शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी मराठवाड्यातील शेतकरी रोजगारासाठी पालघर जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 06:13 IST

दुष्काळ : सगळी पिके गेली करपून, पोटासाठी बळीराजा देशोधडीला

वसई : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात यंदा वर्षी पाऊस कमी झाल्याने अनेक शेतकरी पोटाची खळगी भरण्यासाठी पालघर जिल्हात रोजंदारीसाठी दाखल झाले आहे. परभणी मधील जवळा बाजार, हिंगोली मधील गणेशपूर, गोंडल, जाम्ब, वटकली, नांदेड मधील हदगाव तालुक्यातील म्हाताला, न्यूघा, चक्री, मुदखेड डोणगाव, पिंपळखुटा गोपाळवाडी, दरेगाव वाडी, या ठिकाणची ३५ ते ४० कुटुंबे वसई, विरार, नालासोपारा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी रोजगाराच्या शोधात आली आहेत. नालासोपाऱ्यात आचोळे तलाव, आचोळे गाव, संतोषभुवन, निळेगाव, अग्रवाल, आंबेडकर नगर या ठिकाणी खोली भाड्याने घेऊन राहत आहेत.

गावामध्ये काम नाही म्हणून मुंबईला आलोत, मला तीन मुलं आहेत. नाक्यावर सकाळी उभे राहून कामाच्या शोधात असतो, आठवड्यातून २ दिवस काम मिळते, महागाईमुळे मिळणाºया रोजगारात भागातही नाही, शेवटी एखाद्यावेळी आमच्याकडे धान्य आणायला आणि खोलीचे भाडे देण्यासही पैसे नसतात. शासनाने आमच्या रोजगारासाठी काही तरी करणे गरजेचे आहे अशा प्रतिक्रि या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील तांड्यावरच्या जनाबाई मोरे यांनी सांगितले. नांदेड मधील पिंगळी गावचे सूर्यभान, उषा भोसले, हे आपल्या ५ महिन्याच्या बाळाला सोबत घेऊनच खोदकाम करतात. शेती नापीक झाली, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर पूर्णपणे करपून गेली, पेरणीसाठी टाकलेले पैसेही पाण्यात गेले, आणि शेवटी कर्जबाजारी झालो. अशी त्यांची व्यथा आहे.तर भुकेपोटीच मेलो असतोगावात राहिलो असतो तर आता जेवढे काही किडूक मिडूक रोजगारातून मिळते तेवढेही मिळाले नसते. म्हणून पोटासाठी गाव सोडून रोजगाराच्या शोधात आम्ही मुंबई गाठली आहे. इथेही नाक्यावर कामासाठी थाबवून रोजगार शोधत असता अशी व्यथा नांदेडचे अर्जुन गव्हाणे यांनी लोकमतकडे मांडली. 

टॅग्स :Farmerशेतकरीpalgharपालघर