष बहुजन विकास आघाडी पक्षाला फारसा मताधिक्यात फरक पडला नव्हता. मात्र आता स्थिती वेगळी आहे.गेल्या पोटनिवडणुकीत योगींचे तिखट भाषण तर उद्धवांचे प्रत्युत्तरपालघर लोकसभा पोटनिवडणूकिच्या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनाविरोधी तिखट भाषण केले होते.शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप त्यांनी करून,शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा पक्ष राहिला नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. आजची शिवसेनाही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसल्याचा टोलाही त्यांनी लावला होता. अफजल खानबरोबर शिवसेनेची तुलना करायला ते विसरले नव्हते.त्याचवेळी वसईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील सभा सुरू होती. योगी आदित्यनाथ यांनी पायात चप्पल घालून छत्रपती शिवरायांना वंदन केल्याबद्दल त्यांनी जाहिर नाराजी व्यक्त केली होती.महाराष्ट्रात येऊन योगींना विकासाचा उपदेशाचा डोस देण्याची गरज नसून,गोरखपूर येथील रूग्णालयात मृत्यू पावलेल्या बालकांबद्दल ते काही करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली होती.फक्त निवडणूक काळात ते भारतात राहात असल्याचा टोला त्यांनी लावला होता.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर