शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अमृत आहार योजनेच्या लाभार्थ्यांचे ताट रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 00:39 IST

गर्भवती महिला, स्तनदा मातांच्या कुपोषणवाढीची भीती

जव्हार : कुपोषण आणि व्यवस्थेची अनास्था पालघर जिल्ह्याच्या जणू पाचवीलाच पुजलेली आहे. गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी असलेल्या भारतरत्न डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेला पालघर जिल्ह्यात पुन्हा घरघर लागली आहे. २० कोटी रुपये निधीची अवश्यता असताना केवळ साडेसहा कोटी रुपये निधी दिल्याने सप्टेंबर २०१९ पासून या योजनेला निधीच नसल्याने ‘लाभार्थी मातांच्या हाती अमृत आहाराचे रिकामे ताट’ अशी अवस्था झाली आहे. याचा थेट परिणाम पुन्हा एकदा कुपोषण वाढीवर होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या मागणीपत्रानंतरही निधी मिळाला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी याबाबत संताप व्यक्त केला. श्रमजीवी याबाबत आंदोलन करणार आहे.पालघर जिल्ह्यात २०१६ साली कुपोषणावर महाभारत झाले. एका वर्षात तब्बल ६०० बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाल्यानंतर श्रमजीवी संघटनेने लक्षवेधी आंदोलने केली आणि जगभरात कुपोषणाची दाहकता पोहचली. त्यानंतर सरकारने भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार या योजनेचे उद्घाटन पालघर जिल्ह्यातून केले. या योजनेंतर्गत अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाड्यांमधील, स्त्री गरोदर असल्याचे निश्चित झाल्यापासून गरोदर स्त्रियांना बाळंतपणापर्यंत व स्तनदा मातेस बाळंतपणानंतर ६ महिने एक वेळ चौरस आहार देण्याची तरतूद आहे. तसेच डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा-२ नुसार अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात असलेल्या अंगणवाड्यांतर्गत ७ महिने ते ६ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना प्रतिदिन शाकाहारी मुलांना २ केळी, मांसाहारी मुलांना १ उकडलेले अंडे आठवड्यातून ४ वेळा म्हणजेच महिन्यातून १६ दिवस एक वेळचा अतिरिक्त आहार पुरविण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे आयुक्तालयामार्फत निधी थेट वितरीत करण्यात येत होता, परंतु आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्याकडील पत्रानुसार यापुढे हा निधी जिल्हाधिकाºयांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याबाबत कळविले आहे.योजनेसाठी २० कोटी एवढा निधी प्रस्तावितपालघर जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम २०१९-२० अंतर्गत या योजनेसाठी एकूण रुपये २० कोटी एवढा निधी प्रस्तावित करण्यात आला असून यापूर्वी रुपये ६ कोटी ६६ लाख निधी अर्थसंकल्पीय प्रणालीवर उपलब्ध करून दिला आहे.हा निधी बालविकास प्रकल्प अधिकारी पालघर यांच्यामार्फत अमृत आहार योजनेकरिता वापरण्यात आला आहे. पालघरच्या सर्वसाधारण सभेत उर्वरित १३ कोटी ३३ लाख निधी उपलब्ध होण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.प्रस्तावित नियत व्ययातील शिल्लक रुपये ८ कोटी रुपये निधी आजही देण्यात आलेला नाही, तसेच या योजनेसाठी मार्च २०२० पर्यंत अधिकचा १४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध व्हावा ही मागणी आजपर्यंत प्रलंबित आहे.

टॅग्स :foodअन्नVasai Virarवसई विरार