शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

व्यापार परवान्यासाठी पालिकेने पाठवल्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 01:18 IST

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवसायधारकांना महापालिकेचा व्यवसाय परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. फी भरून व्यवसाय परवाना घेण्यासाठी पालिकेने व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे.

विरार - वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवसायधारकांना महापालिकेचा व्यवसाय परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. फी भरून व्यवसाय परवाना घेण्यासाठी पालिकेने व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे. यासाठी पालिकेने व्यावसायिकांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा, कार्यवाही / कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरवर्षी व्यवसाय परवाना फी भरून त्यांचे नूतनीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे पालिकेने नोटिसीत नमूद केले आहे.महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९, कलम ३७६ प्रकरण १८ नुसार वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवसायधारकांनी महापालिकेची फी भरून व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक केले आहे. तसेच दरवर्षी फी भरून त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक करण्यात आले आहे.वसई-विरार शहर महापालिका कार्यक्षेत्रात जे व्यावसायिक महापालिकेचा कायदेशीर परवाना न घेता व्यवसाय करीत आहेत त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम ३७६, ३७६ (अ) अंतर्गत नोटीस बजावण्याची कार्यवाही परवाना विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यानंतरही नोटिसीच्या मुदतीत व्यावसायिकांनी वसई-विरार महापालिकेचा परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवल्यास अशा व्यवसायांच्या जागा मोहोरबंद (सील) करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.व्यापाऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेऊन पालिकेने व्यवसाय परवान्याच्या दरात ५० टक्के कपात केली होती. त्यामुळे नव्या दरानुसार व्यापाऱ्यांना सुधारित नोटिसा पाठविण्यात येत आहेत. मात्र, यासाठी लावलेली कलमेही चुकीची आहेत. त्यानुसार, कर आकारणी करता येत नाही, असा दावा कायदे अभ्यासकांनी केला आहे. काय आहे कायदेतज्ज्ञांचे मत?वाढत्या आंदोलनांमुळे पालिकेने माघार घेत व्यवसाय परवाना करात ५० टक्के कपात केली असली तरी कलम ३१३ नुसार शहरातील विक्रेते, दुकानदार आणि व्यावसायिक यांना कर आकारता येत नसल्याचे कायदेतज्ज्ञ निमेश वसा यांचे म्हणणे आहे. कलम ३१३ हा नवीन व्यवसाय करणारे, व्यवसाय जर अन्य ठिकाणी स्थलांतरित केला असेल, बंद व्यवसाय नव्याने सुरू केला असेल तर लागू होतो. जे दुकानदार आणि व्यावसायिक पूर्वीपासून व्यवसाय करीत असतील, त्यांना लागू होत नाही, असे कलमात स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिकेने ज्या कलमाआधारे नोटिसा बजावल्या आहेत, त्या चुकीच्या असल्याचे वसा यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार