शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

भूमिपुत्रांसाठी आगरीसेनेचा रास्ता रोको, राष्ट्रीय महामार्ग अर्धा तास ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 02:36 IST

भूमीपूत्रांच्या न्यायहक्कासाठी ‘अभी नही तो कभी नहीं’ चा नारा देत आगरी सेना भूमिपूत्रांसोबत शुक्र वारी राष्ट्रीय महामार्गावर धडकली. हजारो भूमिपूत्र या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील विविध पक्षांनी या महामार्ग रास्ता रोकोला जाहिर पाठींबा दर्शवला होता.

वसई  - भूमीपूत्रांच्या न्यायहक्कासाठी ‘अभी नही तो कभी नहीं’ चा नारा देत आगरी सेना भूमिपूत्रांसोबत शुक्र वारी राष्ट्रीय महामार्गावर धडकली. हजारो भूमिपूत्र या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील विविध पक्षांनी या महामार्ग रास्ता रोकोला जाहिर पाठींबा दर्शवला होता.पालघरचा विकास हा भूमीपुत्रांच्या जागेवरच झाला आहे. मात्र, स्थानिक भूमिपूत्र नेहमीच दुर्लक्षीत राहिले. त्यांच्या विविध मागण्या पूर्ण होत नसल्याने आगरी सेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर शुक्र वारी सकाळी ११ वाजता शिरसाड, विरार फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी पालिका प्रशासनाचा सुरु असलेला भोंगळ कारभार, वाढीव घरपट्टी, मच्छीमार बांधवांचे ओएनजीसीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई, वीज समस्या, पाणी समस्या, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, उद्योग व्यवसाय, रु ग्णालय, महाविद्यालय, नारंगी उड्डाणपूल, बांधकामावर पालिकेचे दुर्लक्ष अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलकांनी मुंबई-अहमदाबाद महामार्ग अर्धा तास रोखून धरला होता. यामुळे महामार्गावर लांबचलांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.येथे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी वसईचे प्रांताधिकारी डॉ. दीपक क्षीरसागर, तहसीलदार किरण सुरवसे यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्विकारले. जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून पालघर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक बोलावून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितल्या. त्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, मागण्या पुर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असे आगरीसेनेचे कैलास पाटील यांनी संगीतले.आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसह हजारोंच्या संख्येने वसई, विरार, पालघर परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.विविध पक्षांचाही पाठींबा : आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसह हजारोच्या संख्येने वसई, विरार, पालघर परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. यावेळी आगरी सेना जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, कैलास पाटील, ‘मी वसईकर’चे मिलिंद खानोलकर, शिवसेनेचे दिलिप पिंपळे व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशा आहेत मागण्यापालघर जिल्ह्यात येऊ घातलेल्या सरकारी विविध प्रकल्पात भूमिपूत्रांना तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकºयांमध्ये आरक्षण, ओ.एन.जी.सी.च्या सागरी सर्वेक्षणामूळे दोन महिने मच्छीमारी बंद करण्यात आली आहे, त्याचा मोठा फटका मच्छीमार बांधवांना बसतो आहे. त्यांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी.वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताकरांमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. वाढीव घरपट्टीमूळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे त्यामूळे तीमध्ये वाढ करण्यात येऊ नये, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई बडोदरा महामार्ग, विरार अलिबाग कॉरिडोअर या प्रकल्पात बाधित शेतकºयांना योग्य मोबदला न मिळाल्यास विरोध केला जाणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार