शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी उचलून नेण्यास विरोध

By admin | Updated: September 23, 2016 02:46 IST

शहरात रस्त्याच्याकडेला पार्किग केलेल्या दुचाकी उचलून नेण्याची मोहीम कुठलीही आगाऊ सूचना न देता पालघर पोलीस आणि पालघर नगरपरिषदेने संयुक्तरित्या आज अचानक सुरु

पालघर : शहरात रस्त्याच्याकडेला पार्किग केलेल्या दुचाकी उचलून नेण्याची मोहीम कुठलीही आगाऊ सूचना न देता पालघर पोलीस आणि पालघर नगरपरिषदेने संयुक्तरित्या आज अचानक सुरु केल्याने नागरिकांनी त्याला विरोध दर्शविला. आमच्या वर कारवाई करताना बेकायदेशीर रिक्षा स्टॅन्डला पोलिसांचे अभय का? असा प्रश्नही या वेळी उपस्थितांनी उपस्थित केला.पालघर जिल्ह्यातील वाहतुकीची कोंडी हा विषय अनेक वर्षापासून प्रशासनाची डोकेदुखी बनल्याने प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी, एस टी चे अधिकारी, पत्रकार, नागरिक इ, च्या अनेक वेळा बैठका झाल्या होत्या. त्यातून निघालेल्या मार्गापैकी पी १, पी २ ही माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांनी सुरु केलेल्या स्कीम सह अन्य उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनात एकवाक्यता नसल्याने फोल ठरल्या होत्या. मात्र याचा मोठा फटका गरिबांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी ला बसला होता. परंतु शहरातील वाहतुककोंडीला काही रिक्षाधारकांची बेशिस्ती आणि नाक्यानाक्या वर बांडगुळाप्रमाणे उगवलेले रिक्षा स्टॅन्ड कारणीभूत असल्याची तक्रार नागरिकांमधून केली जात आहे.पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकलेला नाही. रस्ते अरुंद असल्याने आणि बेकायदेशीर अतिक्रमणे, रस्त्यालगतच्या इमारतींनी पार्किंगसाठी जागा सोडल्या नसल्याने त्यांची वाहने रस्त्यात पार्क केली जातात. तसेच बेकायदेशीर टपऱ्या वाढीस लागल्याने हा वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला होता. त्या मुळे आज पालघर पोलिस आणि नगर परिषदेने संयुक्तरित्या प्रथम हुतात्मा स्तंभा जवळील रस्त्यालगत पार्क केलेल्या मोटारसायकली उचलून नेण्याची मोहीम सुरू केली. आपल्याला या संदर्भात काहीही कल्पना नसल्याने आपली गाडी सोडून द्या अशी विनवणी अनेक लोक करीत होते. मात्र पोलिसांनी वाहने उचलण्याची कार्यवाही सुरूच ठेवली होती. त्यामुळे जनतेत संताप व्यक्त होत होता.