शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

रोजगार उपलब्ध करून देण्यात पालघर राज्यात प्रथमस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 23:54 IST

मनरेगाअंतर्गत २५४८ कामे : ६०,४६१ मजुरांची उपस्थिती

पालघर : जिल्ह्यात मनरेगा योजनेंतर्गत एकूण २५४८ कामे सुरू असून त्यावर ६०,४६१ मजुरांची उपस्थिती आहे. या योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षात १ एप्रिलपासून ३९,५४१ कुटुंबांतील ८०,०५० मजुरांना कामे दिली आहेत. यापैकी ३६,७३६ आदिवासी कुटुंबे असून सर्वाधिक आदिवासी कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. पालघर जिल्हा रोजगार उपलब्ध करून देण्यात राज्यात प्रथम स्थानी आहे.

जिल्ह्यात शेल्फवर १२,२८८ कामे उपलब्ध असून यापैकी ९,००९ कामे ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध आहेत. ३,२७९ कामे यंत्रणा स्तरावर उपलब्ध आहेत. २०२०-२१ मध्ये १ एप्रिलपासून आतापर्यंत ८,२९,७२६ इतकी मनुष्यदिन निर्मिती झालेली असून यात जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. या योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात मार्च २०१९ अखेर एकूण २४.६१ लक्ष इतकी मनुष्य दिवस निर्मिती झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी दिली. मनरेगा योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षात १ एप्रिलपासून आतापर्यंत १९००.०८ लक्ष इतका निधी मजुरांच्या मजुरीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे . २०१९-२० या मागील वर्षात पालघर जिल्ह्यात एकूण ६६३६.७६ लाख इतका खर्च झालेला असून त्यापैकी ५११७.६३ लाख इतकी रक्कम अकुशल मजुरीकरिता खर्च झालेली आहे.१ एप्रिलपासून केंद्र शासनाने मजुरीच्या दरामध्ये वाढ केली असून राज्यासाठी हा दर २३८ रुपये इतका निश्चित करण्यात आलेला आहे. मागील वर्षी हा दर २०६ इतका होता. राज्याकरिता मजुरीच्या दरात ३२ रुपये वाढ झालेली आहे. पालघर जिल्ह्यात मजुरांना मजुरी आठ दिवसांच्या आत प्रदान करण्याचे प्रमाण १०० टक्के आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार