शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सूर्या प्रकल्पाचे कालवे ४० वर्षानंतरही अपूर्णच, शासन व लोकप्रतिनिधींकडून उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 03:12 IST

जिल्हयातील शेतीला उन्हाळयात पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अपूर्ण अवस्थेत असल्याने संबधित क्षेत्रातील शेतक-यांची घोर निराशा झाली आहे. कालवे तयार करण्यासाठी करोडो रूपयांचा केलेला शासनाचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे जिल्हयातील ग्रामीण भागाला हरीत क्रांतीचे स्वप्न अपूरे राहणार आहे.

शशिकांत ठाकूर ।कासा : जिल्हयातील शेतीला उन्हाळयात पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अपूर्ण अवस्थेत असल्याने संबधित क्षेत्रातील शेतक-यांची घोर निराशा झाली आहे. कालवे तयार करण्यासाठी करोडो रूपयांचा केलेला शासनाचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे जिल्हयातील ग्रामीण भागाला हरीत क्रांतीचे स्वप्न अपूरे राहणार आहे.सिंचन हा प्रमुख उद्देश ठेवून सन १९७५ साली कासा जवळील धामणी येथे सूर्यानदीवर धरण बांधण्यात आले व त्याखाली पाणी नदीत व कालव्यात सोडण्यासाठी व नियंत्रणासाठी कडवास हे मातीभरावाचे धरण बांधण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत पालघर ८५२५ हेक्टर, डहणू, ६१४१ हेक्टर विक्रमगड ३० हेक्टर अशी एकूण १६६९६ हेक्टर जमीन ओलीताखाली आणण्यात आली. या सूर्या प्रकल्पासाठी धामणी, सावा, भिवाडी, धरमपूर, कवडास, शेणसरी, तलवाडा आदी गावातील शेकडो कुटुंबे विस्थापित करण्यात आली. व त्याचे पुनर्वसन वाणगांव जवळील चंद्रनगर, हनुमान नगर येथे करण्यात आले. मात्र त्यांनाही अद्याप सर्वच भौतिक सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. तसेच शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कालवे तयार करण्यात आले व त्यासाठी शेतकºयांच्या जमीनी संपादित करण्यात आल्या मात्र त्यापैकी आंबेदा, बºहाणपूर, सोमटा, चिंचपाडा भागातील काही शेतकाºयांना कालव्यात गेलेल्या जमीनीचा अद्याप मोबदलाही मिळालेला नाही. दरम्यान वनजमीनीच्या अडथळयामुळे डावा तीर मुख्य कालव्याचे सुमारे दिड ते दोन किमी काम अपूर्ण आहे. त्यामुळे सुमारे २२०६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही. त्यामुळे किराट, आलोंडे, फुलपाडा, नागझरी, निहे दामखिंड, वेळगांवा, चरी, गुंदले, करवेले, पांदरे, गिरनोली, पडघे, वारंघडे आदी गावांतील शेतकºयांना अद्याप पाणी मिळालेले नाही. मात्र मुख्यकालव्याचे काम अपूर्ण असतांना गावागावात व शेताकडे जाणारे उपकालवे तयार करण्यात आले आणि पाण्याचा ठावठिकाणा नसतांनाही २० वर्षापूर्वी या कालव्याचे पक्के बांधकाम व दुरूस्तीसाठी लाखो रूपये खर्च करण्यात आले. त्यामुळे कालवे खोदून ४० वर्षे झाली तरी शेतकºयांना पाणीही नाही आणि जमीनीही गेल्या अशी स्थिती झाली आहे. १० वर्षापूर्वी सूर्याकालव्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे कारणपुढे करत सूर्याची सर्व कार्यालये बंद करून ती शहपूर येथील भातसा कालवा क्र. ११ ला जोडण्यात आले मात्र मागील वर्षापासून शेतकºयांनी वारंवार मागणी केल्याने हे कार्यालय पुन्हा मनोर येथे सुरू करण्यात आले. मात्र दुरूस्तीची व साफसफाईची वेळोवेळी कामे न केल्याने कालव्यातून ठिकठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने शेतीला अपूरा पाणी पूरवठा होत आहे.सूर्या प्रकल्पाचे काम आदिवासी विकास विभागाच्या निधीतून झाले आहे. त्यामुळे त्याचा लाभ येथील शेतकºयांना झाला पाहिजे आणि प्रकल्पाचे काम अपूर्ण असतांना बाहेर पाणी देवू नये.-राजेंद्र गावित, माजी राज्यमंत्री