शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

बिल्डरांना ८८० परिवारांचे पुनर्वसन करण्याचे आदेश- मुंबई हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:54 IST

आरक्षित जमिनीवर इमारती बांधणे बिल्डरांना महाग

नालासोपारा : विरार पूर्वेकडील वावटेवाडी मध्ये बांधण्यात आलेल्या २० अनिधकृत इमारती बाबत राहणार्या रहिवाश्यांनी व बाजूच्याच जमीन मालकाने दोन याचिका हायकोर्टात दाखल केला होत्या. यावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने ९ एप्रिलला इमारती बांधणार्या बिल्डरांना व जमीन मालकांना जमिनीबाबत योग्य ती कागदपत्रे सादर करून या इमातीमधील ८८० कुटुंब राहत असलेले उध्वस्त होऊ नये म्हणून पर्यायी जमीन घेऊन त्या ठिकाणी इमारती बांधून त्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे.२० अनिधकृत इमारतीबाबत ९ एप्रिलला सत्यरंजन धर्माधिकारी आणि बर्गेस कुलाबावाला यांच्या खंडपीठाने सुणावणीदरम्यान जमीन मालक आणि बिल्डरांना सदर जमिनीचे योग्य कागदपत्रांसह पुरावे सादर करा जेणेकरून वेळ दिला जाईल असे सांगण्यात आले आहे. तसेच सत्य प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर करण्याचेही सांगितले आहे. यावेळी मुंबई हायकोर्टात जमीन मालक, बिल्डर, मनपाचे, रहिवाश्यांचे आणि तक्र ारदाराचे वकील उपस्थित होते.नेमके काय आहे प्रकरण...गाव मौजे विरार, वावटेवाडी, फुलपाडा येथील सर्वे क्र . ११२, ११३, ११४, ११५ मध्ये काही बिल्डरांनी पूर्णपणे अनधिकृत अशा २० इमारती बांधल्या. त्यांतील ९ इमारती मंजूर विकास आराखड्यातील २० मीटर रुंदीच्या डीपी रोडवर, खेळाच्या मैदानावर ७ इमारती आणि ६ मीटर रुंदीच्या पाणी निचरा होण्याच्या मार्गात बांधल्या आहेत. (वॉटर बॉडी) बनावट कागदपत्रांच्या आधारे संबंधित बिल्डरांनी २० बेकायदा इमारतींचे बांधकाम करून त्यांतील सुमारे ८०० वा अधिक रूम आणि गाळे विक्र ी करून व त्यांचे करारनामे दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदवून शेकडो गरीब कुटुंबाना कोट्यवधी रुपयांना फसविले आहे तसेच महानगर पालिका प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला आहे, आश्चर्याची बाब म्हणजे रूम विकत घेण्यासाठी वसई विकास सहकारी बँकेतर्फे कर्जे देण्यात आली आहेत. या बेकायदा इमारतीमुळे नितीन मधुसूदन राऊत यांच्या सर्व्हे क्र . ११०, १११, ९३ आणि १२८ मधील पावणे तीन एकर जमिनीवर येणारा एकमेव डीपी रोड बंद झाल्यामुळे अनेक तक्रारी सन २००८ पासून प्रशासनाकडे केल्या होत्या.डीपी रोड, खेळाचे मैदान आणि वॉटर बॉडी साठी आरिक्षत असणार्या जमिनीवर मनपाने काणाडोळा केल्याने बिनधास्तपणे अनधिकृत इमारती बांधल्या असून यावर मनपाने कारवाई न केल्याने मुंबई उच्च न्यायालयात रिटपिटीशन दाखल केली होती. विरार पोलीस ठाण्यात जमीन मालक आणि बिल्डर अशा ५० जणांविरु द्ध गुन्हे दाखल झाले.पोलिसांनी ३६ जणांना अटक केली असून बाकीचे फरार आहेत.- नितीन राऊत, याचिकाकर्ते

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट