शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

सूर्या प्रकल्पाचे कालवे ४० वर्षानंतरही अपूर्णच, शासन व लोकप्रतिनिधींकडून उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 03:12 IST

जिल्हयातील शेतीला उन्हाळयात पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अपूर्ण अवस्थेत असल्याने संबधित क्षेत्रातील शेतक-यांची घोर निराशा झाली आहे. कालवे तयार करण्यासाठी करोडो रूपयांचा केलेला शासनाचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे जिल्हयातील ग्रामीण भागाला हरीत क्रांतीचे स्वप्न अपूरे राहणार आहे.

शशिकांत ठाकूर ।कासा : जिल्हयातील शेतीला उन्हाळयात पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अपूर्ण अवस्थेत असल्याने संबधित क्षेत्रातील शेतक-यांची घोर निराशा झाली आहे. कालवे तयार करण्यासाठी करोडो रूपयांचा केलेला शासनाचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे जिल्हयातील ग्रामीण भागाला हरीत क्रांतीचे स्वप्न अपूरे राहणार आहे.सिंचन हा प्रमुख उद्देश ठेवून सन १९७५ साली कासा जवळील धामणी येथे सूर्यानदीवर धरण बांधण्यात आले व त्याखाली पाणी नदीत व कालव्यात सोडण्यासाठी व नियंत्रणासाठी कडवास हे मातीभरावाचे धरण बांधण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत पालघर ८५२५ हेक्टर, डहणू, ६१४१ हेक्टर विक्रमगड ३० हेक्टर अशी एकूण १६६९६ हेक्टर जमीन ओलीताखाली आणण्यात आली. या सूर्या प्रकल्पासाठी धामणी, सावा, भिवाडी, धरमपूर, कवडास, शेणसरी, तलवाडा आदी गावातील शेकडो कुटुंबे विस्थापित करण्यात आली. व त्याचे पुनर्वसन वाणगांव जवळील चंद्रनगर, हनुमान नगर येथे करण्यात आले. मात्र त्यांनाही अद्याप सर्वच भौतिक सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. तसेच शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कालवे तयार करण्यात आले व त्यासाठी शेतकºयांच्या जमीनी संपादित करण्यात आल्या मात्र त्यापैकी आंबेदा, बºहाणपूर, सोमटा, चिंचपाडा भागातील काही शेतकाºयांना कालव्यात गेलेल्या जमीनीचा अद्याप मोबदलाही मिळालेला नाही. दरम्यान वनजमीनीच्या अडथळयामुळे डावा तीर मुख्य कालव्याचे सुमारे दिड ते दोन किमी काम अपूर्ण आहे. त्यामुळे सुमारे २२०६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही. त्यामुळे किराट, आलोंडे, फुलपाडा, नागझरी, निहे दामखिंड, वेळगांवा, चरी, गुंदले, करवेले, पांदरे, गिरनोली, पडघे, वारंघडे आदी गावांतील शेतकºयांना अद्याप पाणी मिळालेले नाही. मात्र मुख्यकालव्याचे काम अपूर्ण असतांना गावागावात व शेताकडे जाणारे उपकालवे तयार करण्यात आले आणि पाण्याचा ठावठिकाणा नसतांनाही २० वर्षापूर्वी या कालव्याचे पक्के बांधकाम व दुरूस्तीसाठी लाखो रूपये खर्च करण्यात आले. त्यामुळे कालवे खोदून ४० वर्षे झाली तरी शेतकºयांना पाणीही नाही आणि जमीनीही गेल्या अशी स्थिती झाली आहे. १० वर्षापूर्वी सूर्याकालव्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे कारणपुढे करत सूर्याची सर्व कार्यालये बंद करून ती शहपूर येथील भातसा कालवा क्र. ११ ला जोडण्यात आले मात्र मागील वर्षापासून शेतकºयांनी वारंवार मागणी केल्याने हे कार्यालय पुन्हा मनोर येथे सुरू करण्यात आले. मात्र दुरूस्तीची व साफसफाईची वेळोवेळी कामे न केल्याने कालव्यातून ठिकठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने शेतीला अपूरा पाणी पूरवठा होत आहे.सूर्या प्रकल्पाचे काम आदिवासी विकास विभागाच्या निधीतून झाले आहे. त्यामुळे त्याचा लाभ येथील शेतकºयांना झाला पाहिजे आणि प्रकल्पाचे काम अपूर्ण असतांना बाहेर पाणी देवू नये.-राजेंद्र गावित, माजी राज्यमंत्री