शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

पालघर/भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : मतदान यंत्रांचा फज्जा, सर्वपक्षीय नेते संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 06:15 IST

राज्यात पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सोमवारी झालेली पोटनिवडणूक मतदान यंत्रांच्या बिघाडामुळे गाजली.

हितेन नाईकराज्यात पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सोमवारी झालेली पोटनिवडणूक मतदान यंत्रांच्या बिघाडामुळे गाजली. यामुळे ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह लागले आहे. कडक उन्हातही मतदानासाठी मतदार आले खरे, परंतु अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने त्यांचा हिरमोड झाला. प्रशासनाने धावपळ करीत ही यंत्रे सुरू केली. मात्र त्यामध्ये बराच वेळ निघून गेल्याने मतदानाचा टक्का घसरला. दिवसभराच्या गोंधळामुळे विरोधी पक्षांनी फेरमतदानाची मागणी केली आहे.पालघर : पोटनिवडणुकीत मतदान यंत्रे बंद पडण्याच्या प्रकाराबाबत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी तीव्र संताप व्यक्त केला. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आखलेला हा रडीचा डाव असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षांनी दिली. तर हा सारा निवडणूक आयोगाचा दोष असल्याचे म्हणत, भाजपाने याचे खापर निवडणूक आयोगावरफोडले.शिवसेनेचे प्रचारमोहीम प्रमुख आणि पालघरचे संपर्क नेते रवींद्र फाटक ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, एकीकडे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोग मोहिमा राबवित असताना, दुसरीकडे मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रेच बंद पडणे हास्यास्पद आहे. प्रत्यक्ष बॅलेट पेपरनेच मतदान घेणे योग्य ठरेल. सगळ्याच पक्षांची ही मागणी आहे. तिचा आयोगाने गंभीरपणे विचार करावा. मतदानाची वेळ वाढवून देऊ, असे जरी निवडणूक अधिकारी म्हणत असले तरी एकदा माघारी फिरलेला मतदार पुन्हा मतदान केंद्रात येणे अथवा आणणे अवघड असते.भाजपाच्या प्रचार यंत्रणेचे पालघर विधानसभा मतदारसंघाचे सूत्रधार आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, ही यंत्रे बंद पडण्याचा फटका सगळ्याच पक्षांना बसणार आहे. निवडणूक आयोगाने या यंत्रांच्या सुस्थितीची पाहणी आधी का केली नाही, असा आमचाही सवाल आहे....हा तर रडीचा डावपराभव दिसू लागल्यामुळे हा रडीचा डाव कोण खेळतो आहे हे जनतेला कळायला पाहिजे. वसई, विरार, नालासोपारा हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला आहे. नेमक्या त्याच ठिकाणी असंख्य मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे कशी बंद होतात? तीही मतदानाच्या प्रारंभीच? हा एकापरीने मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत.-हितेंद्र ठाकूर,आमदार, बहुजन विकास आघाडीनिवडणूक अधिकारी म्हणतात, वेळ वाढवून देऊअनेक केंद्रांवरील मतदान यंत्रे बंद पडल्यामुळे वाया गेलेल्या वेळेइतकी मतदानाची वेळ वाढवून देऊ असे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले आहे. परंतु जे मतदार मतदान न करता परत गेले ते परत येतील का?- दामू शिंगडा,काँग्रेसचे उमेदवारबॅलेट पेपर व्होटिंग सिस्टीम योग्यअनेक केंद्रांवरील मतदान यंत्रे बंद पडल्यामुळे वाया गेलेल्या वेळेइतकी मतदानाची वेळ वाढवून देऊ, असे जिल्हाधिकाºयांनी आम्हाला सांगितले आहे. परंतु, जे मतदार मतदान न करता परत गेले ते पुन्हा येतील का? याची शाश्वती कोणीच देऊ शकणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बॅलेट पेपर व्होटिंग सिस्टीम सुरू करावी, असे आमचे मत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018