शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाला ओबीसी, आदिवासींंचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:11 IST

तहसीलदार कार्यालयासमोर धरणे : जिल्ह्यात लोकसंख्या १ टक्का अन् आरक्षण १६ टक्के असल्याचा दावा

पालघर : जिल्ह्यामध्ये नोकरी व व्यवसाया निमित्त आलेल्या व लोकसंख्येच्या मानाने फक्त एक टक्का असलेल्या मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण मिळणार असल्याने ओबीसी व आदिवासी समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. बहुसंख्यांक असूनही या समाजाला फक्त ९ टक्के आरक्षण राहणार असल्याचे शासनाच्या अध्यादेशात स्पष्ट झाल्याने गुरु वारी पालघर तहसीलदार कार्यालयासमोर ओ बीसी हक्क परिषदेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

मंडळ आयोगानुसार देशात ओबीसी घटकांना २७ टक्के आरक्षण दिले जात होते ते आता कमी करून १९ टक्क्यांवर आणले गेले. राज्यात विविध धर्मातील ३४६ जातीचा समावेश ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) मध्ये करण्यात आला आहे. राज्यात ओबीसींना पूर्वी १९ टक्के आरक्षण दिले जात असतांना (पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात) आता १० टक्के अनुसूचित जमातीला देऊन ओबीसींना केवळ ९ टक्के आरक्षण उरले आहे.

नवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या निर्मिती नंतर पेसा क्षेत्रातील क व ड प्रवर्गातील तलाठी, ग्रामसेवक, सर्वेक्षक, अंगणवाडी, पर्यवेक्षक, शिक्षक, कृषी सहाय्यक, परिचारिका, बहु उद्देशीय आरोग्य कर्मचारी, वनपाल, वनरक्षक, पोलीस पाटील, कोतवाल आदी १८ शासकीय पदे केवळ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित केल्याने जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी ६३ टक्के असलेल्या ओबीसी समाजावर अन्याय केला जात असल्याचे परिषदेचे म्हणणे आहे.

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २९ लाख ९० हजार ११६ इतकी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या ११ लाख १८ हजार ८ (३७ टक्के) तर उर्वरित समाजाची लोकसंख्या १८ लाख ७२ हजार १०८ (६३ टक्के) इतकी आहे. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी या अन्यायाविरोधात विधानसभा व लोकसभेत आवाज उठवित नसल्याने ओबीसी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

या अन्यायकारक प्रक्रि ये विरोधात ७ सप्टेंबर २०१५ रोजी अनुसूचित जमतीसाठीच्या तलाठी भरती प्रक्रियेच्या विरोधात हक्क परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करून या भरतीत भूमी पुत्राचा समावेश करण्याची मागणी केली होती. या विरोधात सध्या मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून अनुसूचित जमातीच्या नोकर भरातीस तुर्त स्थगिती देण्यात आलेली आहे.भूमीपुत्राच्या लढाईसाठी उभारण्यात आलेल्या आंदोलकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाने १९ डिसेंबर २०१८ रोजी काढलेल्या अध्यादेशाने केल्याचा आरोप हक्क परिषदेने केला आहे. संख्येने अत्यल्प अशा मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणामुळे अन्याय होणार असल्याचे त्यांनी सागितले. 

मराठा समाजाला मिळालेले आरक्षण जनरल कॅटेगरीच्या ४८ टक्के मधून दिलेले आहे. त्यामुळे आम्हाला मिळालेले आरक्षण हे ओबीसी किंवा आदिवासी समाजाचे आरक्षण कमी करून दिले असल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे. आणि मिळालेले आरक्षण राज्य पातळीवरील असल्याने त्याचा लाभ व्यापक आहे. इतर समाजाने दिशाभूल करणाऱ्यांवर विश्वास ठेऊ नेये असे मी आवाहन करतो.- वागेश कदम, मराठा नेता

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण