शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पालघर-वसई प्रवास होणार वेगवान, रहदारीचा ताण होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 01:20 IST

वसई-विरार शहराला जोडणारा रिंगरोड आणि पालघरला जोडणारा कोस्टल रोड साकारण्यात येणार आहे.

वसई : वसई - विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील रहदारीचा ताण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने मुख्य रस्त्याच्या ठिकाणी १२ उड्डाणपूल बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्यानंतर आता वसई-विरार शहराला जोडणारा रिंगरोड आणि पालघरला जोडणारा कोस्टल रोड साकारण्यात येणार आहे. मंजूर विकास आराखड्यामध्ये हा कोस्टल रोड समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत ठेवण्यात आला होता. त्याला महापालिकेने एकमताने मंजुरी दिली आहे. वसई - विरार शहर महानगरपालिका क्षेत्र मुंबईलगत असल्याने येथे नागरिकीकरण झपाट्याने वाढते आहे. येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. महापालिकेने पालिका हद्दीत लवकर जाता यावे, यासाठी ४० मीटरचा रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे.पालघर जिल्ह्याला जोडला जाईल हा कोस्टल मार्गवसई तालुका आणि तिथून पालघर तालुक्याला जोडणारा सागरी किनारा मार्ग रुंद करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. महापालिकेतून वगळण्यात आलेल्या २१ गावांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून त्याचे काम वसई - विरार मनपाच पहात आहे. तर या वगळलेल्या गावांपैकी मौजे कोल्हापूर व मौजे चिखलडोंगरी येथूनच कोस्टल रोड जाणार असून तो थेट पालघरला जोडणारा आहे. पालघर तालुक्याला जोडणारा सागरी किनारा मार्ग रुंदीचा प्रस्ताव मंजूर विकास आराखड्यात समाविष्ट करण्यास आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे प्रमाणे कार्यवाही करण्यासाठी सर्वसाधारण सभेपुढे आणण्यात आला होता.कसा असेल रिंगरोड मार्ग ! : हा प्रस्तावित रिंग रोड मार्ग गास-कोपरी येथून सुरू होऊन चिखल डोंगरे-बोळींज-सोपारा शुर्पारक मैदानाजवळून -बरामपूर-उमेळे-जूचंद्र-माणकिपूर-आचोळे-तुळींज-विरार फुलपाडा-कोपरी-गासकोपरी असा आहे.प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण, नगररचना विभागाची माहितीरिंगरोड व कोस्टल रोडचे सर्वेक्षण जवळपास पूर्ण झाल्याचे या सर्वसाधारण सभेत सांगण्यात आले. प्रकल्पाचा रस्ता ज्या भागातून जाणार आहे, अशा प्रकल्पबाधितांशी बोलून येथे सर्वेक्षण झाले आहे. काही पाणथळ जागा तसेच सीआरझेड भागातून देखील हा प्रकल्प जाणार असल्याने त्यांचे नकाशेही तयार असल्याचे पालिकेच्या नगररचना विभागाकडून स्पष्ट केले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकVasai Virarवसई विरार