शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

व्यापार परवान्यासाठी पालिकेने पाठवल्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 01:18 IST

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवसायधारकांना महापालिकेचा व्यवसाय परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. फी भरून व्यवसाय परवाना घेण्यासाठी पालिकेने व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे.

विरार - वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवसायधारकांना महापालिकेचा व्यवसाय परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. फी भरून व्यवसाय परवाना घेण्यासाठी पालिकेने व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे. यासाठी पालिकेने व्यावसायिकांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा, कार्यवाही / कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरवर्षी व्यवसाय परवाना फी भरून त्यांचे नूतनीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे पालिकेने नोटिसीत नमूद केले आहे.महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९, कलम ३७६ प्रकरण १८ नुसार वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवसायधारकांनी महापालिकेची फी भरून व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक केले आहे. तसेच दरवर्षी फी भरून त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक करण्यात आले आहे.वसई-विरार शहर महापालिका कार्यक्षेत्रात जे व्यावसायिक महापालिकेचा कायदेशीर परवाना न घेता व्यवसाय करीत आहेत त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम ३७६, ३७६ (अ) अंतर्गत नोटीस बजावण्याची कार्यवाही परवाना विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यानंतरही नोटिसीच्या मुदतीत व्यावसायिकांनी वसई-विरार महापालिकेचा परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवल्यास अशा व्यवसायांच्या जागा मोहोरबंद (सील) करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.व्यापाऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेऊन पालिकेने व्यवसाय परवान्याच्या दरात ५० टक्के कपात केली होती. त्यामुळे नव्या दरानुसार व्यापाऱ्यांना सुधारित नोटिसा पाठविण्यात येत आहेत. मात्र, यासाठी लावलेली कलमेही चुकीची आहेत. त्यानुसार, कर आकारणी करता येत नाही, असा दावा कायदे अभ्यासकांनी केला आहे. काय आहे कायदेतज्ज्ञांचे मत?वाढत्या आंदोलनांमुळे पालिकेने माघार घेत व्यवसाय परवाना करात ५० टक्के कपात केली असली तरी कलम ३१३ नुसार शहरातील विक्रेते, दुकानदार आणि व्यावसायिक यांना कर आकारता येत नसल्याचे कायदेतज्ज्ञ निमेश वसा यांचे म्हणणे आहे. कलम ३१३ हा नवीन व्यवसाय करणारे, व्यवसाय जर अन्य ठिकाणी स्थलांतरित केला असेल, बंद व्यवसाय नव्याने सुरू केला असेल तर लागू होतो. जे दुकानदार आणि व्यावसायिक पूर्वीपासून व्यवसाय करीत असतील, त्यांना लागू होत नाही, असे कलमात स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिकेने ज्या कलमाआधारे नोटिसा बजावल्या आहेत, त्या चुकीच्या असल्याचे वसा यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार