शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

वैतरणा नदीत अडकलेल्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरच्या 10 कामगारांना वाचवविण्यात एनडीआरएफच्या टीमला यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 18:04 IST

पहाटे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि  समुद्राला आलेली ओहोटी ह्यामुळे नदीचा प्रवाह कमी झाल्या नंतर नदीत एनडीआरएफने बोटीच्या सहाय्याने १६ तास अडकून पडलेल्या १० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले.

हितेंन नाईक -पालघर- पालघरच्या वैतरणा नदीत अडकलेल्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरच्या 10 कामगारांना वाचवविण्यात एनडीआरएफच्या टीमला अखेर यश आले. रात्री मुसळधार पावसाचा कमी झालेला जोर आणि समुद्राला लागलेल्या ओहोटीमुळे नदीचा प्रवाह कमी झाल्याने एन डी आरएफच्या टीमचे काम सुलभ झाले आणि १६ तासापासून नदीच्या प्रवाहात अडकून पडलेल्या कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले.

मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील काही वर्षभरापासून सुरू असून ह्या कामाचा ठेका घेतलेल्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरने मोठा प्रोजेक्ट् बहाडोली गावात उभारला आहे. बहाडोली गावाच्या पूर्वेला असलेल्या वैतरणा नदीत पूल उभारण्यासाठी पिलर उभारण्याचे काम, मुसळधार पाऊस आणि नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला असताना ही धोकादायक रित्या सुरूच होते. कामगारांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना जीएम कंपनीच्या व्यवस्थापकांनी १० कामगारांना नदीच्या धोकादायक प्रवाहात लोटून दिले होते.

जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नदी-नाल्याना पूर आला असून अनेक लोक अडकून पडले आहेत. जिल्ह्यातील अनेक धरणे भरली असून त्यातून लाखो क्युमेंक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. अशा वेळी कामगारांच्या जीविताची काळजी न घेता त्यांना धोकादायक परिस्थितीत नदीत उतरविण्याची जोखीम ह्या १० कामगारांच्या जीविताला धोका निर्माण करणारी ठरली होती.

बुधवारी रात्री मुंबईच्या कोस्ट गार्डकडे नदीत फसलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरची मागितलेली मदत मुसळधार पाऊस, रात्रीची घटना आणि नदीच्या धोकादायक प्रवाहामुळे शक्य नसल्याचे कोस्टगार्डने कळविले होते. दुसरीकडे एन डी आरएफकडे असलेल्या साधन सामग्रीच्या मर्यादा लक्षात घेता रात्रभर सुरू असलेले प्रयत्न अपुरे पडत होते. स्थानिक मच्छीमाराच्या बोटीची मदत ही धोकादायक परिस्थिती मुळे उपलब्ध होऊ शकत नसल्याने अखेर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले, प्रांत अधिकारी धनाजी तोरस्कर, तहसीलदार सुनिल शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी ह्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत व्यवस्था उभारण्याच्या सूचना दिल्या. पहाटे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि  समुद्राला आलेली ओहोटी ह्यामुळे नदीचा प्रवाह कमी झाल्या नंतर नदीत एनडीआरएफने बोटीच्या सहाय्याने १६ तास अडकून पडलेल्या १० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले. ह्यावेळी स्थानिक पोलिसांचे सहकार्य ही महत्वपूर्ण ठरले. 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरारNational Disaster Response Forceराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल