शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पोलीस ठाण्याला मिळेना जागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 22:57 IST

पर्यायी जागेचा शोध सुरू । पोलिसांसमोर वाढत्या गुन्हेगारीचेही आव्हान

नालासोपारा : नालासोपारा शहरातील वाढती लोकसंख्या व पर्यायाने वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने ५ मार्च २०१५ रोजी तुळींज पोलीस ठाण्याची निर्मिती केली. घाईघाईत तयार करण्यात आलेले सदरचे पोलीस ठाणे हे चक्क एका गटारावर उभारण्यात आले होते. मात्र तब्बल पाच वर्षे होऊन सुद्धा आजही पोलीस ठाणे गटारावरच उभे असून ते स्थलांतर करण्यासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. परंतु शोधाशोध करूनही तुळींज पोलीस ठाण्याला अद्याप जागा उपलब्ध होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकीकडे नालासोपारा शहरात शाळा, गार्डन, हॉस्पिटल्स यासाठी आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत, तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाकडून पोलीस ठाण्याला डीपी आराखड्यात आरक्षित जागाच ठेवण्यात आलेली नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गटारावर उभारण्यात आलेल्या या पोलीस ठाण्यात पावसाळ्यामध्ये गटाराचे पाणी तुंबून परिसर जलमय होतो. वसई तालुक्यात तीन आमदार आणि महापालिकेची सत्ता हाती असतानादेखील नालासोपाऱ्यात तुळींज पोलीस ठाण्याकरिता साधी जागा उपलब्ध करून देता येत नसेल तर मग सत्तेचा काय उपयोग आहे? असा सवाल नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तुळींज पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस अधिकारी व कर्मचारी मिळून १५० हून अधिक जणांचा स्टाफ काम करीत असून त्यांना अत्यंत दुर्गंधीयुक्त वातावरणात काम करावे लागत आहे. पोलीस ठाणे एका गटारावर उभे असल्यामुळे गटाराच्या दुर्गंधीमुळे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही पोलीस अधिकारी व कर्मचारी हे आजारपणामुळे अनेकवेळा रजेवर गेले असल्याची माहितीही समोर येत आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने तुळींज पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली, मात्र आता तर सदर पोलीस ठाण्याचेच अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.कुणी जागा देता का जागा...नालासोपारा शहराला विभागून बनविण्यात आलेल्या तुळींज पोलीस स्टेशनला ‘कोणी जागा देता का जागा’ अशी म्हणण्याची वेळ आता पोलिसांवर येऊन ठेपली आहे. नालासोपारा पूर्वेकडे मनपा हद्दीतील किंवा नगररचना (डीपी) प्लानमध्ये पोलीस स्टेशनला आरक्षित जागा ठेवण्यात आलेली नाही. सुरक्षा करणारे आणि कायदा व सुव्यस्था बिघडू नये यासाठी अहोरात्र मेहनत करणाºया पोलिसांसाठी साधी पोलीस स्टेशन बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही, यापेक्षा पोलिसांसाठी मोठे दुर्दैव काय?गटारावर उभे आहे पोलीस ठाणेनालासोपारा शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी हे शहर दोन पोलीस स्टेशनमध्ये विभागण्यात आले. तुळींज पोलीस ठाणे हे चक्क गटारावर उभे करून चालू करण्यात आले होते. पण गटारावर उभारलेल्या पोलीस ठाण्यामुळे काम करणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुर्गंधीचा तसेच घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे. हे पोलीस ठाणे ठाणे चक्क गटारावर उभे असल्याने गटाराची साफसफाई करण्यासाठी मनपा कर्मचाºयांना मधोमध असलेली झाकणे उघडावी लागतात. ही झाकणे साफसफाईसाठी उघडल्यावर उग्र दुर्गंधीमुळे पोलीस स्टेशनला थांबण्यास खूप त्रास होत आहे. पोलिसांच्या आरोग्यावरही त्याच्या परिणाम होत आहे.