शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आता आरक्षण मिळेपर्यंत माघार घ्यायची नाही; मीरा भाईंदर सकल मराठा समाजाचा निर्धार 

By धीरज परब | Updated: October 30, 2023 20:09 IST

सरकारने शब्द देऊन सुद्धा निर्णय न घेतल्याने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

मीरारोड -  महायुती शासनाने मराठा समाजाला ४० दिवसात आरक्षणवर निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन  सुद्धा शब्द न पाळल्याने मीरा भाईंदर मधील मराठा समाजाने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत १ नोव्हेम्बर पासून साखळी उपोषण सुरु करणार असे जाहीर केले आहे. मीरा भाईंदर सकल मराठा समाजची बैठक रविवारी पार पडली . या बैठकीत यावेळी माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम , माजी शिक्षण समिती समभापती सुरेश दळवी, माजी नगरसेवक अनिल भोसले सह अमोल जाधवराव, सुभाष काशीद, जयराम मेसे ,लक्ष्मण पाटील, रमेश पवार, मनोज राणे, देवदास सावंत, सचिन पोपळे, कृष्णा  दरेकर, अनिल ताटे, प्रकाश नागणे, अंकुश मालुसरे, संतोष गोळे, सुहास सावंत, रवींद्र भोसले, गणेश वाडिले , प्रवीण उत्तेकर, निलेश भालेकर, अमोल मोरे, प्रशांत सावंत, विनोद जगताप, विजय निकम आदी बैठकीत सहभागी झाले होते . सर्व राजकीय पक्षां मधील मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

सरकारने शब्द देऊन सुद्धा निर्णय न घेतल्याने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.  त्यांना पाठिंबा देत व १ नोव्हेम्बर पासून स्वातंत्र्यवीर सावरकर चौक , गोल्डन नेस्ट येथे साखळी उपोषण करण्याचा ठराव एकमताने करण्यात आला . मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्या . राज्यातील मराठा समाज एकवटला असून आता मराठे माघार घेणार नाहीत असा निर्धार यावेळी केला गेला. मराठा समाजाचे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही दबावाखाली न येता आरक्षण द्यावे . आरक्षणाबरोबरच सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून मराठा तरुण तरुणींना लाभ होईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी केले गेले. 

टॅग्स :mira roadमीरा रोडMaratha Reservationमराठा आरक्षण