शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
4
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
5
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
6
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
7
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
8
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
9
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
10
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
11
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
13
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
14
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
15
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
16
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
18
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
19
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
20
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा

कामगाराच्या मृत्यूला जबाबदार असणारे मोकाट

By admin | Updated: May 28, 2017 02:59 IST

तारापूर अणूऊर्जा केंद्र एक व दोन मधील किरणोत्सर्गी घनकचरा वाहून नेणाऱ्यां फोर्कलिफ्ट खाली चिरडून मोहनदास कोरे या कर्मचाऱ्याच्या झालेल्या मृत्युला ५० दिवस

- पंकज राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर अणूऊर्जा केंद्र एक व दोन मधील किरणोत्सर्गी घनकचरा वाहून नेणाऱ्यां फोर्कलिफ्ट खाली चिरडून मोहनदास कोरे या कर्मचाऱ्याच्या झालेल्या मृत्युला ५० दिवस झाल्यानंतरही त्याची नोंद योग्य रित्या पोलिसांनी केलेली नाही. तसेच त्याला जबाबदार असणारे अधिकारीही त्यामुळे मोकाट राहीले आहेत. या तपासाला गती मिळाली नसून या घटनेची तारापूर पोलिसात अजूनही या घटनेची नोंद हलगर्जी इतकीच आहे. तर किरणोत्सर्गी घनकचरा वाहून नेण्याचे नियम धाब्यावर बसविल्यानेच हा मृत्यू घडला असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यानुसार तपास करून त्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे७ एप्रिलला अंदाजे सहा टन वजनाची व सात फुट उंचीची किरणोत्सर्गी घनकचऱ्याने (स्पेन्ट फ्यूएल) ने भरलेली टाकी तारापुरच्या अणुऊर्जा केंद्र एक व दोन मधून जवळच असलेल्या भाभा अणु संशोधन केंद्रा (बी .ए .आर .सी.) मध्ये फोर्कलिफ्ट वरुन पुढील प्रक्रि ये करीता नेण्यात येत होत. मात्र, ही टाकी उंच असल्याने फोर्कलिफ्ट च्या चालकला २५ ते ३० फुटाच्या पुढील भागच दिसत नव्हता तर सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेसाठी पुढे मागे पायलट वाहन तसेच ट्रॅफीक कंट्रोलच्या मदतीसाठी कुणीही न ठेवल्यानेच कोरे या निष्पाप कर्मचाऱ्याचा (जे पुढील वर्षी ३० नोव्हेंबर ला सेवा निवृत्त होणार होते) नाहक बळी गेला असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. तारापुर अणु ऊर्जा केंद्र आयएसए १८००१ प्रमाणित असल्याने धोकादायक किरणोत्सर्गी घन कचरा (स्पेन्ट फ्यूएल) सारख्या वस्तुंची फोर्कलिफ्ट वरु न वाहतूक करतांना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आणि ए. इ. आर. बी. च्या नियम आणि मापदंडानुसार स्टॅँडर्ड आॅपरेटिंग प्रोसीजर (एस.ओ.पी ) चे काटेकोर पणे पालन होणे अपेक्षित होते त्याची अंमलबजावणी केली की, नाही? त्याची जबाबदारी कुणावर होती याचा तपास एन. पी. सी. आय . एल. च्या वरिष्ठ पातळीवरून आणि पोलिसांकडून तत्परतेने होणे गरजेचे असतांनाही दिरंगाई होत आहे.- तारापुर पोलिसांनी दि १० एप्रिलला तारापुर अणु ऊर्जा केंद्र प्रशासनला पंधरा प्रश्नाचे पत्र दिले आहे. त्या लाही आता ४६ दिवस झाले परंतु त्या पत्राचे उत्तर अजून देण्यात आले नाही. त्यामुळेच दोषीवर गुन्हे दाखल झालेले नाहीत. व कोरे कुटुंबाला न्यायही मिळालेला नाही.