शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

वैतरणा नदीत अडकलेल्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरच्या 10 कामगारांना वाचवविण्यात एनडीआरएफच्या टीमला यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 18:04 IST

पहाटे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि  समुद्राला आलेली ओहोटी ह्यामुळे नदीचा प्रवाह कमी झाल्या नंतर नदीत एनडीआरएफने बोटीच्या सहाय्याने १६ तास अडकून पडलेल्या १० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले.

हितेंन नाईक -पालघर- पालघरच्या वैतरणा नदीत अडकलेल्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरच्या 10 कामगारांना वाचवविण्यात एनडीआरएफच्या टीमला अखेर यश आले. रात्री मुसळधार पावसाचा कमी झालेला जोर आणि समुद्राला लागलेल्या ओहोटीमुळे नदीचा प्रवाह कमी झाल्याने एन डी आरएफच्या टीमचे काम सुलभ झाले आणि १६ तासापासून नदीच्या प्रवाहात अडकून पडलेल्या कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले.

मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील काही वर्षभरापासून सुरू असून ह्या कामाचा ठेका घेतलेल्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरने मोठा प्रोजेक्ट् बहाडोली गावात उभारला आहे. बहाडोली गावाच्या पूर्वेला असलेल्या वैतरणा नदीत पूल उभारण्यासाठी पिलर उभारण्याचे काम, मुसळधार पाऊस आणि नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला असताना ही धोकादायक रित्या सुरूच होते. कामगारांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना जीएम कंपनीच्या व्यवस्थापकांनी १० कामगारांना नदीच्या धोकादायक प्रवाहात लोटून दिले होते.

जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नदी-नाल्याना पूर आला असून अनेक लोक अडकून पडले आहेत. जिल्ह्यातील अनेक धरणे भरली असून त्यातून लाखो क्युमेंक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. अशा वेळी कामगारांच्या जीविताची काळजी न घेता त्यांना धोकादायक परिस्थितीत नदीत उतरविण्याची जोखीम ह्या १० कामगारांच्या जीविताला धोका निर्माण करणारी ठरली होती.

बुधवारी रात्री मुंबईच्या कोस्ट गार्डकडे नदीत फसलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरची मागितलेली मदत मुसळधार पाऊस, रात्रीची घटना आणि नदीच्या धोकादायक प्रवाहामुळे शक्य नसल्याचे कोस्टगार्डने कळविले होते. दुसरीकडे एन डी आरएफकडे असलेल्या साधन सामग्रीच्या मर्यादा लक्षात घेता रात्रभर सुरू असलेले प्रयत्न अपुरे पडत होते. स्थानिक मच्छीमाराच्या बोटीची मदत ही धोकादायक परिस्थिती मुळे उपलब्ध होऊ शकत नसल्याने अखेर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले, प्रांत अधिकारी धनाजी तोरस्कर, तहसीलदार सुनिल शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी ह्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत व्यवस्था उभारण्याच्या सूचना दिल्या. पहाटे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि  समुद्राला आलेली ओहोटी ह्यामुळे नदीचा प्रवाह कमी झाल्या नंतर नदीत एनडीआरएफने बोटीच्या सहाय्याने १६ तास अडकून पडलेल्या १० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले. ह्यावेळी स्थानिक पोलिसांचे सहकार्य ही महत्वपूर्ण ठरले. 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरारNational Disaster Response Forceराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल