शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

यंदा भातशेतीचा हंगामही हातून जाणार?; भाजीपाला गेला सडून, कडधान्याला लागली कीड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 06:08 IST

बळीराजा संकटात

वाडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भाजीपाला तसेच कडधान्याचे पीक चांगले आले, पण लॉकडाऊनमुळे मार्केट बंद होते. संचारबंदीमुळे भाजीपाला शेतातच सडून गेला. तर कडधान्यही विकले जात नसल्याने त्यालाही कीड लागू लागली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून काहीच पैसे हाती आले नसल्याने यंदा भातशेतीचा हंगामही हातून जाणार का, अशी चिंता त्यांना भेडसावते आहे.

सरकारने यंदा थकित शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करून नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना ५० हजार रुपये देण्यात येतील, असे जाहीर केले होते. ध्यानीमनी नसताना अचानकच कोरोनाचे संकट देशावर ओढावले. यातून बाहेर येण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असून आता सरकारही आर्थिक संकटात सापडले आहे. यामुळे शेतकºयांचा प्रश्न मागे पडला. या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी शासनाचे सहकार्य मिळावे अशी शेतकºयांची अपेक्षा आहे. जेणेकरून भातशेतीचा हंगाम तरी हातून निघून जाऊ नये. बळीराजा पुन्हा उभारी घेईल, अशी काही तरी ठोस उपाययोजना शासनाने करावी, अशी मागणी शेतकरी नेते प्रफुल्ल पाटील यांनी केली आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीने भातशेती वाया गेली. तर यंदा कोरोनामुळे शेतकºयांच्या सगळ्या आशा धुळीस मिळाल्या. यातून सावरण्यासाठी शासनाचे सहकार्य मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी