शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

पालघरमध्ये 68 हजार 260 रुग्णांनी केली कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 00:40 IST

वाढत्या रुग्णसंख्येत समाधानाची बाब : आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न

पालघर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून, अनेक रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. याचवेळी जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असून, योग्य ती काळजी घेतल्यास तसेच सकारात्मक विचारांनी कोरोनावर मात करता येते, हाच संदेश या आजारातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांकडून मिळत आहे. दरम्यान, संपूर्ण पालघर जिल्ह्यात आजवर ६८ हजार २६० रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट ७६.६५ टक्के असून, मृत्यूदर १.४२ टक्के आहे.

पालघरच्या ग्रामीण भागात यावेळी कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. आरोग्य खात्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, रविवारी डहाणू तालुका ८४, जव्हार ३२, मोखाडा २३, पालघर ४९४, तलासरी ५ आणि विक्रमगड ५ असे ग्रामीण परिसरात नवीन रुग्ण आढळले. वसई ग्रामीण आणि वाडा तालुक्यांमध्ये मात्र रविवारी नवीन रुग्ण न आढळल्याने दिलासा मिळाला आहे. सध्या पालघरच्या ग्रामीण भागात डहाणू तालुका १ हजार ९२, जव्हार ६१४, मोखाडा ३५१, पालघर ४ हजार २१९, तलासरी ४०९, वसई ग्रामीण १३४ विक्रमगड २२२ तर वाडा तालुक्यात ४०५ रुग्ण उपचार घेत आहेत.पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजवर ३३ हजार ९५० रुग्ण कोरोनामुळे बाधित आढळले आहेत. मात्र, यातून तब्बल २६ हजार रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे, तर सध्या ७ हजार ४४६ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट ७६.६५ टक्के असून, मृत्यूदर १.४२ टक्के आहे.

वसईकरांनाही दिलासा वसई-विरार क्षेत्रामध्येही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पालिका हद्दीत आजवर ५४ हजारपेक्षा अधिक लोक बाधित आढळले आहेत, मात्र त्याचवेळी तेथेही कोरोना संकटावर मात करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. वसई-विरारमध्ये ४२ हजारपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. 

टॅग्स :palgharपालघर