शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर आता दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 01:12 IST

वाडा तालुक्यातील बरेचसे शेतकरी भातपीक घेतल्यानंतर त्याच जमिनीत वाल, तूर, मूग, हरभरा, तीळ अशी रब्बीची पिके घेत असतो.

वसंत भोईरवाडा : वाडा तालुक्यातील बरेचसे शेतकरी भातपीक घेतल्यानंतर त्याच जमिनीत वाल, तूर, मूग, हरभरा, तीळ अशी रब्बीची पिके घेत असतो. मात्र अवकाळी पावसामुळे अजूनही शेतात पाणी असल्याने आणि रब्बी पिकाचा हंगामही निघून गेल्याने यावर्षी शेतकऱ्यांना रब्बी पिकाला मुकावे लागले आहे. काही शेतकरी रब्बीमध्ये हरभºयाचे पीक लवकर घेण्यासाठी भातपीक न घेता जमीन तशीच ओसाड (रब्बी) ठेवतात, या शेतकºयांवर तर मोठे संकट ओढावले आहे.वाडा तालुक्यातील गातेस खुर्द आणि गातेस बुद्रुक या दोन गावांमध्ये रब्बीमध्ये दोनशे एकर शेत जमिनीत हरभरा पीक घेतले जाते. यासाठी येथील शेतकरी पावसाळ्यात या जमिनीत भातपीक घेत नाहीत. मात्र, आजही या शेतांमध्ये पाणी भरलेले असल्याने आणि हरभरा पेरणीचा हंगाम निघून गेल्याने या दोन्ही गावातील १२७ शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.येथील शेतकरी रब्बी (ओसाड) ठेवलेल्या जागेत दिवाळीपूर्वीच हरभराची पेरणी करतात. आॅक्टोबरमधील उष्णतेमुळे हरभरा पिकाची उगवण चांगली होते, आणि नोव्हेंबर अखेरच्या थंडीमुळे फुटवा चांगला होऊन डिसेंबर अखेरीस उत्पादनालाही सुरवात होते. मात्र, अवकाळी पावसाने येथील शेतकºयांचे हरभरा पिकाचे वेळेचे गणितच बिघडवले आहे.येथील शेतकºयांनी ८५०० रुपये प्रती क्विंटल दराने हरभºयाचे बियाणे खरेदी केले असून पेरणी लांबल्याने हे बियाणेही खराब होऊन फुकट जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. काही शेतकºयांनी सुकलेल्या रब्बीच्या जागेत दोन दिवसांपुर्वी हरभराची पेरणी केली होती. मात्र, शुक्रवारी वारी झालेल्या पावसामध्ये ही कुजून पेरणी वाया जाण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.दरम्यान, वाडा आणि विक्र मगड तालुक्यातील अन्य शेतकरी भातपिकानंतर घेत असलेल्या वाल, मूग, तूर, हरभरा या रब्बीपिकाला मुकला आहे. शेतात अजूनही पाणी, ओलावा असल्याने एक महिना रब्बी पिकाची पेरणी करतायेणार नाही.>शेतकरी राहणार वंचितदोन वर्षांपूर्वी गातेस खुर्द आणि गातेस बुद्रुक येथील ६० शेतकºयांनी ४० लाख रुपयांचे हरभºयाचे उत्पादन घेतले होते. आता हरभरा पीक घेणाºया शेतकºयांची संख्या दुप्पट झाली आहे. मात्र या रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकºयांना हरभरा पिकापासून वंचित रहावे लागले आहे.नोव्हेंबर महिन्यात हरभरा पीक फुलावर येते. डिसेंबर महिन्यात हरभºयाचे उत्पन्न सुरु होते. हरभरा पिकाचा हंगाम पावसात गेल्याने हे पीक घेणाºया शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.- कुमार पष्टे, हरभरा उत्पादकशेतकरी, गातेस, ता. वाडा.