शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

दफनभूमीच्या मार्गातील अडथळा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 01:39 IST

वसई-विरार महापालिका । पाणथळ विभागाचीही परवानगी

वसई : सात ते आठ वर्षांपासून कायद्याच्या कचाट्यात सापडून रखडपट्टी झालेल्या वसईच्या दिवाणमान येथील सनसिटी येथील सर्वधर्मीय दफनभूमी विकसित करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासाठी महाराष्ट्र सागरी व्यवस्थापन प्राधिकरणानंतर पाणथळ जागेच्या नियमांनुसारही परवानगी मिळाली आहे.

वसई-विरार शहर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर साधारण पहिल्याच टर्ममध्ये प्रथम महापालिका प्रशासनाने सरकारी जागा पालिकेच्या ताब्यात देण्याबाबत आग्रह धरला. त्यानुसार, तिथे सर्वधर्मीयांसाठी दफनभूमी तयार करण्याची योजना तयार केली आणि त्याचा पाठपुरावाही सुरू केला.सर्वप्रथम त्यासाठी वसईच्या सनसिटी येथे ११ एकर जागा आरक्षित केली. राज्य शासनाकडून २०११ मध्ये ही जागा महापालिकेच्या ताब्यात आली होती. पालिकेने ठराव करत २०१२-१३ मध्ये या जागेवर मातीभराव करून संरक्षक भिंत बांधली. मात्र, नागरी वसाहत असल्याने या प्रस्तावित दफनभूमीला स्थानिक नागरिक आणि काही राजकीय पक्ष व संघटनांनी विरोध केला होता.

खाजण जागेवर पालिकेने केलेले दफनभूमीचे बांधकाम हे सागरी किनारा नियंत्रण क्षेत्राचे उल्लंघन करणारे असल्याचा गंभीर आरोप करून तेव्हा शिवसेनेच्या सुनील मुळये यांनी पुणे येथील हरित लवादाकडे तक्रार केली. यानंतर हरित लवादाने या जागेवरील संरक्षक भिंतीचे बांधकाम थांबवून भिंत पाडण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून आजपर्यंत या दफनभूमीचे काम रखडले होते. मात्र आता संबंधित विभागांची परवानगी मिळाल्यामुळे दफनभूमीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. दफनभूमीच्या कामासाठी ज्या परवानग्या आवश्यक होत्या, त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, अशी माहिती पालिकेचे नगररचना विभागाचे संचालक वाय.एस. रेड्डी यांनी ‘लोकमत’ला दिली.वसईतील दिवाणमान सनसिटी येथील दफनभूमीच्या कामासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. यापुढे दफनभूमी बांधण्याचे व ती विकसित करण्याचे काम हा प्रशासकीय निर्णय आहे. विशेष प्रशासकीय स्तरावर हे काम पुढे नेले जाईल.- वाय.एस. रेड्डी, संचालक,नगररचना विभाग, वसई-विरार महापालिका