शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

पालघरमध्ये गतवर्षात १,७५५ आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:58 IST

जिल्ह्यात वर्षभरात घडले ८५६ गुन्हे; वसई वगळता जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत गुन्हेगारी घटली

- हितेन नाईकपालघर : पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत १ जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ८५६ गुन्हे नोंदविण्यात आले असून १ हजार ०७५५ आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. या सर्व गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी सुमारे ५१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून त्यात अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातील १९ कोटी ६८ लाख २३ हजार ९९९ रुपयांचा आणि चोरटी रेती वाहतूक गुन्ह्यातील १४ कोटी ६१ लाख ५५ हजार ७५८ रुपयांच्या किमतीच्या ऐवजाचा समावेश आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसांच्या बोधचिन्हाचा सन्मान राखीत जिल्ह्यात पालघर पोलिसांकडून कडक कारवाईचा बडगा उचलण्याचे काम जोराने सुरू आहे. वसई तालुका वगळता इतर तालुक्यांतील गुन्हेगारीच्या प्रकरणाचे प्रमाण कमी असून पोलिसांना गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे.जिल्ह्यातील नदी, नाले, खाड्यांतून सक्शन पंपाद्वारे चोरट्या पद्धतीने करण्यात येणारा रेतीचा उपसा पाहता पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी रेती-माफियांना जरब बसावी म्हणून पोलीस अधीक्षक गौरव सिंग हे स्वत: या कारवाईत उतरले होते. रेती चोरांविरोधात ११२ गुन्हे दाखल करून १४ कोटी ६१ लाख ५५ हजार ७५८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत २६३ आरोपींवर कारवाई केली होती.जिल्ह्यातील बहुतांशी भागात मादक द्रव्याचे छुपे वितरण करण्यात येत असून तरुण वर्ग या मादक द्रव्याच्या आहारी जात आहे. यांना रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रकरणी ११८ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींकडून १९ कोटी ६५ लाख २३ हजार ९९९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परंतु ही कारवाई तोकडी पडत असून मादक द्रव्याच्या वितरणाचे लोण आदिवासीबहुल गाव-पाडे, किनारपट्टीवरील गावातही पोचले असल्याने व्यसनाधीनतेकडे वळणाºया तरुण पिढीला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी ही कारवाई कडकपणे राबविण्याची मागणी केली जात आहे. याच बरोबरीने तरुण वर्गात आवडीचा ठरलेला, परंतु आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरलेल्या गुटख्याची विक्री सर्रासपणे पानटपरीपासून ते छोट्या-मोठ्या दुकानात राजरोसपणे सुरू असून या गुटखा विक्रीला पायबंद घालण्यासाठी गुजरात राज्यातून बेकायदेशीपणे पालघर, ठाणे व मुंबईकडे चोरट्या पद्धतीने नेण्यात येणाºया १८२ आरोपींविरोधात १२१ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून १२ कोटी ८८ लाख ३२ हजार ४५३ रुपये किमतीचा मुद्देमाल एका वर्षात जप्त करण्यात आलेला आहे. अवैध दारू विक्री आणि वाहतूक करण्याप्रकरणी दारूबंदी कायद्यानुसार ६८९ आरोपींविरोधात कारवाई करून त्यांच्यावर ६७३ गुन्हे दाखल करण्यात आले. यात अवैध दारू आणि वाहने असा २ कोटी ४९ लाख ७१ हजार ४९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जुगाऱ्यांकडून ५८ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्तपालघरमध्ये ४३६ जुगारी आरोपींविरोधात ७७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ५८ लाख २५ हजार ३८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एनडीपीएस कायद्यानुसार ११८ आरोपींविरोधात ८५ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून १९ कोटी ६८ लाख २३ हजार ९९९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, तर पिटा कायद्यानुसार १८ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३६ आरोपींवर कारवाई करून एक लाख १७ हजार ७४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आर्म अ‍ॅक्टनुसार २९ आरोपींविरोधामध्ये १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ६२ लाख ६३ हजार ३८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.