शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

दुष्काळी मराठवाड्यातील शेतकरी रोजगारासाठी पालघर जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 06:13 IST

दुष्काळ : सगळी पिके गेली करपून, पोटासाठी बळीराजा देशोधडीला

वसई : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात यंदा वर्षी पाऊस कमी झाल्याने अनेक शेतकरी पोटाची खळगी भरण्यासाठी पालघर जिल्हात रोजंदारीसाठी दाखल झाले आहे. परभणी मधील जवळा बाजार, हिंगोली मधील गणेशपूर, गोंडल, जाम्ब, वटकली, नांदेड मधील हदगाव तालुक्यातील म्हाताला, न्यूघा, चक्री, मुदखेड डोणगाव, पिंपळखुटा गोपाळवाडी, दरेगाव वाडी, या ठिकाणची ३५ ते ४० कुटुंबे वसई, विरार, नालासोपारा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी रोजगाराच्या शोधात आली आहेत. नालासोपाऱ्यात आचोळे तलाव, आचोळे गाव, संतोषभुवन, निळेगाव, अग्रवाल, आंबेडकर नगर या ठिकाणी खोली भाड्याने घेऊन राहत आहेत.

गावामध्ये काम नाही म्हणून मुंबईला आलोत, मला तीन मुलं आहेत. नाक्यावर सकाळी उभे राहून कामाच्या शोधात असतो, आठवड्यातून २ दिवस काम मिळते, महागाईमुळे मिळणाºया रोजगारात भागातही नाही, शेवटी एखाद्यावेळी आमच्याकडे धान्य आणायला आणि खोलीचे भाडे देण्यासही पैसे नसतात. शासनाने आमच्या रोजगारासाठी काही तरी करणे गरजेचे आहे अशा प्रतिक्रि या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील तांड्यावरच्या जनाबाई मोरे यांनी सांगितले. नांदेड मधील पिंगळी गावचे सूर्यभान, उषा भोसले, हे आपल्या ५ महिन्याच्या बाळाला सोबत घेऊनच खोदकाम करतात. शेती नापीक झाली, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर पूर्णपणे करपून गेली, पेरणीसाठी टाकलेले पैसेही पाण्यात गेले, आणि शेवटी कर्जबाजारी झालो. अशी त्यांची व्यथा आहे.तर भुकेपोटीच मेलो असतोगावात राहिलो असतो तर आता जेवढे काही किडूक मिडूक रोजगारातून मिळते तेवढेही मिळाले नसते. म्हणून पोटासाठी गाव सोडून रोजगाराच्या शोधात आम्ही मुंबई गाठली आहे. इथेही नाक्यावर कामासाठी थाबवून रोजगार शोधत असता अशी व्यथा नांदेडचे अर्जुन गव्हाणे यांनी लोकमतकडे मांडली. 

टॅग्स :Farmerशेतकरीpalgharपालघर