शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पारोळ परिसरात भातशेतीवर खोडकिडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:12 IST

वसई पूर्व भागातील पारोळ, माजिवली, देपिवली, तिल्हेर, शिरवली, घाटेघर, करजोंण, इ गावातील शेकडो एकर भातशेतीवर खोडकीड्याने भात पीकावर हल्ला केल्याने तोंडाशी आलेले पीक

सुनिल घरतपारोळ : वसई पूर्व भागातील पारोळ, माजिवली, देपिवली, तिल्हेर, शिरवली, घाटेघर, करजोंण, इ गावातील शेकडो एकर भातशेतीवर खोडकीड्याने भात पीकावर हल्ला केल्याने तोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने या भागातील बळीराजापुढे या वर्षी खावटीचा प्रश्न उभा राहिला आहे.या वर्षी पावसाने चांगली साथ दिली. भात लावणी ही हंगामातच झाली वेळोवेळी खताची तसेच औषधाची योग्य मात्रा ही दिली. या साठी शेतकºयांनी उसनवार करून खर्चही केला. भातशेती परवडत नसतांनाही वर्षभराच्या खावटीचा प्रश्न सुटावा यासाठी भात शेती केली. पण या हंगामात उभे पीक वाया गेल्याने कपाळाला हात लावायची वेळ आली आहे. तसेच या खोडकीडयाची संकरीत बियाण्याला लागण झाल्याने त्याबाबत शेतकरी साशंक आहेत.कोंदट, उष्ण वातावरणामुळे भातपिकांवर करपाचा प्रादुर्भावविक्रमगड : सद्यस्थितीत वातावरणात वारंवार बदल होत असून मध्येच झालेल्या परतीच्या पावसाच्या धुमाकुळाने वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे़ या कोंदट, उष्ण वातावरणामुळे भातपिकावर करपाचा प्रादूर्भाव झाला असून तालुक्यात याचा फैलाव होण्याअगोदरच प्रशासनाने योग्य खबरदारी घेणे जरुरीचे आहे़ बास्ते गावातील अनेक शेतक-यांच्या तसेच कुंर्झे येथील शेतकरी सुनिल मिठारा भोईर तर आपटी बु येथील शेतकरी संजय रुपजी डोले यांनी लागवड केलेल्या भाताच्या खाचरांमध्ये करपाने शिरकाव केला असून योग्य उपाययोजना न झाल्यास भाताचे संपूर्ण पिक नष्ट होईल असे त्यांनी सांगितले़ याबाबत तालुका कृषी कार्यालय व तहसिलदार यांच्याकडे तक्रारीही केलेल्या आहेत़या रोगामुळे तालुक्यातील १५ ते २० टक्के पिकांवर याचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून भातपिके २० टक्क्याहून अधिक घटण्याचा अंदाज बास्ते येथील शेतकरी व पोलिस पाटील सुभाष पाटील यांनी वर्तविला आहे़ रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे़ यामुळे हजारो रुपयांचे पिक नष्ट होण्याची शक्यता आहे. अनियमित पावसामुळे दरवर्षी नुकसान व्हायचे तर यंदा चांगले पिक हाती येत आहे असे दिसत असतांना शेवटच्या घडीला रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विक्रमगड तालुक्यात पावसाळी शेतीवरच ९० टक्के शेतक-यांचा उदरनिर्वाह चालतो़ त्यामुळे शेतकºयांना मदत करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यांत येत आहे़- सुनिल मिठाराम भोईर,पिडीत शेतकरी, कुर्झे

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी