शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

एनडीआरएफची मदत तोकडीच, पालघरमधील भूकंपग्रस्त त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 06:29 IST

गेल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के बसल्याने हादरलेल्या डहाणू व तलासरीवासीयांना धीर देण्यासाठी एनडीआरएफचे बचाव दल दाखल झाले आहे.

तलासरी : गेल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के बसल्याने हादरलेल्या डहाणू व तलासरीवासीयांना धीर देण्यासाठी एनडीआरएफचे बचाव दल दाखल झाले आहे. मात्र शेकडो गाव-पाड्यांसाठी त्यांनी आणलेल्या फक्त २०० राहुट्यांमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या राहुट्या म्हणजे आमची चेष्टा असून ही मदत तोकडीच असल्याचे दुंदलवाडीतील रहिवाशांनी सांगितले.गेल्या तीन महिन्यांपासून या भागात भूकंपाच्या धक्क्याने ग्रामस्थ हैराण आहेत. गेल्या शुक्रवारी सलग कंपने आल्याने आणि त्यातील दुपारी दोनच्या दरम्यान आलेल्या भूकंपाने ४.१ रिश्टर स्केलची नोंद केल्याने सगळ्याच शासकीय यंत्रणा हादरल्या आणि लगबगीने एनडीआरएफची टीम येथे रवाना झाली.मात्र, गाव-पाड्यांची संख्या पाहता एका गावाच्या वाट्याला एक किंवा दोन राहुट्या मोठ्या मुश्किलीने येतील अशी स्थिती आहे. त्यातच त्यांच्या लांबी-रुंदीचा विचार केला तर एका कुटुंबाची सोय त्यात होत आहे. जर एका गावात ७० ते १५० कुटुंबे राहत असतील तर इतरांनी उघड्यावर राहायचे का, असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांना विचारला जाऊ लागला आहे. घरापासून दूर राहुटीत रात्री राहिल्यास आपल्या घरी चोरी होण्याची भीती असल्याने ग्रामस्थ तंबूत राहावयास तयार नाहीत. ते घराजवळच उघड्यावर झोपत आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेने घरटी एक तंबूचे वाटप करावे, अशी मागणी पीडितांनी केली आहे. शासनाने दोनशे तंबूंचे वाटप करून भूकंप पीडितांची थट्टा केली असल्याचा आरोप धुंदलवाडीचे सरपंच शिवा महाले यांनी केला आहे.लोकांना तंबू देण्यात आले असून अजून सर्व्हे चालू आहे. त्याप्रमाणे उपाययोजना करण्यात येतील. लोकांनी ताडपत्रीची मागणी केली असून त्यांना ताडपत्री दिल्यास घराजवळ तंबू स्वत: उभारणार, असे सांगितल्याने ताडपत्री मागविण्यात आल्या आहेत.- डॉ. प्रशांत नारनवरे,जिल्हाधिकारी पालघर

 

टॅग्स :palgharपालघर