शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

शेतकऱ्यांवर आता दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 01:12 IST

वाडा तालुक्यातील बरेचसे शेतकरी भातपीक घेतल्यानंतर त्याच जमिनीत वाल, तूर, मूग, हरभरा, तीळ अशी रब्बीची पिके घेत असतो.

वसंत भोईरवाडा : वाडा तालुक्यातील बरेचसे शेतकरी भातपीक घेतल्यानंतर त्याच जमिनीत वाल, तूर, मूग, हरभरा, तीळ अशी रब्बीची पिके घेत असतो. मात्र अवकाळी पावसामुळे अजूनही शेतात पाणी असल्याने आणि रब्बी पिकाचा हंगामही निघून गेल्याने यावर्षी शेतकऱ्यांना रब्बी पिकाला मुकावे लागले आहे. काही शेतकरी रब्बीमध्ये हरभºयाचे पीक लवकर घेण्यासाठी भातपीक न घेता जमीन तशीच ओसाड (रब्बी) ठेवतात, या शेतकºयांवर तर मोठे संकट ओढावले आहे.वाडा तालुक्यातील गातेस खुर्द आणि गातेस बुद्रुक या दोन गावांमध्ये रब्बीमध्ये दोनशे एकर शेत जमिनीत हरभरा पीक घेतले जाते. यासाठी येथील शेतकरी पावसाळ्यात या जमिनीत भातपीक घेत नाहीत. मात्र, आजही या शेतांमध्ये पाणी भरलेले असल्याने आणि हरभरा पेरणीचा हंगाम निघून गेल्याने या दोन्ही गावातील १२७ शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.येथील शेतकरी रब्बी (ओसाड) ठेवलेल्या जागेत दिवाळीपूर्वीच हरभराची पेरणी करतात. आॅक्टोबरमधील उष्णतेमुळे हरभरा पिकाची उगवण चांगली होते, आणि नोव्हेंबर अखेरच्या थंडीमुळे फुटवा चांगला होऊन डिसेंबर अखेरीस उत्पादनालाही सुरवात होते. मात्र, अवकाळी पावसाने येथील शेतकºयांचे हरभरा पिकाचे वेळेचे गणितच बिघडवले आहे.येथील शेतकºयांनी ८५०० रुपये प्रती क्विंटल दराने हरभºयाचे बियाणे खरेदी केले असून पेरणी लांबल्याने हे बियाणेही खराब होऊन फुकट जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. काही शेतकºयांनी सुकलेल्या रब्बीच्या जागेत दोन दिवसांपुर्वी हरभराची पेरणी केली होती. मात्र, शुक्रवारी वारी झालेल्या पावसामध्ये ही कुजून पेरणी वाया जाण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.दरम्यान, वाडा आणि विक्र मगड तालुक्यातील अन्य शेतकरी भातपिकानंतर घेत असलेल्या वाल, मूग, तूर, हरभरा या रब्बीपिकाला मुकला आहे. शेतात अजूनही पाणी, ओलावा असल्याने एक महिना रब्बी पिकाची पेरणी करतायेणार नाही.>शेतकरी राहणार वंचितदोन वर्षांपूर्वी गातेस खुर्द आणि गातेस बुद्रुक येथील ६० शेतकºयांनी ४० लाख रुपयांचे हरभºयाचे उत्पादन घेतले होते. आता हरभरा पीक घेणाºया शेतकºयांची संख्या दुप्पट झाली आहे. मात्र या रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकºयांना हरभरा पिकापासून वंचित रहावे लागले आहे.नोव्हेंबर महिन्यात हरभरा पीक फुलावर येते. डिसेंबर महिन्यात हरभºयाचे उत्पन्न सुरु होते. हरभरा पिकाचा हंगाम पावसात गेल्याने हे पीक घेणाºया शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.- कुमार पष्टे, हरभरा उत्पादकशेतकरी, गातेस, ता. वाडा.