शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

वसई तालुक्यात भातकापणीची कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 23:44 IST

नैसर्गिक आणि कोरोना अशा दोन्ही आपत्तींचा आर्थिक स्तरावर वसईतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

विरार : पालघर जिल्ह्यात कापणीच्या हंगामात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने माेठ्या प्रमाणावर भातपीक वाया गेले. वसई तालुक्यातील शेतकऱ्यांनाही त्याचा जबरदस्त फटका बसला हाेता. शेतीवर केलेला खर्च असा डाेळ्यांदेखत पाण्यात गेल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डाेळ्यांत आसू उभे राहिले. मात्र, खाचरात पाणी साचून राहिल्याने जे तयार पीक उरले हाेते, त्याची कापणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे.

नैसर्गिक आणि कोरोना अशा दोन्ही आपत्तींचा आर्थिक स्तरावर वसईतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अवकाळीच्या तडाख्यानंतर जे भातपीक वाचले आहे, ते त्याची कापणी आणि झोडणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागून असलेला ससुनवघर, बापाणे, जूचंद्र, मालजीपाडा तसेच वसई पूर्वेतील कामण-चिंचोटी परिसर तसेच विरार पूर्वेतील सकवार, भारोळ, चंदनसारपर्यंतचा परिसर भातशेती लागवड करणारा मोठा ग्रामीण परिसर आहे.

दरवर्षी मान्सून पर्जन्यावर कसली जाणारी येथील भातशेती स्थानिक शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. काही वर्षांपासून पावसाची अनियमितता, अतिवृष्टी, ऐन भातकापणीच्या हंगामात अवकाळीचा तडाखा अशा लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांना या परिस्थितीला ताेंड द्यावे लागले. हजाराे हेक्टरवरील उभी पिके आडवी झाली. त्यातूनही वाचलेले भातपीक कापून त्यांचे भारे शेतकऱ्यांनी खळ्यात आणून झोडणीला वेग दिला आहे. अवकाळीने शेतकऱ्यांच्या हाती  खर्चही लागणार नसल्यामुळे उदरनिर्वाह कसा भागवायचा, असा प्रश्‍न उपस्थित हाेत आहे. नुकसानीचे शासनाने पंचनामे करूनही अद्याप त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरार