शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पालघर/भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : मतदान यंत्रांचा फज्जा, सर्वपक्षीय नेते संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 06:15 IST

राज्यात पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सोमवारी झालेली पोटनिवडणूक मतदान यंत्रांच्या बिघाडामुळे गाजली.

हितेन नाईकराज्यात पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सोमवारी झालेली पोटनिवडणूक मतदान यंत्रांच्या बिघाडामुळे गाजली. यामुळे ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह लागले आहे. कडक उन्हातही मतदानासाठी मतदार आले खरे, परंतु अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने त्यांचा हिरमोड झाला. प्रशासनाने धावपळ करीत ही यंत्रे सुरू केली. मात्र त्यामध्ये बराच वेळ निघून गेल्याने मतदानाचा टक्का घसरला. दिवसभराच्या गोंधळामुळे विरोधी पक्षांनी फेरमतदानाची मागणी केली आहे.पालघर : पोटनिवडणुकीत मतदान यंत्रे बंद पडण्याच्या प्रकाराबाबत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी तीव्र संताप व्यक्त केला. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आखलेला हा रडीचा डाव असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षांनी दिली. तर हा सारा निवडणूक आयोगाचा दोष असल्याचे म्हणत, भाजपाने याचे खापर निवडणूक आयोगावरफोडले.शिवसेनेचे प्रचारमोहीम प्रमुख आणि पालघरचे संपर्क नेते रवींद्र फाटक ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, एकीकडे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोग मोहिमा राबवित असताना, दुसरीकडे मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रेच बंद पडणे हास्यास्पद आहे. प्रत्यक्ष बॅलेट पेपरनेच मतदान घेणे योग्य ठरेल. सगळ्याच पक्षांची ही मागणी आहे. तिचा आयोगाने गंभीरपणे विचार करावा. मतदानाची वेळ वाढवून देऊ, असे जरी निवडणूक अधिकारी म्हणत असले तरी एकदा माघारी फिरलेला मतदार पुन्हा मतदान केंद्रात येणे अथवा आणणे अवघड असते.भाजपाच्या प्रचार यंत्रणेचे पालघर विधानसभा मतदारसंघाचे सूत्रधार आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, ही यंत्रे बंद पडण्याचा फटका सगळ्याच पक्षांना बसणार आहे. निवडणूक आयोगाने या यंत्रांच्या सुस्थितीची पाहणी आधी का केली नाही, असा आमचाही सवाल आहे....हा तर रडीचा डावपराभव दिसू लागल्यामुळे हा रडीचा डाव कोण खेळतो आहे हे जनतेला कळायला पाहिजे. वसई, विरार, नालासोपारा हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला आहे. नेमक्या त्याच ठिकाणी असंख्य मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे कशी बंद होतात? तीही मतदानाच्या प्रारंभीच? हा एकापरीने मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत.-हितेंद्र ठाकूर,आमदार, बहुजन विकास आघाडीनिवडणूक अधिकारी म्हणतात, वेळ वाढवून देऊअनेक केंद्रांवरील मतदान यंत्रे बंद पडल्यामुळे वाया गेलेल्या वेळेइतकी मतदानाची वेळ वाढवून देऊ असे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले आहे. परंतु जे मतदार मतदान न करता परत गेले ते परत येतील का?- दामू शिंगडा,काँग्रेसचे उमेदवारबॅलेट पेपर व्होटिंग सिस्टीम योग्यअनेक केंद्रांवरील मतदान यंत्रे बंद पडल्यामुळे वाया गेलेल्या वेळेइतकी मतदानाची वेळ वाढवून देऊ, असे जिल्हाधिकाºयांनी आम्हाला सांगितले आहे. परंतु, जे मतदार मतदान न करता परत गेले ते पुन्हा येतील का? याची शाश्वती कोणीच देऊ शकणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बॅलेट पेपर व्होटिंग सिस्टीम सुरू करावी, असे आमचे मत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018