शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पालघर जिल्ह्यात पहिल्या राष्ट्रध्वजाच्या पुण्यस्मरणाचा नवा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 22:56 IST

किल्ले वसई मोहीम परिवाराचा उपक्रम; १११ वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ ३२ दुर्गमित्रांची ३६ किल्ल्यांवर मोहीम

नालासोपारा : मादाम कामा यांनी सन १९०७ मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ड शहरात भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचा आद्य राष्ट्रध्वज फडकवला. त्या गौरवशाली क्षणाला यंदा १११ वर्ष पूर्ण झाली. तसेच कामा यांचा १२ आॅगस्टलाच स्मृतिदिन होता. या दिनाचे व ध्वजाचे पुण्यस्मरण करण्यासाठी किल्ले वसई मोहीम परिवारा अंतर्गत १८ व १९ आॅगस्ट रोजी पहिल्या राष्ट्रध्वजाचे पुण्यस्मरण व गडकोट अभ्यास सफर आयोजित करण्यात आलेली होती.वसई किल्ल्यात वसई विरार महानगरपालिका माजी महापौर नारायण माणकर व विद्यमान उपमहापौर प्रकाश रॉड्रिंक्स यांच्या हस्ते मोहिमेचे शुभारंभ करण्यात येऊन पहिल्या राष्ट्रध्वजाचे स्मरण नरवीर चिमाजी अप्पा स्मारकात सकाळी ७ वाजता करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तयार झालेल्या राष्ट्रध्वजांची गौरवशाली परंपरा जपणे व दुर्ग संवर्धन हे आपले कर्तव्य आहे असे मत मानकर यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. उपमहापौर प्रकाश रॉड्रिंग्ज यांनी दुर्गिमत्रांशी दुर्गसंवर्धन व इतिहास संवर्धन या विषयावर संवाद साधला.याद्वारे तब्बल ३६ गडकोटांवर भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाचे पुण्यस्मरण करण्यात आले. या मोहिमेचे दुर्गसंवर्धन प्रमुख आतिष पाटील उमेळे व जयदीप चौधरी उमेळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम सर करण्यात आली.या मोहिमेत वसई, आगाशी, वर्जगड, मांडवी, दहिसर, विराथन, तारापूर, चिंचणी, डहाणू, दातीवरे, हिराडोंगरी, एडवण, कोरे, सेवगा, आसावा, मुर्धा कोट, जंजिरे धारावी, जंजिरे अर्नाळा, मथाने, एडवण, कोरे, अशेरी, माहीम कोट, शिरगाव कोट अशा गडकोटांवर दुर्गमित्रांना सहभागी करून पहिल्या राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. गडकोटांच्या परिसरातील दर्गमित्रांचा व स्थानिकांचा वाढता सहभाग हे या मोहिमेचे वैशिष्ट्य ठरले. जंजिरे धारावी, मुर्धा कोट, माहीम कोट, केळवे कस्टम कोट या ठिकाणी स्थानिक मंडळींनी घेतलेला सक्रि य सहभाग हे मोहिमेचे विशेष ठरले.जिल्ह्यातील अज्ञातवासात गेलेल्या व दुर्गसंवर्धनाची प्रचंड आवश्यकता असणाऱ्या गडकोटांना किल्ले वसई मोहीम परिवाराने सातत्यपूर्ण श्रमदान मोहिमेने एक नवी दिशा मिळवून दिलेली आहे. २०१५ मध्ये २६, २०१६ मध्ये ३० गडकोटांवर, २१०७ साली ३३ गडकोटांवर ही मोहिम यशस्वी झाली आहे.दुचाकीद्वारे खडतर प्रवासया मोहिमेत डहाणू, सफाळे, मुंबई मालाड ,वसई इत्यादी भागातील एकूण ३२ दुर्गमित्र आल्या दुचाकी व खाजगी वाहनांद्वारे दोन दिवसांच्या या खडतर मोहिमेत सहभागी झाले होते. इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी मोहिमेतील सर्व गडकोटांवर इतिहास मार्गदर्शन व नरवीरांच्या पराक्र माचे संदर्भ याचा लेखाजोगा मांडला.

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वज