शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

पालघरमध्ये 68 हजार 260 रुग्णांनी केली कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 00:40 IST

वाढत्या रुग्णसंख्येत समाधानाची बाब : आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न

पालघर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून, अनेक रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. याचवेळी जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असून, योग्य ती काळजी घेतल्यास तसेच सकारात्मक विचारांनी कोरोनावर मात करता येते, हाच संदेश या आजारातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांकडून मिळत आहे. दरम्यान, संपूर्ण पालघर जिल्ह्यात आजवर ६८ हजार २६० रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट ७६.६५ टक्के असून, मृत्यूदर १.४२ टक्के आहे.

पालघरच्या ग्रामीण भागात यावेळी कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. आरोग्य खात्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, रविवारी डहाणू तालुका ८४, जव्हार ३२, मोखाडा २३, पालघर ४९४, तलासरी ५ आणि विक्रमगड ५ असे ग्रामीण परिसरात नवीन रुग्ण आढळले. वसई ग्रामीण आणि वाडा तालुक्यांमध्ये मात्र रविवारी नवीन रुग्ण न आढळल्याने दिलासा मिळाला आहे. सध्या पालघरच्या ग्रामीण भागात डहाणू तालुका १ हजार ९२, जव्हार ६१४, मोखाडा ३५१, पालघर ४ हजार २१९, तलासरी ४०९, वसई ग्रामीण १३४ विक्रमगड २२२ तर वाडा तालुक्यात ४०५ रुग्ण उपचार घेत आहेत.पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजवर ३३ हजार ९५० रुग्ण कोरोनामुळे बाधित आढळले आहेत. मात्र, यातून तब्बल २६ हजार रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे, तर सध्या ७ हजार ४४६ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट ७६.६५ टक्के असून, मृत्यूदर १.४२ टक्के आहे.

वसईकरांनाही दिलासा वसई-विरार क्षेत्रामध्येही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पालिका हद्दीत आजवर ५४ हजारपेक्षा अधिक लोक बाधित आढळले आहेत, मात्र त्याचवेळी तेथेही कोरोना संकटावर मात करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. वसई-विरारमध्ये ४२ हजारपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. 

टॅग्स :palgharपालघर