शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्याला मिळेना जागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 22:57 IST

पर्यायी जागेचा शोध सुरू । पोलिसांसमोर वाढत्या गुन्हेगारीचेही आव्हान

नालासोपारा : नालासोपारा शहरातील वाढती लोकसंख्या व पर्यायाने वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने ५ मार्च २०१५ रोजी तुळींज पोलीस ठाण्याची निर्मिती केली. घाईघाईत तयार करण्यात आलेले सदरचे पोलीस ठाणे हे चक्क एका गटारावर उभारण्यात आले होते. मात्र तब्बल पाच वर्षे होऊन सुद्धा आजही पोलीस ठाणे गटारावरच उभे असून ते स्थलांतर करण्यासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. परंतु शोधाशोध करूनही तुळींज पोलीस ठाण्याला अद्याप जागा उपलब्ध होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकीकडे नालासोपारा शहरात शाळा, गार्डन, हॉस्पिटल्स यासाठी आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत, तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाकडून पोलीस ठाण्याला डीपी आराखड्यात आरक्षित जागाच ठेवण्यात आलेली नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गटारावर उभारण्यात आलेल्या या पोलीस ठाण्यात पावसाळ्यामध्ये गटाराचे पाणी तुंबून परिसर जलमय होतो. वसई तालुक्यात तीन आमदार आणि महापालिकेची सत्ता हाती असतानादेखील नालासोपाऱ्यात तुळींज पोलीस ठाण्याकरिता साधी जागा उपलब्ध करून देता येत नसेल तर मग सत्तेचा काय उपयोग आहे? असा सवाल नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तुळींज पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस अधिकारी व कर्मचारी मिळून १५० हून अधिक जणांचा स्टाफ काम करीत असून त्यांना अत्यंत दुर्गंधीयुक्त वातावरणात काम करावे लागत आहे. पोलीस ठाणे एका गटारावर उभे असल्यामुळे गटाराच्या दुर्गंधीमुळे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही पोलीस अधिकारी व कर्मचारी हे आजारपणामुळे अनेकवेळा रजेवर गेले असल्याची माहितीही समोर येत आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने तुळींज पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली, मात्र आता तर सदर पोलीस ठाण्याचेच अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.कुणी जागा देता का जागा...नालासोपारा शहराला विभागून बनविण्यात आलेल्या तुळींज पोलीस स्टेशनला ‘कोणी जागा देता का जागा’ अशी म्हणण्याची वेळ आता पोलिसांवर येऊन ठेपली आहे. नालासोपारा पूर्वेकडे मनपा हद्दीतील किंवा नगररचना (डीपी) प्लानमध्ये पोलीस स्टेशनला आरक्षित जागा ठेवण्यात आलेली नाही. सुरक्षा करणारे आणि कायदा व सुव्यस्था बिघडू नये यासाठी अहोरात्र मेहनत करणाºया पोलिसांसाठी साधी पोलीस स्टेशन बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही, यापेक्षा पोलिसांसाठी मोठे दुर्दैव काय?गटारावर उभे आहे पोलीस ठाणेनालासोपारा शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी हे शहर दोन पोलीस स्टेशनमध्ये विभागण्यात आले. तुळींज पोलीस ठाणे हे चक्क गटारावर उभे करून चालू करण्यात आले होते. पण गटारावर उभारलेल्या पोलीस ठाण्यामुळे काम करणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुर्गंधीचा तसेच घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे. हे पोलीस ठाणे ठाणे चक्क गटारावर उभे असल्याने गटाराची साफसफाई करण्यासाठी मनपा कर्मचाºयांना मधोमध असलेली झाकणे उघडावी लागतात. ही झाकणे साफसफाईसाठी उघडल्यावर उग्र दुर्गंधीमुळे पोलीस स्टेशनला थांबण्यास खूप त्रास होत आहे. पोलिसांच्या आरोग्यावरही त्याच्या परिणाम होत आहे.