शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
3
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
4
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
5
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
7
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
8
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
9
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
10
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
11
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
12
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
13
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
14
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
15
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
16
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
17
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
18
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
19
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
20
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब

शेतकऱ्यांवर आता दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 01:12 IST

वाडा तालुक्यातील बरेचसे शेतकरी भातपीक घेतल्यानंतर त्याच जमिनीत वाल, तूर, मूग, हरभरा, तीळ अशी रब्बीची पिके घेत असतो.

वसंत भोईरवाडा : वाडा तालुक्यातील बरेचसे शेतकरी भातपीक घेतल्यानंतर त्याच जमिनीत वाल, तूर, मूग, हरभरा, तीळ अशी रब्बीची पिके घेत असतो. मात्र अवकाळी पावसामुळे अजूनही शेतात पाणी असल्याने आणि रब्बी पिकाचा हंगामही निघून गेल्याने यावर्षी शेतकऱ्यांना रब्बी पिकाला मुकावे लागले आहे. काही शेतकरी रब्बीमध्ये हरभºयाचे पीक लवकर घेण्यासाठी भातपीक न घेता जमीन तशीच ओसाड (रब्बी) ठेवतात, या शेतकºयांवर तर मोठे संकट ओढावले आहे.वाडा तालुक्यातील गातेस खुर्द आणि गातेस बुद्रुक या दोन गावांमध्ये रब्बीमध्ये दोनशे एकर शेत जमिनीत हरभरा पीक घेतले जाते. यासाठी येथील शेतकरी पावसाळ्यात या जमिनीत भातपीक घेत नाहीत. मात्र, आजही या शेतांमध्ये पाणी भरलेले असल्याने आणि हरभरा पेरणीचा हंगाम निघून गेल्याने या दोन्ही गावातील १२७ शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.येथील शेतकरी रब्बी (ओसाड) ठेवलेल्या जागेत दिवाळीपूर्वीच हरभराची पेरणी करतात. आॅक्टोबरमधील उष्णतेमुळे हरभरा पिकाची उगवण चांगली होते, आणि नोव्हेंबर अखेरच्या थंडीमुळे फुटवा चांगला होऊन डिसेंबर अखेरीस उत्पादनालाही सुरवात होते. मात्र, अवकाळी पावसाने येथील शेतकºयांचे हरभरा पिकाचे वेळेचे गणितच बिघडवले आहे.येथील शेतकºयांनी ८५०० रुपये प्रती क्विंटल दराने हरभºयाचे बियाणे खरेदी केले असून पेरणी लांबल्याने हे बियाणेही खराब होऊन फुकट जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. काही शेतकºयांनी सुकलेल्या रब्बीच्या जागेत दोन दिवसांपुर्वी हरभराची पेरणी केली होती. मात्र, शुक्रवारी वारी झालेल्या पावसामध्ये ही कुजून पेरणी वाया जाण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.दरम्यान, वाडा आणि विक्र मगड तालुक्यातील अन्य शेतकरी भातपिकानंतर घेत असलेल्या वाल, मूग, तूर, हरभरा या रब्बीपिकाला मुकला आहे. शेतात अजूनही पाणी, ओलावा असल्याने एक महिना रब्बी पिकाची पेरणी करतायेणार नाही.>शेतकरी राहणार वंचितदोन वर्षांपूर्वी गातेस खुर्द आणि गातेस बुद्रुक येथील ६० शेतकºयांनी ४० लाख रुपयांचे हरभºयाचे उत्पादन घेतले होते. आता हरभरा पीक घेणाºया शेतकºयांची संख्या दुप्पट झाली आहे. मात्र या रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकºयांना हरभरा पिकापासून वंचित रहावे लागले आहे.नोव्हेंबर महिन्यात हरभरा पीक फुलावर येते. डिसेंबर महिन्यात हरभºयाचे उत्पन्न सुरु होते. हरभरा पिकाचा हंगाम पावसात गेल्याने हे पीक घेणाºया शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.- कुमार पष्टे, हरभरा उत्पादकशेतकरी, गातेस, ता. वाडा.