शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा रेती उपसा, फोफावणारी अतिक्रमणे मुळावर, वसईचे नष्टचर्य सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 23:36 IST

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पश्चिम किनारपट्टीवर पोलिसांची गस्त ठेवण्याची आणि किनारपट्टीवरील गैरबाबींवर कारवाई करण्याची मागणी ’कोळी युवाशक्ती’ने केली आहे.

वसई : वसई तालुक्याच्या पश्चिमेला निसर्गरम्य असा सागरी किनारा लाभला असला तरी वसई खाडीत बिगर क्रमांकाच्या पडावांमधून होत असलेला बेकायदा रेती उपसा, किनाऱ्यालगत फोफावत असलेली परप्रांतियांची अनिधकृत वस्ती, अतिक्रमणे आणि कायम निर्मनुष्य दिसून येणारी सुरु ची बाग यामुळे सागरी सुरक्षेला धोका निर्माण होण्याचा संभव असून भारत-पाक संबंधांमधील तणावाच्या पाशर््वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पश्चिम किनारपट्टीवर पोलिसांची गस्त ठेवण्याची आणि किनारपट्टीवरील गैरबाबींवर कारवाई करण्याची मागणी ’कोळी युवाशक्ती’ने केली आहे. यासंदर्भात संघटनेने वसई पोलिसांनी निवेदन देऊन कोणत्या बाबी सागरी सुरक्षेला बाधक ठरू शकतात, याबाबत माहिती दिली.भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव व दहशतवादाचे असलेले सावट लक्षात घेऊन मुंबईसह देशभरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या पाशर््वभूमीवर सागरी सुरक्षेबाबतचे एक निवेदन कोळी युवाशक्तीचे अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी वसई पोलिसांना दिले असून सागरी सुरक्षेला बाधक ठरण्याचा संभव असलेल्या किनारपट्टीवरील काही गैरबाबी पोलिसांच्या निदर्शनास आणल्या आहेत. वसईच्या खाडीत अनिर्बंधपणे बेकायदा रेती उपसा सुरू आहे. रेती उपसा करणाऱ्या पडावांवर कोणत्याही प्रकारचे नोंदणी क्र मांक नसतात. शिवाय या पडावांवर काम करणारे मजूर हे परप्रांतीय असतात. त्यांच्याकडे त्यांची ओळख पटविणारे पुरेसे पुरावेही नसतात. कस्टम आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कार्यालयाच्या समोरील खाडीतून या बेकायदा पडावांची ये-जा सुरू असते. यावर कोणत्याही यंत्रणेचा वचक नाही. त्यामुळे याठिकाणच्या बेकायदा पडावांचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा बेकायदा पडावांवर आणि त्यावर काम करणाºया परप्रांतीय खलाशांवर कारवाई करण्याची मागणी सौदिया यांनी केली आहे. मध्यंतरी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने वसई खाडीत कारवाई करून अशा प्रकारचे बेकायदा पडाव आणि मजुरांना ताब्यात घेतले होते, ही बाबही त्यांनी निदर्शनास आणली आहे.वसई कोळीवाड्यातील शासकीय गोदामांच्या मागे बेकायदा वस्ती वेगाने फोफावत आहे. या ठिकाणी कोण, कुठून येतो यावर कसलाही धरबंद राहिलेला नाही. या भागात गुन्हेगारी पाशर््वभूमीच्या इसमांचा वावर असून ही बाब सागरी सुरक्षेकरिता धोकादायक ठरू शकते. असे असतांनाही याठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्था चिरीमिरीच्या मोबदल्यात या भागातील बेकायदा वास्तव्य करून असलेल्यांना वीज, पाणी, रेशनकार्ड अशा सर्वप्रकारच्या सुविधा पुरवितात. या भागात पोलिसांची गस्त ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. पाचूबंदर येथे हिंदू स्मशानभूमीच्या मागे स्थानिक मच्छिमारांच्या बोटींची कामे चालतात. या बोटींवर पावसाळ्याच्या काळात बोटींतील मशिनरीच्या किंमती भागांची चोरी होण्याचे प्रमाण वाढीस लागले असून आजूबाजूला वाढत असलेल्या बेकायदा वस्तीतील गुन्हेगारी पाशर््वभूमीचे इसम या चोºया करत असाव्यात असा संशय आहे. शिवाय शासकीय गोदामांच्या आजूबाजूला गर्दुल्ल्यांचाही सुळसुळाट झाला आहे.