शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

भूमिपुत्रांसाठी आगरीसेनेचा रास्ता रोको, राष्ट्रीय महामार्ग अर्धा तास ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 02:36 IST

भूमीपूत्रांच्या न्यायहक्कासाठी ‘अभी नही तो कभी नहीं’ चा नारा देत आगरी सेना भूमिपूत्रांसोबत शुक्र वारी राष्ट्रीय महामार्गावर धडकली. हजारो भूमिपूत्र या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील विविध पक्षांनी या महामार्ग रास्ता रोकोला जाहिर पाठींबा दर्शवला होता.

वसई  - भूमीपूत्रांच्या न्यायहक्कासाठी ‘अभी नही तो कभी नहीं’ चा नारा देत आगरी सेना भूमिपूत्रांसोबत शुक्र वारी राष्ट्रीय महामार्गावर धडकली. हजारो भूमिपूत्र या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील विविध पक्षांनी या महामार्ग रास्ता रोकोला जाहिर पाठींबा दर्शवला होता.पालघरचा विकास हा भूमीपुत्रांच्या जागेवरच झाला आहे. मात्र, स्थानिक भूमिपूत्र नेहमीच दुर्लक्षीत राहिले. त्यांच्या विविध मागण्या पूर्ण होत नसल्याने आगरी सेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर शुक्र वारी सकाळी ११ वाजता शिरसाड, विरार फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी पालिका प्रशासनाचा सुरु असलेला भोंगळ कारभार, वाढीव घरपट्टी, मच्छीमार बांधवांचे ओएनजीसीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई, वीज समस्या, पाणी समस्या, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, उद्योग व्यवसाय, रु ग्णालय, महाविद्यालय, नारंगी उड्डाणपूल, बांधकामावर पालिकेचे दुर्लक्ष अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलकांनी मुंबई-अहमदाबाद महामार्ग अर्धा तास रोखून धरला होता. यामुळे महामार्गावर लांबचलांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.येथे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी वसईचे प्रांताधिकारी डॉ. दीपक क्षीरसागर, तहसीलदार किरण सुरवसे यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्विकारले. जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून पालघर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक बोलावून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितल्या. त्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, मागण्या पुर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असे आगरीसेनेचे कैलास पाटील यांनी संगीतले.आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसह हजारोंच्या संख्येने वसई, विरार, पालघर परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.विविध पक्षांचाही पाठींबा : आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसह हजारोच्या संख्येने वसई, विरार, पालघर परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. यावेळी आगरी सेना जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, कैलास पाटील, ‘मी वसईकर’चे मिलिंद खानोलकर, शिवसेनेचे दिलिप पिंपळे व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशा आहेत मागण्यापालघर जिल्ह्यात येऊ घातलेल्या सरकारी विविध प्रकल्पात भूमिपूत्रांना तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकºयांमध्ये आरक्षण, ओ.एन.जी.सी.च्या सागरी सर्वेक्षणामूळे दोन महिने मच्छीमारी बंद करण्यात आली आहे, त्याचा मोठा फटका मच्छीमार बांधवांना बसतो आहे. त्यांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी.वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताकरांमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. वाढीव घरपट्टीमूळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे त्यामूळे तीमध्ये वाढ करण्यात येऊ नये, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई बडोदरा महामार्ग, विरार अलिबाग कॉरिडोअर या प्रकल्पात बाधित शेतकºयांना योग्य मोबदला न मिळाल्यास विरोध केला जाणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार