शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कामगाराच्या मृत्यूला जबाबदार असणारे मोकाट

By admin | Updated: May 28, 2017 02:59 IST

तारापूर अणूऊर्जा केंद्र एक व दोन मधील किरणोत्सर्गी घनकचरा वाहून नेणाऱ्यां फोर्कलिफ्ट खाली चिरडून मोहनदास कोरे या कर्मचाऱ्याच्या झालेल्या मृत्युला ५० दिवस

- पंकज राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर अणूऊर्जा केंद्र एक व दोन मधील किरणोत्सर्गी घनकचरा वाहून नेणाऱ्यां फोर्कलिफ्ट खाली चिरडून मोहनदास कोरे या कर्मचाऱ्याच्या झालेल्या मृत्युला ५० दिवस झाल्यानंतरही त्याची नोंद योग्य रित्या पोलिसांनी केलेली नाही. तसेच त्याला जबाबदार असणारे अधिकारीही त्यामुळे मोकाट राहीले आहेत. या तपासाला गती मिळाली नसून या घटनेची तारापूर पोलिसात अजूनही या घटनेची नोंद हलगर्जी इतकीच आहे. तर किरणोत्सर्गी घनकचरा वाहून नेण्याचे नियम धाब्यावर बसविल्यानेच हा मृत्यू घडला असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यानुसार तपास करून त्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे७ एप्रिलला अंदाजे सहा टन वजनाची व सात फुट उंचीची किरणोत्सर्गी घनकचऱ्याने (स्पेन्ट फ्यूएल) ने भरलेली टाकी तारापुरच्या अणुऊर्जा केंद्र एक व दोन मधून जवळच असलेल्या भाभा अणु संशोधन केंद्रा (बी .ए .आर .सी.) मध्ये फोर्कलिफ्ट वरुन पुढील प्रक्रि ये करीता नेण्यात येत होत. मात्र, ही टाकी उंच असल्याने फोर्कलिफ्ट च्या चालकला २५ ते ३० फुटाच्या पुढील भागच दिसत नव्हता तर सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेसाठी पुढे मागे पायलट वाहन तसेच ट्रॅफीक कंट्रोलच्या मदतीसाठी कुणीही न ठेवल्यानेच कोरे या निष्पाप कर्मचाऱ्याचा (जे पुढील वर्षी ३० नोव्हेंबर ला सेवा निवृत्त होणार होते) नाहक बळी गेला असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. तारापुर अणु ऊर्जा केंद्र आयएसए १८००१ प्रमाणित असल्याने धोकादायक किरणोत्सर्गी घन कचरा (स्पेन्ट फ्यूएल) सारख्या वस्तुंची फोर्कलिफ्ट वरु न वाहतूक करतांना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आणि ए. इ. आर. बी. च्या नियम आणि मापदंडानुसार स्टॅँडर्ड आॅपरेटिंग प्रोसीजर (एस.ओ.पी ) चे काटेकोर पणे पालन होणे अपेक्षित होते त्याची अंमलबजावणी केली की, नाही? त्याची जबाबदारी कुणावर होती याचा तपास एन. पी. सी. आय . एल. च्या वरिष्ठ पातळीवरून आणि पोलिसांकडून तत्परतेने होणे गरजेचे असतांनाही दिरंगाई होत आहे.- तारापुर पोलिसांनी दि १० एप्रिलला तारापुर अणु ऊर्जा केंद्र प्रशासनला पंधरा प्रश्नाचे पत्र दिले आहे. त्या लाही आता ४६ दिवस झाले परंतु त्या पत्राचे उत्तर अजून देण्यात आले नाही. त्यामुळेच दोषीवर गुन्हे दाखल झालेले नाहीत. व कोरे कुटुंबाला न्यायही मिळालेला नाही.