शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

आता ६१ दिवस मासेमारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:54 IST

१ जून ते ३१ जुलै या आगामी ६१ दिवसांच्या कालावधी करिता सागरी मासेमारी बंदीचा कालावधी असणार आहे

बोर्डी : १ जून ते ३१ जुलै या आगामी ६१ दिवसांच्या कालावधी करिता सागरी मासेमारी बंदीचा कालावधी असणार आहे. तथापी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय आयुक्तालय ठाणे-पालघर या अंतर्गत येणारी उत्तन, वसई, एडवन, सातपाटी आणि डहाणू या परवाना विभागातील सुमारे बावीसशे नोंदणीकृत यांत्रिक बोटी आहेत. तर पारंपरिक बोटींना ही बंदी लागू नसली तरी या काळात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे खबरदारी बाळगत पारंपरिक बोटीही किनाºयावर शाकारण्यात येतात.महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत १ जून ते ३१ जुलै हा ६१ दिवसांचा बंदीचा कालावधी आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्याकरिता पालघर येथे सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय आयुक्तालयाचे कार्यालय आहे. त्या अंतर्गत पाच परवाना अधिकाºयांचे कार्यक्षेत्र आहे. त्या नुसार उत्तन (वाशी ते वसई), वसई(पाचूबंदर ते अर्नाळा), एडवन(वडराई ते एडवन), सातपाटी ( शीरगाव त तारापूर) आणि डहाणू विभागात वरोर ते झाई) या सागरी क्षेत्रांचा समावेश आहे. या मुख्यालयाअंतर्गत २२०० यांत्रिक मासेमारी बोटींची नोंदणी झालेली आहे. पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ असल्याने ही बंदी लागू असते. शिवाय जोराचा पाऊस आणि वादळी वारे यामुळे जीवित व वित्तहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे मच्छीमार या काळात हा नियम कसोशीने पाळतात. तथापि किनार्यावर नांगरलेल्या बोटी प्लास्टिक किंवा झावळ्यांंनी शाकारण्यात येतात.पालघर जिल्ह्यातील सागरी क्षेत्र मासेमारीचा गोल्डन बेल्ट समजला जातो. पापलेट, सरंगा, घोळ, दाढा, कोळंबी, शिवंड आदी विविध जातींचे मासे विदेशी चलन प्राप्त करून देतात. मात्र, मागील दशकापासून माशांच्या प्रमाणात कामालिची घट झाल्याने या व्यवसायिकांवर आणि त्यावर अवलंबून पूरक व्यावसायिक आर्थिक झळ सोसत आहेत. शिवाय ऐन मासेमारी हंगामात येणारी वादळांमुळे मासेमारी बंद ठेवावी लागते. तर डिझेल दरवाढ, त्याला शासनाकडून योग्य प्रमाणात न मिळणारी सबिसडी, हमीभावाचा अभाव या मुळे मच्छिमार आर्थिक संकटात आहेत.