शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
4
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
5
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
6
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
7
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
10
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
11
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
12
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
13
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
14
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
15
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
16
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
17
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
18
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
19
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
20
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!

बीचवर जीवरक्षकांची गरज

By admin | Updated: March 23, 2017 01:13 IST

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून निर्मल सागरतट अभियान राबविण्यात येत आहे.

बोर्डी : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून निर्मल सागरतट अभियान राबविण्यात येत आहे. या द्वारे किनारा स्वछता आणि पर्यटन यांची सांगड घालून स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असले तरी होणाऱ्या अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जीवरक्षक नेमण्याकडे दुर्लक्ष होते आहे. पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डातर्फे निर्मल सागरतट अभियान हाती घेण्यात आले आहे. डहाणू तालुक्यातील चिंचणी, नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी आणि तलासरीतील झाई अशा सहा ग्रामपंचायतिची निवड केली आहे. विकासकामासाठी निधीची तरतूद केली आहे. या समितीच्या माध्यमातून किनाऱ्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन केले जाणार आहे. या विकास निधीचा विनियोग सुनियोजितरीत्या करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणे या मागील मुख्य उद्देश आहे. वर्षभरात राबविलेल्या अभियानाचे मूल्यमापन करून उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ग्रामपंचायतीला पारितोषिक दिले जाणार आहे. प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सी. जे. लेपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेत सागरतट व्यवस्थापन कमिटीला मोलाचे मार्गदर्शन केले गेले. (वार्ताहर)