शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जिल्ह्यात 717 पैकी केवळ 240 शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:06 IST

पहिल्या दिवशी फक्त ६.९८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती : पालक-विद्यार्थ्यांमध्ये अद्याप कोरोना संसर्गाची भीती 

- हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २२ मार्चपासून बंद असलेल्या नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ७१७ शाळांपैकी केवळ २४० शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात ९ ते १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १ लाख ७८ हजार ६०७ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ५५५ विद्यार्थी म्हणजेच फक्त ६.९८ टक्के विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये उपस्थिती नोंदविल्याने अजूनही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याची जोखीम उचलण्यास इच्छुक नसल्याचे दिसून आले आहे.

मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील बंद असलेल्या शाळा सोमवारपासून अखेर सुरू होत ९वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. शाळा चालू होणे ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगली बाब असल्याने प्रत्येकाने स्वतःची स्वत:च काळजी घ्यायला हवी. शाळा सुरू झाल्यामुळे एक चांगले वातावरण तयार होईल व याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे काही शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी अजूनही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यात इच्छुक नसल्याचे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत असले तरी नव्या स्ट्रेनचे ८ रुग्ण राज्यात सापडले आहेत. पालघर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गुजरात राज्यात नव्या स्ट्रेनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून जिल्ह्याच्या जवळ असलेल्या मीरा-भाईंदरमध्येही एक रुग्ण सापडल्याने पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार ६०७ विद्यार्थ्यांपैकी केवळ २५ हजार ५५५ विद्यार्थ्यांनीच शाळेत आपली उपस्थिती नोंदविल्याने पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास इच्छुक नसल्याचे दिसून आले आहे.

शिक्षक-कर्मचारीही आढळले होते बाधितजिल्ह्यात ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या ७१२ शाळा असून १ लाख ७८ हजार ६०७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ९ हजार ३९३ शिक्षकांपैकी ३ हजार ३१३ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५९ शिक्षक बाधित आढळले, तर १ हजार २४७ शिक्षकेतर कर्मचारी असून त्यापैकी १३९ जणांची चाचणी करण्यात आली असता एक जण बाधित आढळून आला होता.