शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

वीज पुरवठा खंडित, दुरुस्तीसाठी कर्मचारी विद्युत वाहिनीवर; तितक्यात नदीचा प्रवाह वाढला अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 17:27 IST

विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी नदीवरून जाणाऱ्या विद्युत वाहिनीवर प्रवाहात अचानक वाढ

पालघर: राज्यात विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. त्याचबरोबर पावसामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्यानं विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. पालघरमध्येही असाच प्रकार घडला. विशेष म्हणजे वैतरणा नदीच्या पात्रात विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महावितरणाचे कर्मचारी (लाईटमन) गेले होते. मात्र, अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे हे कर्मचारी तिथेच अडकून पडले होते. त्यांना नदीच्या काठावर येणं कठीण होऊण बसलं होतं. अखेर दीड तासांनी एनडीआरएफच्या पथकानं त्यांची सुखरुप सुटका केली. 

मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात काल विजेची एक लाईन तुटली होती. त्यामुळे तिच्या दुरुस्तीच्या कामासाठी दोन लाईनमन नदी पात्रात गेले. ते वैतरणा नदीवरील उच्च दाब विद्युत वाहिनीच्या दुरूस्तीचं काम करण्यासाठी गेले. यावेळी नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे लाईनमन नदीपात्राच्या वरून जाणाऱ्या विद्युत वाहिनीवरच अडकले. अखेर संध्याकाळी त्यांना नदीपात्रातून बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं.

मधुकर सातवी आणि प्रदीप भुयाळ अशी या दोन महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. बंद असलेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी नदीत पूर असल्याने हे दोन्ही कर्मचारी विद्युत वाहिनीवरून नदी पार करणार होते. नदीतून आपल्यासोबत कंडक्टर घेऊन जात असताना पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं त्यांना कंडक्टर पुढे घेऊन जाणं अशक्य होतं. नदीचे दोन्ही काठ जास्त अंतरावर असल्यानं दोन्ही कर्मचारी मध्यभागीच अडकले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने या दोन्ही कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पालघरमध्ये दाखल झालेल्या एनडीआरएफच्या टीमला मदतीसाठी बोलवण्यात आलं. त्यानंतर या टीमच्या मदतीने दोन्ही कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली.

टॅग्स :floodपूर