शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

आठ महिन्यांच्या दुरुस्तीनंतर सुरू झालेल्या जुन्या वरसोवा पुलाची होणार वेट टेस्टिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 02:59 IST

आठ महिन्यांच्या दुरुस्तीनंतर सुरू झालेल्या जुन्या वरसोवा पुलाची येत्या १९ सप्टेंबरला वेट टेस्टिंग केली जाणार आहे. पूल सहा तासांपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून, चार महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या पुलाची क्षमता तपासली जाणार आहे.

शशी करपे वसई : आठ महिन्यांच्या दुरुस्तीनंतर सुरू झालेल्या जुन्या वरसोवा पुलाची येत्या १९ सप्टेंबरला वेट टेस्टिंग केली जाणार आहे. पूल सहा तासांपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून, चार महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या पुलाची क्षमता तपासली जाणार आहे.मुंबई-अहमदाबाद हायवेवरील ४८.५ मीटर लांबीच्या जुन्या वरसोवा पुलाला ४३ वर्षे उलटून गेली आहेत. २०१४ साली पुलाच्या एका गर्डरला तडा गेल्यापासून, या मार्गावरील वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्या वेळी नवीन गर्डर बसविण्याच्या कामासाठी तब्बल सहा महिने लागले होते. तेव्हापासून पूल कमकुवत असल्याने, दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार बंद करण्यात येत आहे. गर्डर बदल्यानंतर पूल पुन्हा नादुरुस्ती झाल्याने, १६ सप्टेंबर २०१६ ते १८ मे २०१७पर्यंत पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. या काळात नव्या पुलावरून एकेरी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येत होती. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या दहा-दहा किलोमीटरच्या रांगा लागून वाहनचालकांना अडकून पडावे लागत होते. या पुलाची दुरुस्ती लवकर करून, वाहनांसाठी खुला करण्यात यावा, या मागणीसाठी विविध पक्षांना ‘रास्ता रोको’ आंदोलनेही केली होती.१९ मेपासून हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मात्र, आता याच पुलावरून हलक्या आणि जड वाहनांसाठी वेगवेगळ््या रांगा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा पूल जड वाहनांच्या वाहतुेकीसाठी कितपत टिकेल, असाच प्रश्न उपस्थित केला जात होता. नेमका आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जुन्या पुलाची वेट टेस्टिंग घेण्याच्या निर्णय घेतला आहे. येत्या १९ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून टेस्टिंग सुरू करण्यात येणार आहे. ही चाचणी सहा तास चालणार आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक सकाळी ८ वाजल्यापासून चाचणी पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.नव्या पुलावरून वाहतूकजुना पूल बंद केल्यानंतर नव्या पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक पंधरा पंधरा मिनिटांच्या फरकाने टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहे. पूल बंद झाल्यानंतर दोन्ही बाजूने प्रचंड वाहतूककोंडी होती, तसेच रस्त्याच्या विरुद्ध दिशेने मोठ्या प्रमाणात हलकी आणि अवजड वाहने मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो.या अनुभव लक्षात घेऊन महामार्ग वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वरसोवा खाडी पूल, जी. एन. मोटेल, रॉयल गार्डन, एस. पी. धाबा, लोढा धाम व चिंचोटी नाका या सात ठिकाणी नाके तयार करण्यात येणार आहेत. या वेळी ७५ पोलीस कर्मचारी, ५० बॅरीकेटस आणि २०० कोन वाहतुकीचे नियमन करण्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत.