शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

पालघरमध्ये 68 हजार 260 रुग्णांनी केली कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 00:40 IST

वाढत्या रुग्णसंख्येत समाधानाची बाब : आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न

पालघर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून, अनेक रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. याचवेळी जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असून, योग्य ती काळजी घेतल्यास तसेच सकारात्मक विचारांनी कोरोनावर मात करता येते, हाच संदेश या आजारातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांकडून मिळत आहे. दरम्यान, संपूर्ण पालघर जिल्ह्यात आजवर ६८ हजार २६० रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट ७६.६५ टक्के असून, मृत्यूदर १.४२ टक्के आहे.

पालघरच्या ग्रामीण भागात यावेळी कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. आरोग्य खात्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, रविवारी डहाणू तालुका ८४, जव्हार ३२, मोखाडा २३, पालघर ४९४, तलासरी ५ आणि विक्रमगड ५ असे ग्रामीण परिसरात नवीन रुग्ण आढळले. वसई ग्रामीण आणि वाडा तालुक्यांमध्ये मात्र रविवारी नवीन रुग्ण न आढळल्याने दिलासा मिळाला आहे. सध्या पालघरच्या ग्रामीण भागात डहाणू तालुका १ हजार ९२, जव्हार ६१४, मोखाडा ३५१, पालघर ४ हजार २१९, तलासरी ४०९, वसई ग्रामीण १३४ विक्रमगड २२२ तर वाडा तालुक्यात ४०५ रुग्ण उपचार घेत आहेत.पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजवर ३३ हजार ९५० रुग्ण कोरोनामुळे बाधित आढळले आहेत. मात्र, यातून तब्बल २६ हजार रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे, तर सध्या ७ हजार ४४६ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट ७६.६५ टक्के असून, मृत्यूदर १.४२ टक्के आहे.

वसईकरांनाही दिलासा वसई-विरार क्षेत्रामध्येही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पालिका हद्दीत आजवर ५४ हजारपेक्षा अधिक लोक बाधित आढळले आहेत, मात्र त्याचवेळी तेथेही कोरोना संकटावर मात करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. वसई-विरारमध्ये ४२ हजारपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. 

टॅग्स :palgharपालघर