शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पालघर जिल्ह्यात पहिल्या राष्ट्रध्वजाच्या पुण्यस्मरणाचा नवा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 22:56 IST

किल्ले वसई मोहीम परिवाराचा उपक्रम; १११ वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ ३२ दुर्गमित्रांची ३६ किल्ल्यांवर मोहीम

नालासोपारा : मादाम कामा यांनी सन १९०७ मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ड शहरात भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचा आद्य राष्ट्रध्वज फडकवला. त्या गौरवशाली क्षणाला यंदा १११ वर्ष पूर्ण झाली. तसेच कामा यांचा १२ आॅगस्टलाच स्मृतिदिन होता. या दिनाचे व ध्वजाचे पुण्यस्मरण करण्यासाठी किल्ले वसई मोहीम परिवारा अंतर्गत १८ व १९ आॅगस्ट रोजी पहिल्या राष्ट्रध्वजाचे पुण्यस्मरण व गडकोट अभ्यास सफर आयोजित करण्यात आलेली होती.वसई किल्ल्यात वसई विरार महानगरपालिका माजी महापौर नारायण माणकर व विद्यमान उपमहापौर प्रकाश रॉड्रिंक्स यांच्या हस्ते मोहिमेचे शुभारंभ करण्यात येऊन पहिल्या राष्ट्रध्वजाचे स्मरण नरवीर चिमाजी अप्पा स्मारकात सकाळी ७ वाजता करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तयार झालेल्या राष्ट्रध्वजांची गौरवशाली परंपरा जपणे व दुर्ग संवर्धन हे आपले कर्तव्य आहे असे मत मानकर यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. उपमहापौर प्रकाश रॉड्रिंग्ज यांनी दुर्गिमत्रांशी दुर्गसंवर्धन व इतिहास संवर्धन या विषयावर संवाद साधला.याद्वारे तब्बल ३६ गडकोटांवर भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाचे पुण्यस्मरण करण्यात आले. या मोहिमेचे दुर्गसंवर्धन प्रमुख आतिष पाटील उमेळे व जयदीप चौधरी उमेळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम सर करण्यात आली.या मोहिमेत वसई, आगाशी, वर्जगड, मांडवी, दहिसर, विराथन, तारापूर, चिंचणी, डहाणू, दातीवरे, हिराडोंगरी, एडवण, कोरे, सेवगा, आसावा, मुर्धा कोट, जंजिरे धारावी, जंजिरे अर्नाळा, मथाने, एडवण, कोरे, अशेरी, माहीम कोट, शिरगाव कोट अशा गडकोटांवर दुर्गमित्रांना सहभागी करून पहिल्या राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. गडकोटांच्या परिसरातील दर्गमित्रांचा व स्थानिकांचा वाढता सहभाग हे या मोहिमेचे वैशिष्ट्य ठरले. जंजिरे धारावी, मुर्धा कोट, माहीम कोट, केळवे कस्टम कोट या ठिकाणी स्थानिक मंडळींनी घेतलेला सक्रि य सहभाग हे मोहिमेचे विशेष ठरले.जिल्ह्यातील अज्ञातवासात गेलेल्या व दुर्गसंवर्धनाची प्रचंड आवश्यकता असणाऱ्या गडकोटांना किल्ले वसई मोहीम परिवाराने सातत्यपूर्ण श्रमदान मोहिमेने एक नवी दिशा मिळवून दिलेली आहे. २०१५ मध्ये २६, २०१६ मध्ये ३० गडकोटांवर, २१०७ साली ३३ गडकोटांवर ही मोहिम यशस्वी झाली आहे.दुचाकीद्वारे खडतर प्रवासया मोहिमेत डहाणू, सफाळे, मुंबई मालाड ,वसई इत्यादी भागातील एकूण ३२ दुर्गमित्र आल्या दुचाकी व खाजगी वाहनांद्वारे दोन दिवसांच्या या खडतर मोहिमेत सहभागी झाले होते. इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी मोहिमेतील सर्व गडकोटांवर इतिहास मार्गदर्शन व नरवीरांच्या पराक्र माचे संदर्भ याचा लेखाजोगा मांडला.

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वज