शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

भूमिपुत्रांसाठी आगरीसेनेचा रास्ता रोको, राष्ट्रीय महामार्ग अर्धा तास ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 02:36 IST

भूमीपूत्रांच्या न्यायहक्कासाठी ‘अभी नही तो कभी नहीं’ चा नारा देत आगरी सेना भूमिपूत्रांसोबत शुक्र वारी राष्ट्रीय महामार्गावर धडकली. हजारो भूमिपूत्र या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील विविध पक्षांनी या महामार्ग रास्ता रोकोला जाहिर पाठींबा दर्शवला होता.

वसई  - भूमीपूत्रांच्या न्यायहक्कासाठी ‘अभी नही तो कभी नहीं’ चा नारा देत आगरी सेना भूमिपूत्रांसोबत शुक्र वारी राष्ट्रीय महामार्गावर धडकली. हजारो भूमिपूत्र या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील विविध पक्षांनी या महामार्ग रास्ता रोकोला जाहिर पाठींबा दर्शवला होता.पालघरचा विकास हा भूमीपुत्रांच्या जागेवरच झाला आहे. मात्र, स्थानिक भूमिपूत्र नेहमीच दुर्लक्षीत राहिले. त्यांच्या विविध मागण्या पूर्ण होत नसल्याने आगरी सेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर शुक्र वारी सकाळी ११ वाजता शिरसाड, विरार फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी पालिका प्रशासनाचा सुरु असलेला भोंगळ कारभार, वाढीव घरपट्टी, मच्छीमार बांधवांचे ओएनजीसीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई, वीज समस्या, पाणी समस्या, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, उद्योग व्यवसाय, रु ग्णालय, महाविद्यालय, नारंगी उड्डाणपूल, बांधकामावर पालिकेचे दुर्लक्ष अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलकांनी मुंबई-अहमदाबाद महामार्ग अर्धा तास रोखून धरला होता. यामुळे महामार्गावर लांबचलांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.येथे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी वसईचे प्रांताधिकारी डॉ. दीपक क्षीरसागर, तहसीलदार किरण सुरवसे यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्विकारले. जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून पालघर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक बोलावून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितल्या. त्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, मागण्या पुर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असे आगरीसेनेचे कैलास पाटील यांनी संगीतले.आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसह हजारोंच्या संख्येने वसई, विरार, पालघर परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.विविध पक्षांचाही पाठींबा : आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसह हजारोच्या संख्येने वसई, विरार, पालघर परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. यावेळी आगरी सेना जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, कैलास पाटील, ‘मी वसईकर’चे मिलिंद खानोलकर, शिवसेनेचे दिलिप पिंपळे व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशा आहेत मागण्यापालघर जिल्ह्यात येऊ घातलेल्या सरकारी विविध प्रकल्पात भूमिपूत्रांना तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकºयांमध्ये आरक्षण, ओ.एन.जी.सी.च्या सागरी सर्वेक्षणामूळे दोन महिने मच्छीमारी बंद करण्यात आली आहे, त्याचा मोठा फटका मच्छीमार बांधवांना बसतो आहे. त्यांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी.वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताकरांमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. वाढीव घरपट्टीमूळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे त्यामूळे तीमध्ये वाढ करण्यात येऊ नये, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई बडोदरा महामार्ग, विरार अलिबाग कॉरिडोअर या प्रकल्पात बाधित शेतकºयांना योग्य मोबदला न मिळाल्यास विरोध केला जाणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार