शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
2
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
3
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
4
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
5
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
6
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
7
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
9
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
10
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
11
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
12
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
13
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
14
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
15
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
16
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
17
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
18
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
19
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
20
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

पालघर/भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : मतदान यंत्रांचा फज्जा, सर्वपक्षीय नेते संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 06:15 IST

राज्यात पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सोमवारी झालेली पोटनिवडणूक मतदान यंत्रांच्या बिघाडामुळे गाजली.

हितेन नाईकराज्यात पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सोमवारी झालेली पोटनिवडणूक मतदान यंत्रांच्या बिघाडामुळे गाजली. यामुळे ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह लागले आहे. कडक उन्हातही मतदानासाठी मतदार आले खरे, परंतु अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने त्यांचा हिरमोड झाला. प्रशासनाने धावपळ करीत ही यंत्रे सुरू केली. मात्र त्यामध्ये बराच वेळ निघून गेल्याने मतदानाचा टक्का घसरला. दिवसभराच्या गोंधळामुळे विरोधी पक्षांनी फेरमतदानाची मागणी केली आहे.पालघर : पोटनिवडणुकीत मतदान यंत्रे बंद पडण्याच्या प्रकाराबाबत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी तीव्र संताप व्यक्त केला. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आखलेला हा रडीचा डाव असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षांनी दिली. तर हा सारा निवडणूक आयोगाचा दोष असल्याचे म्हणत, भाजपाने याचे खापर निवडणूक आयोगावरफोडले.शिवसेनेचे प्रचारमोहीम प्रमुख आणि पालघरचे संपर्क नेते रवींद्र फाटक ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, एकीकडे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोग मोहिमा राबवित असताना, दुसरीकडे मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रेच बंद पडणे हास्यास्पद आहे. प्रत्यक्ष बॅलेट पेपरनेच मतदान घेणे योग्य ठरेल. सगळ्याच पक्षांची ही मागणी आहे. तिचा आयोगाने गंभीरपणे विचार करावा. मतदानाची वेळ वाढवून देऊ, असे जरी निवडणूक अधिकारी म्हणत असले तरी एकदा माघारी फिरलेला मतदार पुन्हा मतदान केंद्रात येणे अथवा आणणे अवघड असते.भाजपाच्या प्रचार यंत्रणेचे पालघर विधानसभा मतदारसंघाचे सूत्रधार आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, ही यंत्रे बंद पडण्याचा फटका सगळ्याच पक्षांना बसणार आहे. निवडणूक आयोगाने या यंत्रांच्या सुस्थितीची पाहणी आधी का केली नाही, असा आमचाही सवाल आहे....हा तर रडीचा डावपराभव दिसू लागल्यामुळे हा रडीचा डाव कोण खेळतो आहे हे जनतेला कळायला पाहिजे. वसई, विरार, नालासोपारा हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला आहे. नेमक्या त्याच ठिकाणी असंख्य मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे कशी बंद होतात? तीही मतदानाच्या प्रारंभीच? हा एकापरीने मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत.-हितेंद्र ठाकूर,आमदार, बहुजन विकास आघाडीनिवडणूक अधिकारी म्हणतात, वेळ वाढवून देऊअनेक केंद्रांवरील मतदान यंत्रे बंद पडल्यामुळे वाया गेलेल्या वेळेइतकी मतदानाची वेळ वाढवून देऊ असे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले आहे. परंतु जे मतदार मतदान न करता परत गेले ते परत येतील का?- दामू शिंगडा,काँग्रेसचे उमेदवारबॅलेट पेपर व्होटिंग सिस्टीम योग्यअनेक केंद्रांवरील मतदान यंत्रे बंद पडल्यामुळे वाया गेलेल्या वेळेइतकी मतदानाची वेळ वाढवून देऊ, असे जिल्हाधिकाºयांनी आम्हाला सांगितले आहे. परंतु, जे मतदार मतदान न करता परत गेले ते पुन्हा येतील का? याची शाश्वती कोणीच देऊ शकणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बॅलेट पेपर व्होटिंग सिस्टीम सुरू करावी, असे आमचे मत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018